शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तराखंडच्या राज्यपालांचा धामींना धक्का ! UCC दुरुस्ती व धर्मांतर विरोधी सुधारणा विधेयक परत पाठविले
2
न्यायाधीशांना ई-मेल पाठवून नागपूर जिल्हा न्यायालयात बॉम्बस्फोट करण्याची धमकी
3
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
4
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
5
‘मला उमेदवारी द्या, अन्यथा माझ्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास पक्ष जबाबदार राहील’, भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याची धमकी
6
चांदीची 'पांढरी' लाट! सोन्याला मागे टाकत गाठला २ लाखांचा ऐतिहासिक टप्पा; काय आहेत भाववाढीची कारणे?
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी अचानक का वापरलं 'भारत मॉडेल'?; मिड टर्म निवडणुकीपूर्वी अमेरिकेत मोफत खैरात
8
'पुढे दरोडा पडलाय, दागिने काढून ठेवा'; पोलिसांच्या वेशातील टोळीचा पर्दाफाश, लोकांना घाबरवून लुटायचे
9
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
10
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे २९ महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
11
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
12
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
13
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
14
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
15
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
16
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
17
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
18
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
19
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
20
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
Daily Top 2Weekly Top 5

दररोज दिवसातून दोन वेळा पाण्याच्या वेढ्यामध्ये...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2016 01:04 IST

जैतापुरातील व्यथा : पाण्याच्या प्रवाहातून विकासाच्या प्रवाहात कधी जाणार; कुटुंबाचा सवाल

जैतापूर : राजापूर तालुक्यातील जैतापूर गावाचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजत असताना विकासापासून वंचित राहिलेल्या याच गावातील दोन घरांना दिवसातून दोनदा पाण्याचा वेढा पडतो आणि गावाशी संपर्क तुटतो. खाडीच्या पाण्याचा वेढा दरदिवशी पडत असताना जीव मुठीत धरून जीवन जगणारे हे कुटुंबिय विकासाच्या प्रवाहात येणार तरी कधी? लोकप्रतिनीधींच्या संवेदना बोथट झाल्या आहेत.अनेक वर्षांपासून जैतापुरातील पीरवाडी येथील जयवंती श्रीधर गोठणकर आणि प्रभाकर गोठणकर या कुटुंबियांचे वास्तव्य असलेल्या घरांच्या सभोवती चारही बाजूनी खाडीचे पाणी भरते. घराच्या सभोवती (चिपी) तिवराची झाडे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहेत. दिवसातून दोनदा येणाऱ्या भरतीच्या पाण्याचा वेढा या घराना पडतो आणि थेट संपर्क तुटतो. आपल्या दैनंदिन कामांसाठी किंवा मुलांना शाळेत यायचे असेल तर भरतीच्या वेळा बघूनच बाहेर पडावे लागते नाहीतर पाण्यातूनच वाट काढण्याशिवाय पर्याय नाही.दरदिवशी या घरातील माणसांना गावात येण्यासाठी खाडीतलाच मार्ग आहे. चिपीच्या झाडांमधून मार्ग काढीत आपल्या दैनंदिन व्यवहारासाठी बाजारात यावे लागते. या कुटुंबियांची अवस्था दयनीय असून, जयवंती गोठणकर याना सन २०११/१२मध्ये ग्रामपंचायतीच्या वतीने घरकुल मिळाले आहे. मात्र, घरापर्यंत जाण्यासाठी मार्गच नाही.कुटुंबाने उदरनिर्वाहासाठी काही जनावरे पाळली असून, त्यांनाही अनेकवेळा पाण्यातूनच बाहेर आणावे लागते. त्यांचा चारा-पाणीही बाहेरून आणवा लागतो, यासाठी कसरत नेहमीचाच भाग झाला आहे.अत्यंत गरीबीत जीवन जगणाऱ्या जयवंती गोठणकर यांचे सहा माणसांचे कुटुंब आहे. गावात मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या गोठणकर यांचे वय ७५ वर्षे आहे. दोन मुलगे, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. खाडीच्या पाण्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलाना होणारा त्रास, आजारपणात उपचारासाठी जाताना होणारा त्रास सहन करीत जीवन जगत असलेल्या कुटुंबियांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी जाणीवपूर्वक डोळेझाक तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे.गोठणकर कुटुंबियांचा प्रश्न मार्गी लागावा, यासाठी ही बाब येथील ज्येष्ठ ग्रामस्थ भास्कर मांजरेकर यांनी जिल्हा परिषद सदस्यांपासून पालकमंत्र्यापर्यंत सर्वांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न लेखी निवेदनांद्वारे केला आहे. (वार्ताहर)