शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

माडाच्या पात्यापासूनची बनवली अनोखी टोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:34 IST

संकेत गाेयथळे / गुहागर : गुहागर शहरातील तांबडवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र मालप यांनी माडांच्या पात्यांंपासून विणलेली अनोखी टोपी सध्या ...

संकेत गाेयथळे / गुहागर : गुहागर शहरातील तांबडवाडी येथे राहणाऱ्या रवींद्र मालप यांनी माडांच्या पात्यांंपासून विणलेली अनोखी टोपी सध्या शहरात आकर्षण ठरत आहे.

रवींद्र मालप हे गुहागर शहरातील गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या स्कूलमध्ये शिपाई या पदावर कार्यरत आहेत. पूर्वीपासूनच वेगळे काही तरी करण्याची आवड त्यांच्यात होती. यातूनच आपले शिक्षण पूर्ण झाल्यानंतर गुहागर शहरातील पहिला जादूचे प्रयोग करणारा जादूगार म्हणून ओळख निर्माण केली होती. पुढे काळानुसार जादुगिरी हा विषय पाटी पडला. गुहागर एज्युकेशन सोसायटीच्या स्कूलमध्ये शिपाई या पदावर रुजू झाले तरीही त्यांच्यामधील कलाकार स्वस्थ बसू देत नव्हता. तालुक्यात अनेक पर्यटक येतात, त्यांना गुहागरची अशी वेगळी वस्तू नेता आली पाहिजे, अशी संकल्पना मालप यांच्या डोक्यात घोळू लागली. यातूनच गुहागरी नारळ झाडांपासून काहीतरी वेगळे निर्माण करावे, असा मनात ध्यास घेतला. नारळाच्या पात्यांपासून टोपी करण्यासाठी विविध माध्यमांवर माहिती घेण्यास सुरुवात केली. सुरुवातीला टोपी बनविताना अडचणी आल्या. परंतु सातत्याने प्रयत्न केल्यानंतर एक वेगळ्या प्रकारची अनोखी टोपी बनविण्यास त्यांना यश आले. गुहागर शहरात जेव्हा मालप टोपी घालून फिरतात तेव्हा सर्वांच्या नजरा ही टोपी खेचून घेते. अनेकांनी मालप यांना अशी टोपी बनवून देण्याच्या ऑर्डरही देण्यास सुरुवात केली आहे.

---------------------------

गुहागर शहरात तालुक्यात माडाची झाडे खूप असल्याने माडाच्या झावळीपासून झाप तयार केले जातात अशाच पद्धतीने काही वेगळी वस्तू निर्माण करता येऊ शकतात का? तसेच गुहागरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना काहीतरी वेगळे देण्याच्या उद्देशाने गुहागरी वस्तूंपासून अशा प्रकारचे वेगळी टोपी तयार केली आहे. भविष्यात जेव्हा पर्यटन सुस्थितीत सुरु होईल तेव्हा अशा टोप्या व याच बरोबर अन्य काही वस्तू हस्त कलेतून बनवून गुहागरची वेगळी ओळख निर्माण करण्याचा आपला मानस आहे.

- रवींद्र मालप

-----------------------

केवळ माडाच्या बारा पात्या

ही टोपी बनविण्यासाठी केवळ माडाच्या बारा पात्या (पाने) लागतात. सुरुवातीला या पात्या ओल्या असल्याने टोपी हिरवी दिसते. त्यानंतर पात्या सुकल्यानंतर टोपीचा थोडाफार रंग बदलतो. अनेक महिने ही टोपी चांगली राहते. नैसर्गिक रंगाचा या टोपीबरोबरच याला वेगवेगळे रंग देऊन ग्राहकाच्या आवडीनुसार रंगीबेरंगी टोपी टोप्या करता येऊ शकतात.