शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
4
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
5
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
6
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
7
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
8
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
9
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
10
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
11
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
12
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
13
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
14
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
15
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
16
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
17
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
18
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
19
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
20
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  

आणखी दोन जनावरे मृत्यूमुखी

By admin | Updated: April 6, 2016 00:22 IST

मुदतबाह्य इंजेक्शन : देवाचे गोठणेतील प्रकाराने खळबळ

राजापूर : मुदतबाह्य इंजक्शन दिल्यानंतर देवाचेगोठणे गावात अत्यवस्थ झालेल्या जनावरांमध्ये आणखी दोन जनावरांचा मृत्यू झाला असून, मृत जनावरांचा एकूण आकडा तीनवर पोहोचला आहे. दरम्यान, देण्यात आलेली इंजक्शन्स ही पशुवैद्यकीय विभागातर्फे देण्यात आली. प्रत्येकाकडून पन्नास रुपये घेण्यात आल्याची धक्कादायक माहिती मालकांनी दिली आहे.देवाचेगोठणे गावातील रोहिदास गुरव, विवेक भालचंद्र नारकर व नितीन माया जाधव यांच्या जनावरांना गोचीड मरण्याची इंजक्शन्स देण्यात आली होती. त्यानंतर सर्वच्या सर्व जनावरे अचानक अत्यवस्थ झाली. त्यापैकी रविवारी रोहिदास गुरव यांच्या दुभत्या गाईचा मृत्यू झाला होता. उर्वरित जनावरांमध्ये विवेक भालचंद्र नारकर यांचा रेडा मृत्युमुखी पडला असून, रोहिदास गुरव यांच्या एका गाईचा सोमवारी रात्री मृत्यू झाला. त्याशिवाय आणखी दोन वासरे अजूनही अत्यवस्थ असून, त्यांचा धोका कायम आहे. या आजारी सत्तावीस जनावरांमध्ये विवेक नारकर यांची सहा, नितीन जाधव यांची चार, तर रोहिदास गुरव यांची सतरा जनावरे असल्याची माहिती पुढे आली आहे.या सर्व जनावरांवर उपचार सुरु असले तरी वेळेवर उपचार न झाल्याने सर्वच जनावरे अत्यवस्थ होऊन मृत्यूशी झुंज देत आहेत.पशुवैद्यकीय विभागाच्यावतीने देवाचेगोठणे गावात जनावरांना इंजक्शन्स देण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी न जाता त्यांच्याऐवजी चक्क शिपाई गेला होता. त्यानेच ते लसीकरण केल्याची माहिती जनावरांच्या मालकांनी दिली, त्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. शिवाय आपल्याकडून प्रत्येक जनावरामागे पन्नास रुपये घेतल्याची माहिती विवेक नारकर यानी पत्रकारांना दिली. ते घेतलेले पैसे कोणत्या कारणासाठी होते ते आपल्याला सांगण्यात आले नाही, अशीही माहिती विवेक नारकर यांनी दिली.एवढ्या जनावरांना लसीकरण करावयाचे असतानाच तेथे डॉक्टरऐवजी शिपाई कसा पाठवला गेला? असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात आला आहे. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जनावरांसाठी कोणतीही उपाययोजना केली जात नाही. पशुवैद्यकीय अधिकारी फिरकतच नसल्याची कैफियत यावेळी मांडण्यात आली. (प्रतिनिधी)दुर्लक्ष : पशुधन मालकांकडे पाठपशुधन कमी होत असताना दुसरीकडे ज्यांच्याकडे पशुधन आहे, त्यांच्याबाबत पशुवैद्यकीय खाते दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता होत आहे. या विभागाबद्दल देवाचेगोठणेत नाराजी आहे.कोणती कारवाई?पशुवैद्यकीय खात्याने दिलेली इंजेक्शन ही मुदतबाह्य होती. त्याबाबत आता संबंधितांवर कोणती कारवाई होणार? असा सवाल केला जात आहे.