शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणाला आजपासून पुन्हा सुरुवात -उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात ...

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. रुग्ण संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. एक नवे फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरासह तालुकास्तरावर खाजगी डाॅक्टरांच्या सहकार्याने कोरोना सेंटरमध्ये उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, टास्कफोर्स यांच्याशी बैठकीत चर्चा केल्यानंतर सांमत यांनी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी आपल्या सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची दखल शासन व प्रशासन घेईल; परंतु कोरोनाच्या काळात सर्वांना एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात २०३८ बेड उपलब्ध असून त्यामध्ये ५३७ ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लांट जिल्हा रुग्णालयात सुरू केला जाईल, तोपर्यंत आवश्यक ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. औषधे,इंजेक्शन सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास महाविद्यालय, वसतिगृहे इतर इमारती ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

व्यापाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची दखल घेतली जाईल. व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून नका, असे आदेश दिले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅम्प लावून लसीकरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास महाविद्यालये, वसतिगृहे व इतर इमारती ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करून ठेवले जातेय; परंतु असे रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रुग्ण स्वत:बरोबर इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्याची दखल घेऊन वेळ पडल्यास कोरोनाबाधित सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.