शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यातील पावणे दोन लाख नागरिक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे ...

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे चार फिडर पूर्णत: बंद असून, देवरूख फिडरचा शहरासहित निम्मा भाग बंद आहे. जिल्ह्यातील २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

वादळाचा वेग वाढल्यानंतर महावितरणने खबरदारी घेत दुपारी २ वाजल्यापासून वीज पुरवठा बंद केला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत हाेती़ वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर बाधित भाग वगळता अन्य ठिकाणचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला हाेता.

कुवारबाव ३३ केव्ही वीज वाहिनीवर झाड कोसळले आहे. सायंकाळी झाड हटविण्याचे काम सुरू असल्याने रात्री उशिरा शहरातील वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. नाचणे, शिरगाव येथील उपकेंद्र बंद पडली आहेत़ वादळी वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे़ राजापूर शहर, हातीवले, आडिवरे, पडवे, लांजा उपकेंद्र बंद आहे़ गावखडी येथे विजेच्या खांबावर माड पडल्याने वाहिनी बंद पडली आहे़

राजापूर, लांजा, संगमेश्वर फिडर बंद पडले आहेत. शिवाय रत्नागिरी तालुक्यासह अन्य तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. फांद्या तुटल्या असून विजेचे खांबही कोसळून वाहिन्या तुटल्या आहेत.

आपत्तीचा सामना करण्यासाठी महावितरणची टीम सज्ज असून पुरेसे साहित्यही उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले परिस्थितीचा आढावा घेत असून, वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा पू्र्ववत हाेण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी संयम बाळगावा तसेच वीज वाहिनी दुरुस्तीसाठी स्वत: काेणतेही धाडसी प्रयत्न करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे़