शहरं
Join us  
Trending Stories
1
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
2
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
3
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
4
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
5
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
6
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
7
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
8
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
9
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
10
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
11
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
12
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
13
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
14
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
15
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
16
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
17
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
18
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

शेतकऱ्यांसाठी अनोखी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती, कीड रोगापासून शेतीचे हाेणारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना ...

रत्नागिरी : नैसर्गिक आपत्ती, कीड रोगापासून शेतीचे हाेणारे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी अनोखी प्रधानमंत्री पीक विमा योजना जाहीर करण्यात आली आहे. कर्जदार, बिगर कर्जदार शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात.

इफ्को टोकिओ जनरल इन्सुरन्स कंपनीची यासाठी निवड करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्ह्याची या पीक विमा योजनेसाठी निवड करण्यात आली असून, भात व नाचणी पिकाचा समावेश करण्यात आला आहे. भातासाठी एका हेक्टरकरिता ४५ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कम जाहीर करण्यात आली आहे, तर नाचणीसाठी २० हजार रुपये निश्चित केली आहे. भातासाठी ९१० रुपये, तर नाचणीसाठी ४०० रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांसाठी निश्चित केला आहे. या योजनेअंतर्गत शेतकरी १५ जुलैपयेत सहभागी होऊ शकतात.

हवामानातील घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकाचे होणारे नुकसान, पेरणीपासून काढणीपर्यंत नैसर्गिक आपत्ती, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पूरक्षेत्र, जलमय, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड यामुळे उत्पन्नात होणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, नैसर्गिक कारणांमुळे पिकांचे होणारे काढणीपश्चात नुकसान पीक विमा योजनेसाठी ग्राह्य धरले जाणार आहे. शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.