शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

शस्त्राचा वापर करणे झाले प्रतिष्ठेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : अलिकडच्या काळात विविध कारणांमुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगणे प्रतिष्ठेचे झाले आहे. रत्नागिरी जिल्हा तसा शांतताप्रिय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : अलिकडच्या काळात विविध कारणांमुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्रे बाळगणे प्रतिष्ठेचे झाले आहे. रत्नागिरी जिल्हा तसा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने तसा शस्त्राचा गैरवापर करण्याच्या घटना अगदीच अल्प आहेत. त्यामुळे जिल्ह्यात आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणाऱ्यांचीही संख्या कमी आहे. जिल्ह्यात जून २०२१ अखेर १,३६२ जणांकडे आत्मसंरक्षणासाठीच्या शस्त्राचे परवाने आहेत.

काहीवेळा व्यक्तीला पूर्ववैमनस्यातून जीवाला धोका आहे, असे वाटत असते, त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागितला जातो. राजकीय हेव्यादाव्यातूनही काहींना परवाना हवा असतो. काही व्यावसायिकांना समव्यावसायिकांकडून धोका वाटतो, काहींना मालमत्तेला धोका असल्याचे वाटते. त्यामुळे या व्यक्ती आत्मसंरक्षणासाठी शस्त्र परवाना मागू शकतात. मात्र, शस्त्र परवाना देताना त्याचा गैरवापर होण्याचा धोका लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाला अधिक खबरदारी घेऊनच परवाने द्यावे लागतात. दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यात झालेल्या हल्ल्यामुळे प्रशासनाने अधिक खबरदारी घेत परवाना अत्यावश्यक बाबींसाठी देण्यास सुरूवात केली आहे.

सध्या अद्ययावतीकरणाचे काम सुरू आहे. परवानाधारक असलेल्या मयत व्यक्ती, नूतनीकरण न केलेले अशांचे परवाने रद्द करण्याचे काम सुरू झाले आहे. त्याचबरोबर नवीन परवाना देताना पोलीस यंत्रणेकडूनही काटेकाेर पडताळणी केली जात आहे.

परवाना कसा काढायचा

परवाना काढताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे यासाठी प्रमाणपत्र आवश्यक असते. त्याचप्रमाणे वैद्यकीय प्रमाणपत्र, पोलीस पाटील, तलाठी यांचा दाखला, पोलीस यंत्रणेकडून गुन्ह्यांची पडताळणी होते. यानंतर जिल्हाधिकारी यांच्या सुनावणीनंतरच परवाना दिला जातो.

रत्नागिरीत सर्वाधिक, गुहागरात सर्वात कमी

रत्नागिरी हे तालुका आणि जिल्ह्याचेही ठिकाण असल्याने राजकीय, बडे व्यावसायिक, धनवान व्यक्ती यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रत्नागिरी तालुक्यात ५१३ परवानाधारक आहेत.

गुहागर तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ४३ तसेच लांजा आणि मंडणगड तालुक्यातही लोकसंख्या कमी असल्याने या दोन्ही तालुक्यांत ४८ शस्त्र परवानाधारक आहेत.

रत्नागिरी जिल्हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे आत्मसंरक्षणासाठी शस्त्र वापरणाऱ्यांकडून तसा गैरवापर केल्याच्या घटना गेल्या दोन वर्षात घडलेल्या नाहीत.

परवाना देताना जिल्हा प्रशासन अधिक दक्ष

बरेचदा गरज नसतानाही काहीजणांना शस्त्रे वापरणे प्रतिष्ठेचे वाटते. अशांवर अंकुश आणणे गरजेचे आहे.

परवाना मिळण्यासाठी अतिशय किचकट प्रक्रिया आहे. काहीवेळा राजकीय बळाचा वापर परवाना मिळविण्यासाठी होतो.

शस्त्र परवान्याचा होणारा दुरूपयोग लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने कडक धोरण अवलंबले आहे.

पाच वर्षांत वाढले परवाने...

सध्या राजकारणातही अंतर्गत वाद विकोपाला जावू लागले आहेत. त्यामुळे प्रत्येकालाच आपल्याला आत्मसंरक्षण मिळण्याची गरज असल्याचे वाटत आहे. तसेच काही व्यक्तींकडे अमाप पैसा आल्याने मालमत्ता संरक्षणासाठी त्यांना शस्त्र बाळगण्याची गरज वाटू लागली आहे. वादातून हल्ले वाढल्याने आता आत्मसंरक्षणासाठीचे परवाने वाढले आहेत.

शस्त्र सांभाळणे कठीण

१ काहीवेळा कुटुंबामध्ये वाद होण्याची शक्यता असते. अशावेळी रागाच्या भरात आत्मसंरक्षणासाठी घेतलेल्या शस्स्त्राचा गैरवापर होण्याचा धोका असतो. त्यामुळेच परवाना देताना घरातील सर्व सदस्यांचे प्रतिज्ञापत्र घेतले जाते.

२ निवडणुका सर्वच राजकीय पक्षांच्या दृष्टीने प्रतिष्ठेच्या असतात. अशावेळी राजकीय वैरातून शस्त्राचा वापर होण्याचा धोका राजकीय कार्यकर्त्यांकडून असतो. त्यामुळे जिल्ह्यात निवडणुका जाहीर होताच परवानधारकांना शस्त्रे प्रशासनाकडे जमा करावी लागतात.

स्टार ८७५