शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

लसीकरण पुन्हा एकदा थांबले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:31 IST

रत्नागिरी : लस संपल्याने शनिवारी, रविवारी लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. ५ ,९३० लसी जिल्ह्यासाठी येणार ...

रत्नागिरी : लस संपल्याने शनिवारी, रविवारी लसीकरण स्थगित करण्यात आले आहे. ५ ,९३० लसी जिल्ह्यासाठी येणार असून सोमवारपासून पुन्हा लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. जिल्ह्यासाठी ३ लाख लसींची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिली.

संपूर्ण देशात लसीकरण सुरू असून, आतापर्यंत कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि ४५ वर्षे वयोगटावरील नागरिकांना प्राधान्य देण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोविड-१९ आजाराचे रुग्ण वाढत असून आतापर्यंत १४,५६० इतके रुग्ण सापडले आहेत. त्यातील ११,४२९ रुग्ण बरे झाले असून, ४२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत १,१५,९०३ लोकांनी लसीकरणाचा लाभ घेतला.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रे, जिल्हा शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये आणि नागरी आरोग्य केंद्रांमध्ये कोविड लसीकरण सत्रे घेण्यात आली आहेत.

कोविड लसीचे दोन डोस पूर्ण करणे आवश्यक आहे. हे डोस योग्य कालावधीनंतर घेऊन लसीकरण पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे.

लसीमुळे मृत्यूचा धोका टळतो

कोविड लस घेतल्यामुळे आजाराची तीव्रता कमी होते व मृत्यूचा धोका टळतो. लस घेतली म्हणजे कोविड आजारापासून आपण सामान्य माणसाप्रमाणे १०० टक्के सुरक्षित झालो असे नाही. दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे, मास्क वापरणे व वारंवार हात धुणे या बाबींचा अवलंब करावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी केले आहे.