शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राजापुरात ४,१०० लोकांना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST

राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण ...

राजापूर : शहरातील तब्बल ४,१०० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून, ५ जूनपासून नगर परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या प्रभागनिहाय लसीकरण मोहिमेत सुमारे १,०५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दरम्यान, शहरात सध्या कोरोनाचे २३ रुग्ण ॲक्टिव्ह आहेत.

मोफत रोपे वाटप

देवरुख : पांगरी ग्रामपंचायतीमधील पदाधिकाऱ्यांनी प्रदूषणाचे वाढते प्रमाण कमी करण्यासाठी वृक्षलागवड, वृक्ष संवर्धनाची धडक मोहीम हाती घेतली आहे. ग्रामपंचायत क्षेत्रात प्रत्येक कुटुंबाला रोपांचे मोफत वाटप करून संवर्धनाची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात आली आहे.

पूल वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी : रत्नागिरी कोस्ट गार्डने विमानतळाचे काम हाती घेतल्यानंतर या परिसरातून जाणारा रस्ता आणि पाण्याची पाइपलाइन मुंबई उपकेंद्राच्या समोरून वळविण्यात आली. तसेच त्या ठिाकाणचा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.

फगरवठार येथील रस्ता सुरळीत

रत्नागिरी : शहरातील खालचा फगरवठार येथे तीव्र उतारावर आंब्याचे झाड पडल्याने संपूर्ण रस्ता बंद झाला होता. तसेच महावितरणचेही मोठे नुकसान झाले. उपनगराध्यक्ष रोशन फाळके यांच्या प्रयत्नाने हे आंब्याचे झाड हटविण्यात आल्याने रस्ता सुरळीत सुरू झाला.

मिरकरवाडा येथील कार्यालयाची दुरवस्था

रत्नागिरी : शहरातील मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी, मिरकरवाडा येथील कार्यालय पूर्णपणे जीर्ण झाले आहे. ते कधीही कोसळू शकते, अशी स्थिती निर्माण झाली आहे. याकडे मत्स्यव्यवसाय मंत्र्यांनी लक्ष देण्याची मागणी मच्छीमारांकडून पुढे येत आहे.

पेन्शनची कामे रखडली

राजापूर : तालुक्यातील वाटूळ येथील पोस्ट कार्यालयातील इंटरनेट सुविधा गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने या कार्यालयाचा कारभार ठप्प झाला आहे. यामुळे लाेकांच्या ठेवी भरणे, काढणे, संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन व पोस्टातील कर्मचाऱ्यांच्या पेन्शनची कामे रखडरली आहेत.

आरोग्य विभागाचे दुर्लक्ष

राजापूर : तालुक्यात रुग्णवाहिकांची कमतरता असताना बंद पडणाऱ्या रुग्णवाहिका दुरुस्तीकडे आरोग्य विभाग दुर्लक्ष करीत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. राजापूर तालुका आरोग्य विभागाची रुग्णवाहिका नादुरुस्त झाली असल्याने पांगरे येथे बेवारस स्थितीत अनेक दिवस ठेवण्यात आलेली आहे.