शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
2
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
3
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
4
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
5
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
6
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
7
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
8
आज रात्री किती वाजता दिसणार चंद्रग्रहण, कधी असेल ग्रहणाचा स्पर्श, मध्य आणि मोक्षकाळ, जाणून घ्या  
9
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
10
मिनेसोटात हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, एअरपोर्टजवळ 'आर६६' हेलिकॉप्टर जळून खाक; प्रवाशांचा मृत्यू
11
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
12
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
13
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
14
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
15
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
16
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
17
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
18
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
19
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
20
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा

संततधार पावसामुळे पाजपंढरीत दरड कोसळून दोन घरांना धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:22 IST

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात ...

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.

अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.

पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.

या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.

अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : गेले चार दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे दापोली तालुक्यातील पाजपंढरी येथे दरड कोसळल्याची घटना बुधवारी सायंकाळी घडली. यात दोन घरांना धोका निर्माण झाला आहे. या डोंगराच्या पायथ्याशी अनेक घरे असल्याने त्यांना भविष्यात धोका होण्याची भीती आहे.

अधिक धोका असलेल्या दोन घरातील कुटुंबांना तत्काळ घर खाली करण्यास सांगण्यात आले. ते सर्वजण सुरक्षित असले तरी या आसपासच्या घरांबाबत हा धोका कायम आहे.

पाजपंढरी गावाच्या एका बाजूला अथांग समुद्र तर दुसऱ्या बाजूला उंच असा डोंगर आहे. एका बाजूला उधाणाच्या लाटांची भीती आहे, तर दुसऱ्या बाजूला डोंगर खचण्याची भीती आहे. या लोकांना दरवर्षी पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन जगावे लागत आहे. त्यामुळे डोंगर प्रभावित क्षेत्रातील लोकांचे स्थलांतर करावे अशी मागणी जोर धरत आहे.

या गावातील सुमारे शंभर ते सव्वाशे घरे आहेत. या साऱ्यांना हा धोका आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किंवा समुद्रातील वादळांप्रसंगी या कुटुंबियांना स्थलांतरित होण्याच्या नोटीस दिल्या जातात. त्यामुळे त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याची मागणी केली जात आहे. मात्र त्याकडे अजूनही गांभीर्याने लक्ष देण्यात आलेले नाही.

अलीकडे या डोंगरावर काही लोकांनी जमिनी खरेदी केल्या असून, तेथे बंगले बांधण्याचे प्रयोजन आहे. ठिकठिकाणी मशिनरीचा वापर केला जात आहे. त्यामुळे डोंगरावरुन दरड कोसळण्याचा प्रकार घडला असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. या कामांमुळे डोंगरातून वाहणारे नैसर्गिक प्रवाह बंद झाले असून, डोंगरावरील उत्खननामुळे पावसाचे पाणी डोंगरात मुरले जात आहे. त्यामुळे या डोंगराचा भाग कधीही सुटू शकतो व या दरडी लोकांच्या वस्तीवर पोहोचू शकतात, अशी भीतीही व्यक्त केली जात आहे. याची यंत्रणेने तत्काळ दखल घ्यावी, अशी अपेक्षा केली जात आहे.

...................................

मुसळधार पावसाची विश्रांती

आधी वादळाने दणका दिल्यानंतर आता मुसळधार पावसाने दापोली तालुक्यात ठाण मांडले होते. सुदैवाने बुधवारी सायंकाळी पावसाने विश्रांती घेतली. या तीन दिवसात ग्रामीण भागात घरे, गोठ्यांचे अंशत: नुकसान होण्याचे प्रकार घडले आहेत. पाजपंढरीतील दरड कोसळण्याखेरीज कोठेही मोठी दुर्घटना घडलेली नाही. कोठे नुकसान झाले असल्यास तातडीने घटनास्थळाला भेट देऊन त्याचे पंचनामे करण्याची सूचना महसूल प्रशासनाकडून तलाठी तसेच मंडल अधिकारी स्तरावर देण्यात आली आहे.