शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

जिल्ह्यातील पावणे दोन लाख नागरिक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:30 IST

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे ...

रत्नागिरी : ताैक्ते चक्रीवादळामुळे वाऱ्याचा वाढलेला वेग व पर्जन्यवृष्टी यामुळे जिल्ह्यातील महावितरणची यंत्रणा कोलमडली आहे. राजापूर, लांजा, संगमेश्वर हे चार फिडर पूर्णत: बंद असून, देवरूख फिडरचा शहरासहित निम्मा भाग बंद आहे. जिल्ह्यातील २ लाख ग्राहकांचा वीज पुरवठा ठप्प झाला आहे.

वादळाचा वेग वाढल्यानंतर महावितरणने खबरदारी घेत दुपारी २ वाजल्यापासून वीज पुरवठा बंद केला होता. सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत वाऱ्याचा वेग कायम होता. त्यामुळे वीज पुरवठा पूर्ववत करण्यात अडचण येत हाेती़ वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर बाधित भाग वगळता अन्य ठिकाणचा वीज पुरवठा रात्री उशिरापर्यंत सुरू करण्याचा निर्णय महावितरणने घेतला हाेता.

कुवारबाव ३३ केव्ही वीज वाहिनीवर झाड कोसळले आहे. सायंकाळी झाड हटविण्याचे काम सुरू असल्याने रात्री उशिरा शहरातील वीज पुरवठा सुरू करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. नाचणे, शिरगाव येथील उपकेंद्र बंद पडली आहेत़ वादळी वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर वीज वाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे़ राजापूर शहर, हातीवले, आडिवरे, पडवे, लांजा उपकेंद्र बंद आहे़ गावखडी येथे विजेच्या खांबावर माड पडल्याने वाहिनी बंद पडली आहे़

राजापूर, लांजा, संगमेश्वर फिडर बंद पडले आहेत. शिवाय रत्नागिरी तालुक्यासह अन्य तालुक्यात जोरदार वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडली आहेत. फांद्या तुटल्या असून विजेचे खांबही कोसळून वाहिन्या तुटल्या आहेत.

आपत्तीचा सामना करण्यासाठी महावितरणची टीम सज्ज असून पुरेसे साहित्यही उपलब्ध आहे. त्यामुळे सोमवारी दुपारपर्यंत जिल्ह्यातील वीजपुरवठा कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले परिस्थितीचा आढावा घेत असून, वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा पू्र्ववत हाेण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे़ नैसर्गिक आपत्तीत नागरिकांनी संयम बाळगावा तसेच वीज वाहिनी दुरुस्तीसाठी स्वत: काेणतेही धाडसी प्रयत्न करू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे़