शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

‘आशापुरा मायनिंग’विरोधात दोन मतप्रवाह

By admin | Updated: March 27, 2016 01:03 IST

उद्या ठरणार भवितव्य : हजारो हातांना रोजगार मिळाल्याचे मत पण...

दापोली : आशापुरा मायनिंगच्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून, दुसरीकडे या मायनिंगमुळे हजारो हाताला रोजगारही मिळाला आहे. अनेकांनी लघुउद्योग सुरु केले आहेत. कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर स्थानिक बाजारपेठेत तेजी आली होती. त्यामुळे ही कंपनी सुरु राहायला हवी, असा दुहेरी मतप्रवाह पहायला मिळत असून, कंपनीचे भवितव्य येत्या २८ मार्च रोजी ठरणार आहे. आशापुरा कंपनीने केळशी पंचक्रोशीत १० वर्षापूर्वी मायनिंगचे काम सुरु केले. या कंपनीला सुरुवातीच्या काळात स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केला होता. परंतु, त्यानंतर मात्र त्याच लोकांनी कंपनीमध्ये ठेके घेतले होते. विरोध करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपले उखळ पांढरे करुन घेतले. पूर्वी अनेक विरोध झाले. परंतु, ते फार काळ टिकले नाहीत. ज्या-ज्या लोकांना काम मिळाले त्यांनी अन्य लोकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे स्थानिक जनता मात्र कंपनीला विरोध करुन थकली. विरोध करणाऱ्यांनी पुढारपण मिरवून ठेके घेतले आणि त्यानंतर जनतेची साथ सोडली. त्यामुळे कंपनीला होणारा विरोध दुबळा झाला आहे. कंपनी विरोधातील लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांना कंपनीकडून कामसुद्धा मिळाले नाही. परंतु त्यांच्या म्होरक्याला मात्र लाखो रुपयांचे ठेके मिळाले. यापूर्वी विरोध करणाऱ्या गावपुढाऱ्यांनी केवळ मलई खाण्याचेच काम केले. त्यामुळे या पूर्वीचे आंदोलन हे वैयक्तिक स्वार्थापोटी झाल्याचा इतिहास आहे. कंपनीने काम दिले की, कंपनीच्या बाजूची भूमिका घ्यायची. कंपनीत ठेका मिळाला नाही की, विरोध करायचा असा उद्योग काही गावपुढाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे या कंपनीबाबत ग्रामस्थांमध्ये दोन बाजूचे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण प्रदूषणाची काळजी घेणाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी ‘एन्रॉन’ अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करुन लोकांचे नुकसान केले होते. दाभोळचा भारती शिपयार्ड प्रकल्प डबघाईला आला असून, तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही प्रकल्प नाही. दापोली तालुक्यातील केळशी परिसरात आशापुरा मायनिंग हा रोजगार उपलब्ध करुन देणारा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे हा प्रकल्प समुद्रात बुडवायला काही मंडळी निघाली आहेत. (प्रतिनिधी)