शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
2
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
3
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
4
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
5
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
6
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
7
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
8
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
9
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
10
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
11
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
12
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
13
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
14
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
15
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
16
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
17
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
18
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
19
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
20
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 

श्रमदानातून उभारले एका ओढ्यावर दोन बंधारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2016 00:22 IST

हरळीत ग्रामस्थ एकवटले : जलसंधारणाचा पहिला प्रयोग यशस्वी; पहिल्याच पावसात पाणीसाठा

खंडाळा : पावसाळ्यात भरभरून वाहणारा ओढा मात्र बंधारा नसल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असते. गावच्या शिवारात पाणीपातळी वाढावी, पाण्याचा साठा शाश्वत निर्माण व्हावा. यासाठी ग्रामस्थांच्या सहभागाने तरुणांची शक्ती एकवटली आणि पाहता पाहता एकाच ओढ्यावर दोन बंधारे पूर्णत्वास गेले. लोकसहभागातून झालेल्या बंधारा निर्मितीमुळे पहिल्याच पावसात पाणी साठू लागल्याने ग्रामस्थांमध्ये समाधान पसरले आहे.जलयुक्त शिवार योजनेंतर्गत हरळी (ता. खंडाळा) येथे मांगदरा ओढ्यावर माती व दगड यांचा वापर करून दोन बंधारे बांधण्यात आले. ‘आपल्या गावाचा आपणच विकास करायचा’ हे धोरण ठरवून जलसंधारणाचा पहिला प्रयोग यशस्वी केला आहे. खंडाळा येथील अष्टविनायक ग्लास कंपनीच्या सहकार्याने व ग्रामस्वराज्य संस्थेच्या मदतीने तरुणांचे शेकडो हात या कामासाठी राबले. बांधकाम व्यावसायिक नामदेव बरकडे, संतोष बरकडे यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. त्याचबरोबर अष्टविनायक कंपनीचे आदित्य अग्रवाल, सरपंच अवंतिका जावळे, ग्रामसेवक सुनील धायगुडे, सोमनाथ बरकडे, राहुल निकम, गणेश शिंदे, संतोष बरकडे, संतोष देशमुख, कृष्णा बरकडे, अक्षय निकम, अमोल बरकडे यांसह ५० ते ६० तरुणांनी सहभाग घेतला.ओढ्याच्या पात्रातील गाळ काढून श्रमदानातून दोन बंधारे बांधल्यामुळे या परिसरातील शेतविहिरींची पाणीपातळीत वाढ होणार आहे. त्याचबरोबर पाणीटंचाईवरही मात करता येणार आहे. जलसंधारणाबरोबर गावातील इतर सामाजिक समस्यांसाठीही लोकांच्या सहभागातून मार्ग काढण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)ओढ्यावर बंधारे बांधण्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला. त्याला ग्रामस्थांसह संस्थांनीही मदत केली. लोकसहभागतून आदर्शवत काम उभारू शकते. याचा धडा तरुणांनी घालून दिला आहे. या बंधाऱ्यामुळे पाणीसाठा वाढेल गावाला निश्चित फायदा होणार आहे. - अवंतिका जावळे, सरपंच