शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

रत्नागिरीत बारा ठिकाणे शांतता क्षेत्र जाहीर

By admin | Updated: December 2, 2015 00:41 IST

पाणी वितरणाचे चित्र विदारक...

रत्नागिरी : शहरातील १२ ठिकाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शांतता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. त्याठिकाणी न्यायालयाच्या निर्देशानुसार आवश्यक त्या सर्व सूचना व मजकूर असलेले फलक प्रदर्शित केले जाणार आहेत. यासाठी येणाऱ्या ६१५६९ रुपये खर्चालाही आज झालेल्या नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. शहरातील या १२ शांतता क्षेत्रांमध्ये देसाई हायस्कूल, गोगटे - जोगळेकर महाविद्यालय, जीजीपीएस, फाटक प्रशाला, परशुरामपंत अभ्यंकर प्रशाला, स्वस्तिक हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, मनोरुग्णालय, न्यायालय, परकार हॉस्पिटल, लोटलीकर हॉस्पिटल, नगरपरिषद शाळा क्र. २ (लोकमान्य टिळक प्रशाला) यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगररोत्थान (जिल्हास्तर) अंतर्गत रत्नागिरी नगरपरिषदेला २०१०-११ तसेच २०१२-१३ या आर्थिक वर्षअखेर मंजूर झालेल्या कामांपैकी जी कामे झाली नाहीत त्याचे अखर्चित ४२ लाख १६ हजार १४८ निधी जिल्हाधिकाऱ्यांना परत करण्याच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली. (प्रतिनिधी)पाणी वितरणाचे चित्र विदारक...शहरातील अंतर्गत जलवाहिन्या अत्यंत खराब झाल्या आहेत. या जलवाहिन्या लोकवर्गणीतून काही नागरिकांनी खरेदी केल्या आहेत. मात्र, त्या बसवून देण्यास पाणी विभागाचे कर्मचारी नकार देत असल्याचा मुद्दा नगरसेविका शिल्पा देसाई यांनी उपस्थित केला. नागरिक पाईप खरेदी करतात. ते जोडून देण्याचीही पालिकेची तयारी नाही, ही दुर्दैवी बाब असल्याचे नगरसेवक बंड्या साळवी यांनी सांगितले. या विषयावरूनही नगराध्यक्षांची कोंडी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, आपल्यापर्यंत संबंधित नगरसेवकांनी हा विषयच आणला नसल्याचे सांगितले. मात्र, या विषयामुळे अंतर्गत जलवाहिन्यांची स्थिती किती विदारक आहे व पालिका या गंभीर विषयाबाबत किती उदासीन आहे, हेच स्पष्ट झाल्याचा टोलाही लगावण्यात आला.