शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

भूूखंडासाठी ‘अखंड’ ध्यास...

By admin | Updated: May 21, 2015 00:01 IST

रत्नागिरी नगरपरिषद : आरक्षणे उठवून कोणाचा ‘विकास’ साधला जाणार ?

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेत शहरातील भूखंडांवरील आरक्षणे उठविण्यास असलेला विरोध डावलून गोंधळातच ठराव मंजूर करून घेण्यात आला. शहर विकासाच्या गोंडस नावाखाली भूखंडांवरील आरक्षणे उठवून श्रीखंड चाखण्याचा हा काही पुढाऱ्यांचा खटाटोप असून, शहराचा विकास होवो न होवो, काही पुुढाऱ्यांनी भूखंडासाठीच ‘अखंड’ ध्यास धरल्याच्या तीव्र प्रतिक्रिया शहरवासीयांतून उमटत आहेत. आरक्षणातील ७५ टक्के जमिनी मूळ मालकांना देऊन ‘कारभारी’ शहराचा विकास साधणार की विकासकांचा, असा सवाल केला जात आहे. त्यामुळे आरक्षणे उठविण्याच्या या प्रकरणामागे संशयाचे धुके गडद झाले आहे. नगरपरिषदेच्या बुधवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत भूखंडांवरील आरक्षणे उठविण्यास सदस्यांनी विरोध केला. मात्र, विरोधक किती हे नोंदवून घेतले गेले. आरक्षणे उठविण्याच्या बाजूने किती सदस्य आहेत, तटस्थ किती, याची दखलच घेतली गेली नाही. हा ठराव मतदानाला घेण्याची आमची मागणी धुडकावून लोकशाहीचा गळा घोटण्यात आला. पुन्हा एकदा पालिकेत २००१ ते २००६ मधील ‘राज’ सुरू झाले आहे, नगराध्यक्ष महेंद्र मयेकर हे चुकीचा पायंडा पाडत आहेत, मतदानाबाबतचा सदस्यांचा अधिकार नाकारत आहेत, असा आरोप मिलिंद कीर यांच्यासह अनेक सदस्यांनी सभेत केला होता. तसेच याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे न्याय मागणार असल्याचेही सांगितले होते. त्यानुसार आता याप्रकरणी तपशीलवार पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले जाणार आहे.रत्नागिरी शहरात १४२ आरक्षित भूखंड आहेत. त्यातील काही भूखंड विकसित करण्यात आले. मात्र, अनेक भूखंड पैसे भरून ताब्यात घेण्यास व विकसित करण्यास पालिकेकडे निधी नाही. त्यामुळे मूळ मालकही या जमिनींचा ताबा मिळावा म्हणून पाठपुरावा करीत आहेत. परंतु भविष्यातील विकसित होणाऱ्या या शहराच्या विस्ताराचा दूरदृष्टीने विचार न करताच सरसकट भूखंडावरील आरक्षणे उठविण्यात आली, तर शहराच्या भविष्यकालीन विकासाला खीळ बसणार आहे.राज्यभरातील सर्वच पालिकांना आरक्षित भूखंड ताब्यात घेऊन विकास करण्यात अडचणी येत असल्यानेच ७५ टक्के जमिनी मूळ मालकांना देऊन २५ टक्के जमीन पालिकांनी घ्यावी, असा शासनादेश निघाला आहे. त्याचबरोबर ट्रान्स्फरेबल डेव्हलपमेंट राईट ही योजनाही शासन राबवित असून, त्याअंतर्गत आरक्षित जमिनीचा बाजारभावाने मोबदला शासनाकडून जमीनमालकांना दिला जाणार असून, जमीन पालिकांना मिळणार आहे. त्यामुळे या टीडीआर योजनेच्या लाभासाठी काही काळ थांबण्याची मिलिंद कीर व अन्य सदस्यांची मागणी धुडकावण्यामागे कोणाचे हित जोपासले जात आहे, असा संतप्त सवाल केला जात आहे. (प्रतिनिधी)स्मार्ट सिटी रत्नागिरीची ‘स्मार्ट लूट’?राज्यातील रत्नागिरीसह १२ शहरांचा ‘स्मार्ट सिटी’ म्हणून विकास केला जाणार आहे. त्यामुळे विकासकामांसाठी शासनच रत्नागिरी शहराला निधी देणार आहे. हा निधी आरक्षित भूखंड ताब्यात घेण्यासाठीही मिळू शकेल. असे असताना आरक्षणे उठवून ‘स्मार्ट लूट’ करण्याचा हा प्रयत्न थांबवा, अशी मागणी होत आहे. आरक्षणे उठविण्याआधीच तेथील विकासकही ठरल्याची चर्चा आहे.