शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या नियोजनशून्य कामाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामामुळे महामार्गावर एसटी स्टँड तसेच कोदवली साईनगर परिसरात व राजापूर-शिळ मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पादचारी व वाहनचालकांना बसत आहे. मान्सूनपूर्व पावसाने महामार्गाच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या या मनमानीकडे प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे केलेले दुर्लक्ष भविष्यात अनेकांच्या जीवावर बेतणार आहे़ गेले दोन ते तीन वर्षे तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज नसलेल्या महामार्ग व्यवस्थापनाचे नियोजन फसल्याने गत दोनवर्षी पावसात माेठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला होता.

मात्र, यावेळी जिल्हा प्रशासनाने ताैक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात वादळी वारे आणि पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत दिले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतेच नियोजन केलेले नाही़ त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या कोदवली पेट्रोलपंप ते एसटी डेपो सारंग बाग परिसरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले हाेते़ माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास वा महामार्गावर पाणी तुंबल्यास पर्यायी व्यवस्थाच व्यवस्थापनाकडे नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे तर महामार्गावर अर्जुना नदीवर पुल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गतवर्षी नदीपात्र आणि कोंढेतड भागाकडील पिलरचे काम पावसाळ्यापूर्वी आटोपण्यात आले होते तर नदीअलीकडील शीळ मार्गावर पिलरचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नदीपात्रात पूर्णपणे भराव टाकून पाणी अडविण्यात आले तर नदीपात्रातूनच पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गेले वर्षभर अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असून एका पिलरच्या बांधकामासाठी वर्षभर नदीपात्र अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम सुरू असताना भराव्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे दलदल निर्माण झाली आहे. त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे़