शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
3
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
4
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
5
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
6
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
7
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
8
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
9
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
10
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
11
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
12
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख
13
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
14
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
15
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
16
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
17
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
18
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
19
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
20
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...

लसीकरणाला आजपासून पुन्हा सुरुवात -उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:29 IST

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात ...

रत्नागिरी : लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. रुग्ण संख्या वाढत असताना वैद्यकीय अधिकाऱ्याची कमतरता भासत आहे. एक नवे फिजिशियन जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहेत. तसेच रत्नागिरी शहरासह तालुकास्तरावर खाजगी डाॅक्टरांच्या सहकार्याने कोरोना सेंटरमध्ये उपचार उपलब्ध करण्याच्या सूचना जिल्हा शल्यचिकित्सकांना केल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्ष, व्यापारी, टास्कफोर्स यांच्याशी बैठकीत चर्चा केल्यानंतर सांमत यांनी झूम ॲपद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. राजकीय पक्षांच्या बैठकीला सर्व पक्षांचे प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी आपल्या सूचना केल्या आहेत. त्या सूचनांची दखल शासन व प्रशासन घेईल; परंतु कोरोनाच्या काळात सर्वांना एकत्र येऊन लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढा देण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात २०३८ बेड उपलब्ध असून त्यामध्ये ५३७ ऑक्सिजन बेडचा समावेश आहे. येत्या आठ दिवसात ऑक्सिजन प्लांट जिल्हा रुग्णालयात सुरू केला जाईल, तोपर्यंत आवश्यक ऑक्सिजन साठा उपलब्ध आहे. औषधे,इंजेक्शन सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास महाविद्यालय, वसतिगृहे इतर इमारती ताब्यात घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्याची माहितीही मंत्री सामंत यांनी दिली.

व्यापाऱ्यांशीही चर्चा करण्यात आली आहे. त्यांनी ज्या सूचना केल्या आहेत, त्याची दखल घेतली जाईल. व्यापाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारून नका, असे आदेश दिले आहेत. लस उपलब्ध झाल्यानंतर व्यापाऱ्यांसाठी स्वतंत्र कॅम्प लावून लसीकरण केले जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.

लसीचा साठा संपल्यामुळे लसीकरण थांबले होते; परंतु आता लस उपलब्ध झाल्याने बुधवारपासून पुन्हा लसीकरणाला सुरुवात होईल. कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्यास महाविद्यालये, वसतिगृहे व इतर इमारती ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना प्रशासनाला करण्यात आल्या आहेत. कोरोनाबाधित परंतु लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरण करून ठेवले जातेय; परंतु असे रुग्ण घराबाहेर फिरत असल्याचे निदर्शनास येत आहे. याबाबत रुग्ण स्वत:बरोबर इतरांचे जीव धोक्यात घालत आहेत. त्याची दखल घेऊन वेळ पडल्यास कोरोनाबाधित सर्व रुग्णांना संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्याचा इशारा सामंत यांनी दिला आहे.