शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

लाॅकडाऊन करण्यापेक्षा आता आम्हालाच बंद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शासनाने शनिवार, रविवार लाॅकडाऊन घोषित केले असले तरी सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शासनाने शनिवार, रविवार लाॅकडाऊन घोषित केले असले तरी सोमवार ते शुक्रवार दिवसा जमावबंदी व रात्री संचारबंदी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवसाय बंद ठेवण्याच्या सूचना केल्याने व्यावसायिक आर्थिक संकटात आले आहेत. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचे हप्ते, विजेची बिले, देखभाल-दुरुस्ती खर्च, कामगारांचे वेतन, शिवाय अन्य खर्चासाठी पैसा कुठून आणावा असा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोनामुळे शासनाने ‘ब्रेक द चेन’ घोषित केले असले तरी खर्च भागविण्यासाठी व्यावसायिकांना गळ्यातील चेन मोडण्याची वेळ आली आहे.

गतवर्षी मार्चमध्ये लाॅकडाऊन घोषित झाले. दोन महिन्यांच्या कडकडीत बंदनंतर टप्प्याटप्प्याने विविध व्यवसाय सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली. मात्र कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यांत व्यवसाय रडतखडतच सुरू होते. हाॅटेल व्यवसायाला तर उशिरा परवानगी मिळाली. मात्र बंद कालावधीत झालेले नुकसान भरून निघाले नाही. तोपर्यंत पुन्हा लाॅकडाऊन घोषित केल्याने कुटुंबाचा गाडा चालविणेही अवघड बनले आहे.

कर्जाचे हप्ते कसे भरावे?

उद्योग-व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जाचे हप्ते लाॅकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झाल्याने, कसे भरावेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गतवर्षी बँकांकडून सुरुवातीचे महिने सवलत दिली. मात्र नंतर एकत्रित हप्ते भरून घेतले. महागाईने उच्चांक गाठला आहे. व्यवसाय ठप्प असल्याने खर्च कसे भागवावेत? पुरुष कमावीत असले तर गृहिणींना घरखर्च भागविताना कसरत करावी लागते. गतवर्षीचेच नुकसान भरून काढणे अशक्य झाले असून आता नवीन प्रश्न निर्माण झाला आहे.

लग्नसराईच्या दिवसांत नवऱ्याचा फोटोग्राफी व्यवसाय चालतो. बंदमुळे स्टुडिओ बंद आहे. शिवाय लग्नासाठी मोजक्या माणसांच्या उपस्थितीची अट आहे. कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटल्यामुळे लग्नसमारंभातील खर्चावरही मर्यादा आली आहे. गतवर्षी लाॅकडाऊन झाले. त्याची झळ अद्याप सोसत असताना पुन्हा लाॅकडाऊन धोषित केले. अजून किती सोसावे, आता पोळपाट लाटणे घेऊन बाहेर येण्याशिवाय पर्याय नाही.

- मधुरा मालगुंडकर, गृहिणी

कॅटरिंग व्यवसाय चालवितो. बंदमुळे ऑर्डर रद्द झाल्या. व्यवसाय ठप्प झाला आहे. गतवर्षीचे नुकसान भरून काढणे शक्य झाले नाही. त्यातच आता नवीन संकट त्यामुळे दरवर्षी व्यवसाय बंद ठेवून आर्थिक संकटे सोसावी का? सर्वसामान्यांच्या व्यथा लक्षात घेऊन मार्ग काढावा.

- अंकिता चव्हाण, गृहिणी

हाॅटेल व्यवसाय गतवर्षी दीर्घकाळ बंद राहिला. त्या कालावधीतील कर्जाचे हप्ते, देखभाल-दुरुस्ती खर्च, विजेची बिले, आदी खर्च भागविणे अवघड झाले. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने पुन्हा लाॅकडाऊन जाहीर केल्याने आता व्यवसायाशिवाय घरखर्च भागविणेही अवघड बनले आहे. शासनाने विचार करावा.

- रोशनी सुर्वे, गृहिणी