शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
2
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
3
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
4
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
5
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
6
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
7
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
8
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
9
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
10
रशियन सैन्यातील १० भारतीयांचा युद्धात मृत्यू; भावाचा शोध घेणाऱ्या तरुणाचा खळबळजनक दावा
11
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
12
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
13
एआयच्या निमित्ताने अदानींसोबतच पवार कुटुंब एकाच व्यासपीठावर; शरद पवार यांचे अदानींकडून कौतुक
14
मुंबई महापालिकेत काँग्रेस-वंचित युती; इतर महापालिकांचा निर्णय स्थानिक पातळीवर; वंचित ६२ जागा लढवणार, अकोल्यात मात्र वेटिंग
15
पाकिस्ताननं अखेर मानली हार; ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्करी तळ उद्ध्वस्त झाल्याची दिली कबुली!
16
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
17
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
18
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
19
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
20
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीचा वासुदेव रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि ...

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि तरीही ज्ञान, लोकशिक्षणाचा वसा समाजामध्ये अखंड रुजविणारे वासुदेव म्हणजे लोककलेचा जिवंत उदाहरण आहे. मात्र, पायाला चाक लागल्यासारखे अनेक मैल पायी प्रवास करणारे हे वासुदेव काळाच्या ओघात हरवून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच मूळचे बारामतीचे असलेले आणि सध्या जेजुरीला वास्तव्य असलेल्या सोमनाथ गीताराम घाडगे रत्नागिरीत वासुदेव म्हणून फिरतात, तेव्हा अनेकांची नजर आश्चर्याने त्यांच्याकडे वळते.

रामप्रहरी दारी जणू ईश्वराची वाणी घेऊन येणारे वासुदेव जुन्या काळी जीवनाचा अविभाज्य घटक होते. त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञानच नव्हे, लोकशिक्षणही घरोघरी पोहोचत होते. स्वराज्याच्या रणसंग्रामात हेच वासुदेव स्वराज्याचे पाईक म्हणवून घेत, हेरगिरीही करत होते. समाजाचा एक अविभाज्य घटक होते. मात्र, हळूहळू काळ बदलल्यानंतर मात्र समाजाला वेग आला, तरी वासुदेव मात्र काळाच्या ओघात हरवून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वासुदेव म्हणजे काय, असा प्रश्न नव्या पिढीला पडावा, इतके त्याचे दर्शन दुर्मीळ झाले असताना रत्नागिरीत वासुदेवाची स्वारी अवतरली. बारामतीचे सोमनाथ घाडगे आणि त्यांच्या परिवाराने ही परंपरा कायम राखली आहे. ते सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगा उतरून कोकणात आले आहेत. यामध्ये जनजागृती हा त्यांचा मुख्य हेतू असून, केवळ याच वर्षी नव्हे, तर दरवषी घाडगे परिवाराचा सदस्य वासुदेवाचे दर्शन कोकणवासीयांना रामप्रहरी करून देण्यासाठी येत आहेत.

पूर्वी लाेकांच्या मनात वासुदेवाबद्दल आस्था होती. काळाच्या ओघात ही आस्था कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली, तरीही आपले वडिलोपार्जित कर्तव्य आपण आणि आपला परिवार करतच असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

फोटो आहे.