शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

तुळशी, खवटीचा पाणी प्रश्न मिटणार

By admin | Updated: May 9, 2016 00:47 IST

शाम गवळी : ‘जिंदल’ने उचलली गावांची जबाबदारी; दोन वाड्यांमध्ये विहिरी बांधणार--लोकमतचा प्रभाव

खेड : तालुक्यात सध्या पाणीटंचाईचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत. तालुक्यातील पाणीटंचाईबाबत ‘लोकमत’ने दि. ५ मे २०१६ रोजी ‘दुष्काळ दाह’मध्ये वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल घेऊन जिंदल कंपनीने तुळशी आणि खवटी गावातील पाण्याच्या प्रश्नाची जबाबदारी उचलली आहे.खेड तालुक्याच्या ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याचा अद्याप दुष्काळ आहे. नद्या, नाले आणि डोह आटल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. जिल्ह्यात पहिला टँकर धावतो तो खेड तालुक्यातील तुळशी गावच्या कुब्जवाडीत आणि खवटी गावच्या धनगरवाडीत! या दोन वाड्यांतील वस्तीला पिण्याचे पाणी मिळावे, याकरिता आता जिंदल समुहाने जबाबदारी घेतली आहे. काही दिवसातच या दोन वाड्यांमध्ये विहिरी बांधण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती तुळशी कुब्जवाडीतील ग्रामस्थ शाम गवळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. कंपनीच्या या उपक्रमामुळे येथील ग्रामस्थांनी धन्यवाद दिले. खेड तालुक्यातील पारंपरिक जलस्रोत आटल्याने ही गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. गावातील जुन्या विहिरी आटल्या. नव्या विंधन विहिरींना पाणीच नसल्याने सध्या त्या कोरड्या ठाक आहेत. सरकारी योजनांतून खोदल्या जाणाऱ्या नव्या विंधन विहिरींना पाणीच लागत नसल्याने लाखो करोडो रुपयांचा चुराडा होत असल्याचे दिसून येत आहे. तालुक्यात ३४ गावे आणि ६१ वाड्या टंचाईग्रस्त आराखड्यात आहेत. यातील १९ गावे आणि २४ वाड्यांना सध्या केवळ २ शासकीय आणि एका खासगी टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. टँकरने पाणीपुरवठा करावा, यासाठी तालुक्यातील अनेकांकडून अर्ज आले आहेत. मात्र, यातील एकही गाव वा वाडीसाठी अद्याप पाणीपुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. अशातच जिल्ह्यातील पाणीटंचाई भासत असलेल्या तुळशीकुब्जवाडी आणि खवटी धनगरवाडीला पिण्याचे पाणी देण्यास जिंदल कंपनीने पुढाकार घेतला आहे. कंपनीच्या सहकार्याने या दोन वाड्यांवरील पाण्याचे दुर्भिक्ष्य वर्षभरातच कायमस्वरूपी निकाली निघण्यास मदत होणार आहे. विहिरी बांधतांना येणाऱ्या अडचणी कंपनी लिलया सोडवणार आहे. या दोन्ही वाड्या डोंगरात असल्याने टँकरमधून पाणी पोहोचविणे अशक्य होत आहे. त्यामुळे आता थेट गावातच या विहिरी बांधण्यात येणार आहेत. याकरिता आवश्यक तो निधी कंपनी खर्च करणार आहे. कंपनीने या दोन वाड्यांसाठी विहिरी बांधून दिल्यानंतर वस्तीची पाणी समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)