शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जिल्हा परिषद उपाध्यक्षपदी उदय बने बिनविराेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:30 IST

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उदय बने यांच्या वतीने राेहन बने यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज ...

रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत उदय बने यांच्या वतीने राेहन बने यांनी प्रांताधिकारी विकास सूर्यवंशी यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. (छाया : तन्मय दाते)

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या तडजाेडीनंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित करण्यात आले हाेते. उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी डाॅ. विकास सूर्यवंशी यांनी उदय बने यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर केले. मात्र, उदय बने यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याने त्यांच्या अनुपस्थितीतच ही निवडणूक पार पडली.

शिवसेनेचे पूर्ण बहुमत असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेतील पदांसाठी सव्वा वर्षाचा कालावधी निश्चित करण्यात आला हाेता. त्यानुसार राेहन बने यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला हाेता. त्यांच्यानंतर या पदासाठी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते उदय बने, आमदार भास्कर जाधव यांचे सुपुत्र विक्रांत जाधव यांची नावे चर्चेत हाेती. अध्यक्षपदासाठी उदय बने प्रबळ दावेदार मानले जात असतानाच महाविकास आघाडीचा फाॅर्म्युला पाळत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रांत जाधव यांना अध्यक्षपद तर उदय बने यांना उपाध्यक्षपद देण्याचे निश्चित झाले हाेते. उपाध्यक्षपद देताना कृषी विभाग काढून त्याऐवजी आराेग्य व बांधकाम समिती देण्याचा निर्णय घेण्यात आला हाेता. त्याला उदय बने यांनी सहमती दर्शविल्याने उपाध्यक्षपदासाठी त्यांचे नाव निश्चित झाले हाेते. साेमवारी केवळ त्यावर शिक्कामाेर्तब करण्यात आले.

निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. विकास सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत साेमवारी निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. या वेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) अर्चना वाघमळे आणि जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव उपस्थित हाेते.

उदय बने यांचा काेराेना अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या वतीने माजी जिल्हा परिषद अध्यक्ष राेहन बने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. उदय बने यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले.

चाैकट

प्रथमच समितीची अदलाबदल

जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम १९६१ चे कलम ८३ अन्वये उपाध्यक्षांना विषय समितीचे प्रभारी अधिकार दिल्याचे जाहीर केले. जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच समितींची अदलाबदल करण्यात आली. ही अदलाबदल करताना उपाध्यक्षांकडील कृषी विभाग काढून त्याऐवजी आरोग्य व बांधकाम समिती सोपवण्यात आली आहे.