शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

दररोज दिवसातून दोन वेळा पाण्याच्या वेढ्यामध्ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 01:04 IST

जैतापुरातील व्यथा : पाण्याच्या प्रवाहातून विकासाच्या प्रवाहात कधी जाणार; कुटुंबाचा सवाल

जैतापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असताना विकासापासून वंचित राहिलेल्या याच गावातील दोन घरांना दिवसातून दोनदा पाण्याचा वेढा पडतो आणि गावाशी संपर्क तुटतो. खाडीच्या पाण्याचा वेढा दरदिवशी पडत असताना जीव मुठीत धरून जीवन जगणारे हे कुटुंबिय विकासाच्या प्रवाहात येणार तरी कधी? लोकप्रतिनीधींच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.अनेक वर्षांपासून जैतापुरातील पीरवाडी येथील जयवंती श्रीधर गोठणकर आणि प्रभाकर गोठणकर या कुटुंबियांचे वास्तव्य असलेल्या घरांच्या सभोवती चारही बाजूनी खाडीचे पाणी भरते. घराच्या सभोवती (चिपी) तिवराची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. दिवसातून दोनदा येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा वेढा या घराना पडतो आणि थेट संपर्क तुटतो. आपल्या दैनंदिन कामांसाठी किंवा मुलांना शाळेत यायचे असेल तर भरतीच्या वेळा बघूनच बाहेर पडावे लागते नाहीतर पाण्यातूनच वाट काढण्याशिवाय पर्याय नाही.दरदिवशी या घरातील माणसांना गावात येण्यासाठी खाडीतलाच मार्ग आहे. चिपीच्या झाडांमधून मार्ग काढीत आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी बाजारात यावे लागते. या कुटुंबियांची अवस्था दयनीय असून, जयवंती गोठणकर याना सन २०११/१२मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल मिळाले आहे. मात्र, घरापर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही.कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी काही जनावरे पाळली असून, त्यांनाही अनेकवेळा पाण्यातूनच बाहेर आणावे लागते. त्यांचा चारा-पाणीही बाहेरून आणवा लागतो, यासाठी कसरत नेहमीचाच भाग झाला आहे.अत्यंत गरीबीत जीवन जगणाऱ्या जयवंती गोठणकर यांचे सहा माणसांचे कुटुंब आहे. गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोठणकर यांचे वय ७५ वर्षे आहे. दोन मुलगे, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. खाडीच्या पाण्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलाना होणारा त्रास, आजारपणात उपचारासाठी जाताना होणारा त्रास सहन करीत जीवन जगत असलेल्या कुटुंबियांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गोठणकर कुटुंबियांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ही बाब येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भास्कर मांजरेकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून पालकमंत्र्यापर्यंत सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न लेखी निवेदनांद्वारे केला आहे. (वार्ताहर)