शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

वनराई योजनाच रूतली गाळात...

By admin | Updated: April 13, 2015 00:05 IST

चिपळूणमध्ये शेतकरी संकटात : पाणी सोडाच बंधारेही झाले नाहीत पूर्ण.

अडरे : चिपळूण तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडूनसुद्धा ग्रामीण भागाला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी पर्याय म्हणून पाणी अडवा, पाणी जिरवा या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी मिळावे, पिण्यासाठी उपयोग व्हावा. तसेच सिंचन क्षमता वाढावी म्हणून शासनाने वनराई बंधारा ही योजना सुरु केली होती. परंतु, गेली ३ वर्ष योजना बंद पडल्याने ही योजना गाळातच रुतली आहे. २०१२ साली महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजनेअंतर्गत गावागावात कामे देऊन कृषी विभागातर्फे ही योजना राबविण्याचे प्रमुख उद्दिष्ट शासनातर्फे ठरविण्यात आले होते. मागणीनुसार तसेच ग्रामस्थांना पाणी मिळावे, विहिरींच्या पातळीत वाढ व्हावी, भाजीपाला करता यावा, पाणी मुबलक उचलता यावे यांसारखी धोरणे डोळ्यासमोर ठेवून गावागावात वनराई बंधारे बांधण्याची मोहीम सुरु झाली. परंतु, या योजनेला मागणी असली तरी कायमस्वरुपी ही योजना उपयुक्त नसल्याचे दिसून आले. त्यातच रिकाम्या सिमेंटच्या बॅगांचा तुटवडा आणि योजनेसाठी आवश्यक ते अनुदान मिळत नसल्याने ही योजना अखेर गाळातच गेली.चिपळूण येथील कृषी विभागातर्फे २०१२ साली १३१ वनराई बंधारे बांधण्यासाठी ४ लाख ६४ हजार ८८० रुपये तर ११ सलग सम पातळीसह चर (डोंगर पातळीवर खड्डे पाडणे) बांधण्यात आले. यासाठी ३५ हजार ४६९ रुपये असे एकूण ५ लाख ३४९ रुपये खर्च करण्यात आले होते. २०१२ नंतर चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागात सिमेंटच्या पिशव्यांचा अभाव व अनुदानही बंद झाल्याने ही योजना बंद पडली.त्यानंतर गेली तीन वर्षांत तालुक्यात एकही वनराई बंधारा बांधण्यात आलेला नाही. वनराई बंधाऱ्यामुळे ग्रामीण भागात पाणी टंचाईवर मात करता येत होती. शेती, गुरांना मुबलक पाणी मिळायचे. परंतु, वनराई बंधारा ही योजना बंद झाल्यामुळे अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. कोकणातदेखील अनेक ठिकाणी कमीअधिक प्रमाणात असेच चित्र आहे. (वार्ताहर)कृषी विभागातील कर्मचाऱ्यांचा सहभाग व शाळेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामीण भागात श्रमदानातून वनराई बंधारे बांधून पाणी आडवा, पाणी जिरवा ही संकल्पना राबविण्यात येत होती.