शहरं
Join us  
Trending Stories
1
नितीश कुमार 10व्यांदा होणार बिहारचे मुख्यमंत्री; NDA च्या बैठकीत शिक्कामोर्तब, उद्या शपथविधी
2
राफेलला बदनाम करण्यासाठी..., चीनने भारत-पाक युद्धात एआय फोटो व्हायरल केले, अमेरिकी अहवालात धक्कादायक खुलासा
3
मुंबईत बांधकाम व्यावसायिकाला भरदिवसा घातल्या गोळ्या; कारमध्ये बसलेले असताना झाडल्या गोळ्या
4
बाजारात जोरदार 'यू-टर्न'! IT क्षेत्रात बंपर खरेदी, एचसीएल-टीसीएससह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी
5
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
6
बस अपघातात मृत्युमुखी पडलेल्या ४५ भारतीयांचे अंत्यसंस्कार सौदी अरेबियातच होणार! कुटुंबीयांनी दिली मंजूरी
7
PPF मध्ये विना गुंतवणूक करताच दर महिन्याला कमावू शकता २४ हजार रुपये; वापरू शकता 'ही' पद्धत
8
ठरलं! RSS सरसंघचालक मोहन भागवत मणिपूरला जाणार; जातीय हिंसाचारानंतर प्रथमच ३ दिवसीय दौरा
9
कार्तिक अमावस्या २०२५: गुरुवार, २० नोव्हेंबर कार्तिक अमावस्या; 'या' ७ राशींना छोटी चूकही पडू शकते महाग
10
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
11
आयकर अधिकाऱ्यांच्या रडारवर 'ही' दिग्गज कंपनी; स्टॉक विक्रीसाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, शेअर आपटला
12
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
13
सिनेमाच्या स्टोरीला शोभणारा प्रकार ! बँक मॅनेजर बनला चोर ; ऑनलाईन गेमिंगच्या नादात बँकेतून केली १ कोटी ५८ लाखांची चोरी
14
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
15
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
16
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
17
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
18
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
19
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
20
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या नियोजनशून्य कामाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामामुळे महामार्गावर एसटी स्टँड तसेच कोदवली साईनगर परिसरात व राजापूर-शिळ मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पादचारी व वाहनचालकांना बसत आहे. मान्सूनपूर्व पावसाने महामार्गाच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या या मनमानीकडे प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे केलेले दुर्लक्ष भविष्यात अनेकांच्या जीवावर बेतणार आहे़ गेले दोन ते तीन वर्षे तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज नसलेल्या महामार्ग व्यवस्थापनाचे नियोजन फसल्याने गत दोनवर्षी पावसात माेठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला होता.

मात्र, यावेळी जिल्हा प्रशासनाने ताैक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात वादळी वारे आणि पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत दिले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतेच नियोजन केलेले नाही़ त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या कोदवली पेट्रोलपंप ते एसटी डेपो सारंग बाग परिसरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले हाेते़ माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास वा महामार्गावर पाणी तुंबल्यास पर्यायी व्यवस्थाच व्यवस्थापनाकडे नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे तर महामार्गावर अर्जुना नदीवर पुल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गतवर्षी नदीपात्र आणि कोंढेतड भागाकडील पिलरचे काम पावसाळ्यापूर्वी आटोपण्यात आले होते तर नदीअलीकडील शीळ मार्गावर पिलरचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नदीपात्रात पूर्णपणे भराव टाकून पाणी अडविण्यात आले तर नदीपात्रातूनच पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गेले वर्षभर अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असून एका पिलरच्या बांधकामासाठी वर्षभर नदीपात्र अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम सुरू असताना भराव्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे दलदल निर्माण झाली आहे. त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे़