शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
2
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
3
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
4
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
5
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
6
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
7
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
8
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
9
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
10
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
13
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
14
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
15
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
16
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
17
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
18
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
19
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
20
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड

संततधार पावसामुळे पाजपंढरीत दरड कोसळून दोन घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात ...

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.

अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.

पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.

या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.

अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.

अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.

पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.

या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.

अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

...................................

मुसळधार पावसाची विश्रांती

आधी वादळाने दणका दिल्यानंतर आता मुसळधार पावसाने दापोली तालुक्यात ठाण मांडले होते. सुदैवाने बुधवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. या तीन दिवसात ग्रामीण भागात घरे, गोठ्यांचे अंशत: नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. पाजपंढरीतील दरड कोसळण्याखेरीज कोठेही मोठी दुर्घटना घडलेली नाही. कोठे नुकसान झाले असल्यास तातडीने घटनास्थळाला भेट देऊन त्याचे पंचनामे करण्याची सूचना महसूल प्रशासनाकडून तलाठी तसेच मंडल अधिकारी स्तरावर देण्यात आली आहे.