शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
3
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
4
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
5
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
6
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
7
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
8
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
9
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
10
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
11
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
12
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
13
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात
14
मुंबई महापालिकेवर युतीचा भगवा फडकणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नेस्काेच्या सभेत घाेषणा
15
डॉ. जी. जी. पारीख गोवा महामार्गाच्या आंदोलनात खुर्ची टाकून बसले तेव्हा!
16
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
17
आता पाहा, मित्र-मित्रच एकमेकांना कापताना दिसतील!
18
महापालिका अदानींच्या पायावर ठेवणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल, श्वेतपत्रिकेची केली घोषणा
19
जेईई, नीट यांसारख्या परीक्षा अन् बारावीचा अभ्यासक्रम यापैकी नेमके कठीण काय? केंद्र करणार मूल्यमापन 
20
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

‘आशापुरा मायनिंग’विरोधात दोन मतप्रवाह

By admin | Updated: March 27, 2016 01:03 IST

उद्या ठरणार भवितव्य : हजारो हातांना रोजगार मिळाल्याचे मत पण...

दापोली : आशापुरा मायनिंगच्या बेकायदेशीर उत्खननामुळे पर्यावरणाची हानी होत असून, दुसरीकडे या मायनिंगमुळे हजारो हाताला रोजगारही मिळाला आहे. अनेकांनी लघुउद्योग सुरु केले आहेत. कंपनीच्या आर्थिक उलाढालीवर स्थानिक बाजारपेठेत तेजी आली होती. त्यामुळे ही कंपनी सुरु राहायला हवी, असा दुहेरी मतप्रवाह पहायला मिळत असून, कंपनीचे भवितव्य येत्या २८ मार्च रोजी ठरणार आहे. आशापुरा कंपनीने केळशी पंचक्रोशीत १० वर्षापूर्वी मायनिंगचे काम सुरु केले. या कंपनीला सुरुवातीच्या काळात स्वार्थापोटी काही लोकांनी विरोध केला होता. परंतु, त्यानंतर मात्र त्याच लोकांनी कंपनीमध्ये ठेके घेतले होते. विरोध करणाऱ्यांनी पद्धतशीरपणे आपले उखळ पांढरे करुन घेतले. पूर्वी अनेक विरोध झाले. परंतु, ते फार काळ टिकले नाहीत. ज्या-ज्या लोकांना काम मिळाले त्यांनी अन्य लोकांना वाऱ्यावर सोडले. त्यामुळे स्थानिक जनता मात्र कंपनीला विरोध करुन थकली. विरोध करणाऱ्यांनी पुढारपण मिरवून ठेके घेतले आणि त्यानंतर जनतेची साथ सोडली. त्यामुळे कंपनीला होणारा विरोध दुबळा झाला आहे. कंपनी विरोधातील लढ्यात सहभागी असणाऱ्या लोकांना कंपनीकडून कामसुद्धा मिळाले नाही. परंतु त्यांच्या म्होरक्याला मात्र लाखो रुपयांचे ठेके मिळाले. यापूर्वी विरोध करणाऱ्या गावपुढाऱ्यांनी केवळ मलई खाण्याचेच काम केले. त्यामुळे या पूर्वीचे आंदोलन हे वैयक्तिक स्वार्थापोटी झाल्याचा इतिहास आहे. कंपनीने काम दिले की, कंपनीच्या बाजूची भूमिका घ्यायची. कंपनीत ठेका मिळाला नाही की, विरोध करायचा असा उद्योग काही गावपुढाऱ्यांचा सुरु आहे. त्यामुळे या कंपनीबाबत ग्रामस्थांमध्ये दोन बाजूचे मतप्रवाह असल्याचे दिसून येत आहे. पर्यावरण प्रदूषणाची काळजी घेणाऱ्यांनी वैयक्तिक स्वार्थापोटी ‘एन्रॉन’ अरबी समुद्रात बुडवण्याची भाषा करुन लोकांचे नुकसान केले होते. दाभोळचा भारती शिपयार्ड प्रकल्प डबघाईला आला असून, तालुक्यात रोजगार उपलब्ध करुन देणारा एकही प्रकल्प नाही. दापोली तालुक्यातील केळशी परिसरात आशापुरा मायनिंग हा रोजगार उपलब्ध करुन देणारा एकमेव प्रकल्प आहे. हा प्रकल्प बंद होऊ नये यासाठी काही लोक प्रयत्न करताना दिसत आहेत. तसेच दुसरीकडे हा प्रकल्प समुद्रात बुडवायला काही मंडळी निघाली आहेत. (प्रतिनिधी)