शहरं
Join us  
Trending Stories
1
Virat Kohli Test Retirement: 'किंग कोहली'ची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती; १४ वर्षांचा 'विराट' प्रवास थांबवला!
2
पाकिस्तानवरील कारवाईदरम्यान बंद केलेली ३२ विमानतळं, आता सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय; जाणून घ्या
3
ना कोणी आले, ना गेले! केरळच्या श्री पद्मनाभस्वामी मंदिरात 'चमत्कार'; गायब झालेला सोन्याचा रॉड सापडला
4
किंमत २३९ कोटी रुपये, जगात फक्त ३ लोकांकडे आहे ही कार; कोणती आहे ही गाडी? पाहा डिटेल्स
5
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर भारताच्या 'या' 10 डोळ्यांची करडी नजर, ISRO प्रमुखांची माहिती
6
भारताचा 'तो' घाव बरोब्बर वर्मी बसला, पाकिस्तान हडबडला! नूर खान एअरपोर्टवर दडलंय युद्धविरामाचं रहस्य
7
मैत्रिणीच्या मेहंदीला गेला अन्..; प्रसिद्ध अभिनेत्याचं ३४ व्या वर्षी निधन, मनोरंजनविश्वावर शोककळा
8
९०च्या स्पीडने येत होती वंदे भारत, अचानक जोडप्याने घेतली ट्रॅकवर उडी अन्...    
9
India Pakistan War :'तुम्ही पाकिस्तानला संपवा, आम्ही त्यांच्यावर मागून हल्ला करतो'; बलुचिस्तानमधून भारताला संदेश
10
बापरे! गुरुग्राममध्ये एटीएम न फोडता १० लाख रुपये काढले; बँक अन् पोलिसांनाही कळेना
11
अमेरिका आणि चीनमधील टॅरिफ वॉर शमणार? व्हाईट हाऊसने दिली महत्त्वाची माहिती, कुणी घेतली माघार?
12
IPL खेळायला भारतात परतले तर ठीक, नाहीतर...; 'त्या' खेळाडूंविरोधात BCCI घेणार कठोर निर्णय
13
दहशतवाद्यांच्या अंत्ययात्रेत सामील झाले पाकिस्तानचे लष्करी अधिकारी, भारताने नावेच जाहीर केली!
14
..तर वयाच्या पन्नाशीआधीच २ कोटी रुपये जमा होतील; कोट्यधीश करणारा १२-१२-२५ चा फॉर्म्युला
15
सारा तेंडुलकरचा नवा व्हिडिओ व्हायरल; चाहत्यांचं लाजीरवाणं कृत्य, उडवली फिटनेसची खिल्ली
16
Ritual: महत्त्वाच्या कामाला निघताना एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? शास्त्र सांगते...
17
कतारची रॉयल फॅमिली देणार डोनाल्ड ट्रम्प यांना सर्वात महागडं गिफ्ट; ४० कोटी डॉलरचं विमान
18
...म्हणून तर आज सीमेवर शांतता नव्हती ना? भारत-पाकिस्तान युद्धविरामावर DGMO आज चर्चा करणार
19
"ते कधीच मूर्ख महिलेसाठी घर...", गोविंदासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर सुनीता आहुजानं सोडलं मौन
20
१००० रुपये किंमतीचा Jio चा प्लान आहे बेस्ट; दीर्घ वैधतेसह एन्टरटेन्मेंटचीही मजा, पाहा डिटेल्स

बारामतीचा वासुदेव रत्नागिरीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि ...

रत्नागिरी : संत नामदेवांची परंपरा शेकडो वर्षे जपणारे, स्वराज्याचे तोरण बांधताना शत्रू पक्षकडेही धाडसाने जात, तिथली बित्तंबातमी आणणारे आणि तरीही ज्ञान, लोकशिक्षणाचा वसा समाजामध्ये अखंड रुजविणारे वासुदेव म्हणजे लोककलेचा जिवंत उदाहरण आहे. मात्र, पायाला चाक लागल्यासारखे अनेक मैल पायी प्रवास करणारे हे वासुदेव काळाच्या ओघात हरवून जातात की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळेच मूळचे बारामतीचे असलेले आणि सध्या जेजुरीला वास्तव्य असलेल्या सोमनाथ गीताराम घाडगे रत्नागिरीत वासुदेव म्हणून फिरतात, तेव्हा अनेकांची नजर आश्चर्याने त्यांच्याकडे वळते.

रामप्रहरी दारी जणू ईश्वराची वाणी घेऊन येणारे वासुदेव जुन्या काळी जीवनाचा अविभाज्य घटक होते. त्यांच्याकडून आध्यात्मिक ज्ञानच नव्हे, लोकशिक्षणही घरोघरी पोहोचत होते. स्वराज्याच्या रणसंग्रामात हेच वासुदेव स्वराज्याचे पाईक म्हणवून घेत, हेरगिरीही करत होते. समाजाचा एक अविभाज्य घटक होते. मात्र, हळूहळू काळ बदलल्यानंतर मात्र समाजाला वेग आला, तरी वासुदेव मात्र काळाच्या ओघात हरवून जातो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

वासुदेव म्हणजे काय, असा प्रश्न नव्या पिढीला पडावा, इतके त्याचे दर्शन दुर्मीळ झाले असताना रत्नागिरीत वासुदेवाची स्वारी अवतरली. बारामतीचे सोमनाथ घाडगे आणि त्यांच्या परिवाराने ही परंपरा कायम राखली आहे. ते सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगा उतरून कोकणात आले आहेत. यामध्ये जनजागृती हा त्यांचा मुख्य हेतू असून, केवळ याच वर्षी नव्हे, तर दरवषी घाडगे परिवाराचा सदस्य वासुदेवाचे दर्शन कोकणवासीयांना रामप्रहरी करून देण्यासाठी येत आहेत.

पूर्वी लाेकांच्या मनात वासुदेवाबद्दल आस्था होती. काळाच्या ओघात ही आस्था कमी झाल्याची खंत त्यांनी बोलून दाखविली, तरीही आपले वडिलोपार्जित कर्तव्य आपण आणि आपला परिवार करतच असल्याचे त्यांनी सांगितले.

...................

फोटो आहे.