शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांनंतर रस्ते गजबजले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले ...

रत्नागिरी : कोरोनाचा संसर्ग वाढत चालल्याने शासनाने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. रात्रीपासून सकाळपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र, कोरोनाचा संसर्ग कमी होत नसल्याचे लक्षात येताच, शासनाने दोन दिवस कडक लॉकडाऊन केले होते. त्यानंतर, सोमवारी पुन्हा रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसत होती.

मच्छीमार आर्थिक अडचणीत

राजापूर : जिल्ह्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. या व्यवसायावर हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह चालत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून या व्यवसायाला मंदी आली आहे. त्यातच खलाशांचाही प्रश्न निर्माण झाला आहे. माशांची मरतूक कमी होत असल्याने त्यांची आवक घटल्याने मासे महाग झाले आहेत.

विकास कामांकडे लक्ष देण्याची मागणी

रत्नागिरी : हजारो लोकवस्ती असलेला राजीवडा गाव विकासापासून वंचित आहे. गेल्या काही वर्षांपासून या गावातील विकासकामांकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने, लोकांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. या गावात ना रस्ता सुस्थितीत, ना पाण्याचा पुरेसा पुरवठा, त्यामुळे लोकांचे हाल होत असून, नगरपरिषदेने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

रात्री ग्राहकांची पाठ

खेड : कोरोना प्रादुर्भावामुळे प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी प्रशासनाने रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी ग्राहकांची वर्दळ कमी होत असल्याने, हॉटेल, धाबे वेळेवरच बंद करण्यात येत आहेत. रात्री ग्राहकही पाठ फिरवत असल्याने त्याचा परिणाम या व्यवसायावर होत आहे.

अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त

चिपळूण : गुहागर-विजापूर रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू झाले असून, रस्त्यात येणारी झाडे, छोट्या व्यापाऱ्यांच्या टपऱ्या, वाडीतील अंतर्गत रस्ते उद्ध्वस्त होत आहेत. या रस्ता रुंदीकरणात रस्त्यांची उंची व रस्त्यांची पातळी नीट ठेवून रस्ता रुंदीकरणाचे काम करावे, अशी मागणी करण्यात आली आहे

शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर

गुहागर : तालुक्यातील ग्रामीण भागातील शेतकरी पशुसंवर्धन करत आहेत. मात्र, जनावरे आजारी पडल्यास त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नाहीत. तालुक्यात अधिकाऱ्यांची कमतरता असताना, असलेले अधिकारी लक्ष देत नसल्याची शेतकऱ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्ती केली जात आहे.