शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

बारावी निकालाचा पेच; अकरावी रेस्ट इयर समजलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:20 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे अखेर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नसल्यामुळे अखेर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला. मात्र, अद्याप निकालाबाबत मूल्यमापन कसे करणार, गुणदानासाठी कोणती पद्धती अवलंबिणार याबाबत काहीच निर्णय नसल्याने विद्यार्थी, पालकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सीबीएसईने बारावीचे मूल्यमापन करताना दहावीचे ३०, अकरावीचे ३० व बारावीचे ४० गुण याप्रमाणे मूल्यमापन करून गुणदान करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक विद्यार्थी अकरावीचे वर्ष गांभीर्याने घेत नसल्यामुळे केवळ पास होण्यापुरता अभ्यास करतात. त्यामुळे अकरावीच्या वर्षाचे मूल्यमापन केले तर विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सीबीएसई बोर्डाप्रमाणे दहावीच्या वर्षातील गुणही विचारात घेणे गरजेचे आहे.

जिल्ह्यातून १८ हजार ८५ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरले होते. शासनाच्या निर्णयानुसार विद्यार्थी सरसकट पास होणार असले तरी मूल्यमापनाबाबत कोणताच निर्णय जाहीर केलेला नाही. सीबीएसईप्रमाणेच मूल्यमापन करण्यात येऊन गुणदान व्हावे, अन्यथा गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होण्याचा धोका आहे.

- अकरावीचा निकाल दोनशे गुणांच्या आधारे लावण्यात येतो. दोन घटक चाचणीचे प्रत्येकी २५ गुण, सहामाई परीक्षेतील ५० व वार्षिक परीक्षेच्या १०० गुणांचा समावेश आहे.

- गतवर्षी वार्षिक परीक्षा झालेली नाही. त्यामुळे दोन घटक चाचणी व सहामाई परीक्षेच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करण्यात आले.

बारावीला अंतर्गत गुण काेठे असतात?

- बारावीसाठी कला, वाणिज्य, शाखेअंतर्गत तोंडी परीक्षा अथवा प्रकल्पासाठी २० गुण असतात.

- विज्ञान शाखेमध्ये प्रात्यक्षिक परीक्षेसाठी तीस गुण असतात. यावर्षी प्रथम सत्र ऑनलाईनच होते. तोंडी परीक्षा ऑनलाईन घेण्यात आल्या तरी प्रात्यक्षिक परीक्षा घेताच आल्याच नाहीत.

शासनाने प्रत्यक्ष परीक्षा कोरोनामुळे घेणे शक्य नसल्याचे कारण देत बारावीच्या परीक्षा ऐनवेळी रद्द केल्या. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय होऊन महिना झाला तरी अद्याप निकालाबाबत मूल्यमापन व गुणदान याबाबत काहीच निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही. लवकरात लवकर याबाबत निर्णय होणे अपेक्षित आहे.

- अलफिया पटेल, विद्यार्थिनी.

बारावीच्या परीक्षा रद्द करण्याबाबत शासनाने उशिरा निर्णय घेतला; परंतु आता गुणदानासाठी मूल्यमापन करण्यात येणार आहे. त्यासाठी नेमका कोणता निकष लावला जाणार याबाबत काहीच स्पष्ट केलेले नाही. यामध्ये विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करूनच मूल्यमापन केले जावे. नुकसान करू नये एवढीच अपेक्षा.

- दुर्वेश जायदे, विद्यार्थी

कोरोनामुळे अकरावीची वार्षिक परीक्षा प्रत्यक्ष घेणे शक्य नसल्यामुळे रद्द करण्यात आली. बारावीतील अंतर्गत परीक्षा झालेल्या नाहीत. मूल्यमापनाचे सूत्रही निश्चित झालेले नाही. मूल्यमापनात अकरावीतील ४० टक्के गुणांचा विचार झाल्यास विद्यार्थ्यांच्या गुणदानावर परिणाम होण्याचा धोका आहे.

दहावीमध्ये गुणवत्ता यादीत स्थान बळकावणारे विद्यार्थी अकरावीमध्ये पास होण्यापुरते अभ्यास करतात. मात्र, अकरावीतच त्यांची बारावीची तयारी सुरू असते. त्यामुळे अकरावीचे गुणावर बारावी निकालासाठी मूल्यमापन करण्यात आले, तर मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.

- एस. व्ही. पाटील, प्राचार्य माँसाहेब मीनाताई ठाकरे कनिष्ष्ठ महाविद्यालय, नेवरे.

बारावीचा निकाल तयार करताना दहावी, अकरावीच्या वर्गातील गुणांचा समावेश केला जाण्याची शक्यता आहे. असे झाले तर मात्र अकरावीत गुण कमी असणाऱ्या मुलांचे नुकसान होण्याचा धोका आहे. त्यामुळे दहावी, अकरावी व बारावीच्या वर्गानुसार मूल्यमापन व्हावे.

- डाॅ. पी. पी. कुलकर्णी, प्राचार्य, गोगटे जोगळेकर महाविद्यालय.

अकरावी तर ‘रेस्ट इयर’

- महाविद्यालयीन शिक्षणामध्ये प्रवेशाचा पहिला टप्पा अकरावीला मानला जातो. दहावीच्या वर्गात वर्षभर अभ्यासासाठी ताणतणाव सोसला जातो. दहावी पास झाल्यानंतर अकरावीत प्रवेश करतात.

- उच्च शिक्षणाच्यादृष्टीने बारावीचे वर्ष महत्त्वपूर्ण मानले जाते. कित्येक विद्यार्थी अकरावीचे वर्ष ‘रेस्ट इअर’ मानतात. यावर्षी बारावीची तयारी करीत असतानाच अकरावी पास होण्यापुरतेच महत्त्व देतात.