शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

क्षयराेगाच्या रुग्णांचे पाेषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या निक्षय योजनेचा जिल्ह्यातील ५४४ क्षयरोगी रुग्णांना लाभ मिळताे. या योजनेतून क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.

जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या मागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याचे या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही शासनाच्या आरोग्य विभागाकडून यावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचे निदान करून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळत असली तरी रुग्णांना औषधोपचारसह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.

----------------------------------

टीबीची लक्षणे काय?

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी हाणे आदी टीबीची लक्षणे दिसून आल्यास वेळीच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

-------------------

जास्तीत जास्त २० महिन्यांत टीबीमुक्त

n टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण ६ महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो.

n एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागतो.

-------------------

क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के आहे. एखाद्या रुग्ग्णाचा बँक डिटेल्स नसल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना शासनाच्या निक्षय योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

-डॉ. श्रीकांत देसाई, जिल्हा क्षयराेग अधिकारी