शहरं
Join us  
Trending Stories
1
मेवाड-जैसलमेर-बूंदी...! राजस्थानला मराठा साम्राज्याचा नकाशा खुपू लागला; एनसीईआरटीच्या पुस्तकावरून वाद
2
राहुल गांधी, संजय राऊतांसह अनेक खासदार पोलिसांच्या ताब्यात; 'मतचोरी'वरून विरोधकांचा निवडणूक आयोगावर मोर्चा
3
"CCTV पाहिल्यापासून झोप येत नाही..."; १५ महिन्यांच्या मुलीला डे-केअरमध्ये मारहाण, आई ढसाढसा रडली
4
ICICI बँकेचा शेअरधारकांना सुखद धक्का! प्रति शेअर इतक्या रुपयांचा लाभांश जाहीर, तुम्हीही घेऊ शकता लाभ
5
भारताला 'डेड इकॉनॉमी' म्हणणाऱ्या ट्रम्प यांचा 'डॉलर'च धोक्यात; एक्सपर्टनं दिला मोठा इशारा
6
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
7
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
8
पुन्हा जिवंत करण्यासाठी तरुणाचा मृतदेह ५ दिवस पाण्यात ठेवला अन् बाजूला बँड वाजवत बसले! कुठे घडला 'हा' प्रकार?
9
१५ महिन्यांच्या चिमुकल्याला ढकलले, मारले आणि मग..., डे-केअर सेंटरमधील धक्कादायक प्रकार
10
"भारत चकचकित मर्सिडीज, पाकिस्तान कचऱ्यानं भरलेला ट्रक", फील्ड मार्शल आसिम मुनीर यांनी PAK ची अब्रू वेशीवर टांगली!
11
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
12
Shravan Somvar 2025: शिवलिंगावर अभिषेक करताना तुम्हीसुद्धा 'ही' चूक करताय का? पूजा राहील अपूर्ण!
13
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
14
दिलदार! भीक मागून १.८३ लाख जमवले, मंदिरासाठी दान केले; रंगम्माच्या मनाचा मोठेपणा
15
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
16
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
17
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
18
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
19
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
20
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?

क्षयराेगाच्या रुग्णांचे पाेषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या निक्षय योजनेचा जिल्ह्यातील ५४४ क्षयरोगी रुग्णांना लाभ मिळताे. या योजनेतून क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.

जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या मागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याचे या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही शासनाच्या आरोग्य विभागाकडून यावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचे निदान करून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळत असली तरी रुग्णांना औषधोपचारसह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.

----------------------------------

टीबीची लक्षणे काय?

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी हाणे आदी टीबीची लक्षणे दिसून आल्यास वेळीच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

-------------------

जास्तीत जास्त २० महिन्यांत टीबीमुक्त

n टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण ६ महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो.

n एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागतो.

-------------------

क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के आहे. एखाद्या रुग्ग्णाचा बँक डिटेल्स नसल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना शासनाच्या निक्षय योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

-डॉ. श्रीकांत देसाई, जिल्हा क्षयराेग अधिकारी