शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या नियोजनशून्य कामाचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:31 IST

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या ...

राजापूर : तौक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात रविवार आणि सोमवारी झालेल्या मुसळधार पर्जन्यवृष्टीमुळे अत्यंत धीम्या गतीने आणि नियोजनशून्य पद्धतीने सुरू असलेल्या महामार्ग चौपदरीकरण कामामुळे महामार्गावर एसटी स्टँड तसेच कोदवली साईनगर परिसरात व राजापूर-शिळ मार्गावर दलदल निर्माण झाली आहे. त्याचा फटका सर्वसामान्य पादचारी व वाहनचालकांना बसत आहे. मान्सूनपूर्व पावसाने महामार्गाच्या नियोजन शून्य कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, पावसाळ्यापूर्वी योग्य ती खबरदारी न घेतल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महामार्ग चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदाराच्या या मनमानीकडे प्रशासनातील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे केलेले दुर्लक्ष भविष्यात अनेकांच्या जीवावर बेतणार आहे़ गेले दोन ते तीन वर्षे तालुक्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, कोकणातील भौगोलिक आणि नैसर्गिक परिस्थितीचा अंदाज नसलेल्या महामार्ग व्यवस्थापनाचे नियोजन फसल्याने गत दोनवर्षी पावसात माेठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला होता.

मात्र, यावेळी जिल्हा प्रशासनाने ताैक्ते चक्रीवादळामुळे तालुक्यात वादळी वारे आणि पर्जन्यवृष्टी होण्याचे संकेत दिले असताना मोठ्या प्रमाणात पाऊस झालेल्या सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी कोणतेच नियोजन केलेले नाही़ त्यामुळे सध्या काम सुरू असलेल्या कोदवली पेट्रोलपंप ते एसटी डेपो सारंग बाग परिसरात महामार्गावर चिखलाचे साम्राज्य पसरले हाेते़ माेठ्या प्रमाणात पाऊस झाल्यास वा महामार्गावर पाणी तुंबल्यास पर्यायी व्यवस्थाच व्यवस्थापनाकडे नसल्याने त्याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे तर महामार्गावर अर्जुना नदीवर पुल बांधण्याचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. गतवर्षी नदीपात्र आणि कोंढेतड भागाकडील पिलरचे काम पावसाळ्यापूर्वी आटोपण्यात आले होते तर नदीअलीकडील शीळ मार्गावर पिलरचे काम पावसाळ्यानंतर हाती घेण्यात आले आहे. त्यासाठी नदीपात्रात पूर्णपणे भराव टाकून पाणी अडविण्यात आले तर नदीपात्रातूनच पर्यायी मार्ग काढण्यात आला आहे. गेले वर्षभर अत्यंत धीम्या गतीने हे काम सुरू असून एका पिलरच्या बांधकामासाठी वर्षभर नदीपात्र अडविण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी काम सुरू असताना भराव्यासाठी टाकण्यात आलेल्या मातीमुळे दलदल निर्माण झाली आहे. त्यातून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे़