शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

‘आशापुरा मायनिंग’विरोधात दोन मतप्रवाह

By admin | Updated: March 27, 2016 01:03 IST

उद्या ठरणार भवितव्य : हजारो हातांना रोजगार मिळाल्याचे मत पण...

दापोली : आशापुरा मायनिंगच्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून, दुसरीकडे या मायनिंगमुळे हजारो हाताला रोजगारही मिळाला आहे. अनेकांनी लघुउद्योग सुरु केले आहेत. कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर स्थानिक बाजारपेठेत तेजी आली होती. त्यामुळे ही कंपनी सुरु राहायला हवी, असा दुहेरी मतप्रवाह पहायला मिळत असून, कंपनीचे भवितव्य येत्या २८ मार्च रोजी ठरणार आहे. आशापुरा कंपनीने केळशी पंचक्रोशीत १० वर्षापूर्वी मायनिंगचे काम सुरु केले. या कंपनीला सुरुवातीच्या काळात स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केला होता. परंतु, त्यानंतर मात्र त्याच लोकांनी कंपनीमध्ये ठेके घेतले होते. विरोध करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपले उखळ पांढरे करुन घेतले. पूर्वी अनेक विरोध झाले. परंतु, ते फार काळ टिकले नाहीत. ज्या-ज्या लोकांना काम मिळाले त्यांनी अन्य लोकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे स्थानिक जनता मात्र कंपनीला विरोध करुन थकली. विरोध करणाऱ्यांनी पुढारपण मिरवून ठेके घेतले आणि त्यानंतर जनतेची साथ सोडली. त्यामुळे कंपनीला होणारा विरोध दुबळा झाला आहे. कंपनी विरोधातील लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांना कंपनीकडून कामसुद्धा मिळाले नाही. परंतु त्यांच्या म्होरक्याला मात्र लाखो रुपयांचे ठेके मिळाले. यापूर्वी विरोध करणाऱ्या गावपुढाऱ्यांनी केवळ मलई खाण्याचेच काम केले. त्यामुळे या पूर्वीचे आंदोलन हे वैयक्तिक स्वार्थापोटी झाल्याचा इतिहास आहे. कंपनीने काम दिले की, कंपनीच्या बाजूची भूमिका घ्यायची. कंपनीत ठेका मिळाला नाही की, विरोध करायचा असा उद्योग काही गावपुढाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे या कंपनीबाबत ग्रामस्थांमध्ये दोन बाजूचे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण प्रदूषणाची काळजी घेणाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी ‘एन्रॉन’ अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करुन लोकांचे नुकसान केले होते. दाभोळचा भारती शिपयार्ड प्रकल्प डबघाईला आला असून, तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही प्रकल्प नाही. दापोली तालुक्यातील केळशी परिसरात आशापुरा मायनिंग हा रोजगार उपलब्ध करुन देणारा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे हा प्रकल्प समुद्रात बुडवायला काही मंडळी निघाली आहेत. (प्रतिनिधी)