शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

बारामतीचा वासुदेव रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि ...

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि तरीही ज्ञान, लोकशिक्षणाचा वसा समाजामध्ये अखंड रुजविणारे वासुदेव म्हणजे लोककलेचा जिवंत उदाहरण आहे. मात्र, पायाला चाक लागल्यासारखे अनेक मैल पायी प्रवास करणारे हे वासुदेव काळाच्या ओघात हरवून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच मूळचे बारामतीचे असलेले आणि सध्या जेजुरीला वास्तव्य असलेल्या सोमनाथ गीताराम घाडगे रत्नागिरीत वासुदेव म्हणून फिरतात, तेव्हा अनेकांची नजर आश्चर्याने त्यांच्याकडे वळते.

रामप्रहरी दारी जणू ईश्वराची वाणी घेऊन येणारे वासुदेव जुन्या काळी जीवनाचा अविभाज्य घटक होते. त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञानच नव्हे, लोकशिक्षणही घरोघरी पोहोचत होते. स्वराज्याच्या रणसंग्रामात हेच वासुदेव स्वराज्याचे पाईक म्हणवून घेत, हेरगिरीही करत होते. समाजाचा एक अविभाज्य घटक होते. मात्र, हळूहळू काळ बदलल्यानंतर मात्र समाजाला वेग आला, तरी वासुदेव मात्र काळाच्या ओघात हरवून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वासुदेव म्हणजे काय, असा प्रश्न नव्या पिढीला पडावा, इतके त्याचे दर्शन दुर्मीळ झाले असताना रत्नागिरीत वासुदेवाची स्वारी अवतरली. बारामतीचे सोमनाथ घाडगे आणि त्यांच्या परिवाराने ही परंपरा कायम राखली आहे. ते सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगा उतरून कोकणात आले आहेत. यामध्ये जनजागृती हा त्यांचा मुख्य हेतू असून, केवळ याच वर्षी नव्हे, तर दरवषी घाडगे परिवाराचा सदस्य वासुदेवाचे दर्शन कोकणवासीयांना रामप्रहरी करून देण्यासाठी येत आहेत.

पूर्वी लाेकांच्या मनात वासुदेवाबद्दल आस्था होती. काळाच्या ओघात ही आस्था कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली, तरीही आपले वडिलोपार्जित कर्तव्य आपण आणि आपला परिवार करतच असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

फोटो आहे.