शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!
7
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
8
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
9
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
10
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
11
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
12
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
13
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
14
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
15
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
16
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
17
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
18
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
19
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
20
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले

दोन दिवसांनंतर रस्ते गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे लक्षात येताच, शासनाने दोन दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर, सोमवारी पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत होती.

मच्छीमार आर्थिक अडचणीत

राजापूर : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायाला मंदी आली आहे. त्यातच खलाशांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. माशांची मरतूक कमी होत असल्याने त्यांची आवक घटल्याने मासे महाग झाले आहेत.

विकास कामांकडे लक्ष देण्याची मागणी

रत्नागिरी : हजारो लोकवस्ती असलेला राजीवडा गाव विकासापासून वंचित आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गावात ना रस्ता सुस्थितीत, ना पाण्याचा पुरेसा पुरवठा, त्यामुळे लोकांचे हाल होत असून, नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रात्री ग्राहकांची पाठ

खेड : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याने, हॉटेल, धाबे वेळेवरच बंद करण्यात येत आहेत. रात्री ग्राहकही पाठ फिरवत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर होत आहे.

अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त

चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यात येणारी झाडे, छोट्या व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, वाडीतील अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या रस्ता रुंदीकरणात रस्त्यांची उंची व रस्त्यांची पातळी नीट ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे

शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

गुहागर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पशुसंवर्धन करत आहेत. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची कमतरता असताना, असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.