शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांनंतर रस्ते गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे लक्षात येताच, शासनाने दोन दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर, सोमवारी पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत होती.

मच्छीमार आर्थिक अडचणीत

राजापूर : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायाला मंदी आली आहे. त्यातच खलाशांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. माशांची मरतूक कमी होत असल्याने त्यांची आवक घटल्याने मासे महाग झाले आहेत.

विकास कामांकडे लक्ष देण्याची मागणी

रत्नागिरी : हजारो लोकवस्ती असलेला राजीवडा गाव विकासापासून वंचित आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गावात ना रस्ता सुस्थितीत, ना पाण्याचा पुरेसा पुरवठा, त्यामुळे लोकांचे हाल होत असून, नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रात्री ग्राहकांची पाठ

खेड : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याने, हॉटेल, धाबे वेळेवरच बंद करण्यात येत आहेत. रात्री ग्राहकही पाठ फिरवत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर होत आहे.

अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त

चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यात येणारी झाडे, छोट्या व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, वाडीतील अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या रस्ता रुंदीकरणात रस्त्यांची उंची व रस्त्यांची पातळी नीट ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे

शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

गुहागर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पशुसंवर्धन करत आहेत. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची कमतरता असताना, असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.