शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

क्षयराेगाच्या रुग्णांचे पाेषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या निक्षय योजनेचा जिल्ह्यातील ५४४ क्षयरोगी रुग्णांना लाभ मिळताे. या योजनेतून क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.

जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या मागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याचे या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही शासनाच्या आरोग्य विभागाकडून यावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचे निदान करून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळत असली तरी रुग्णांना औषधोपचारसह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.

----------------------------------

टीबीची लक्षणे काय?

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी हाणे आदी टीबीची लक्षणे दिसून आल्यास वेळीच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

-------------------

जास्तीत जास्त २० महिन्यांत टीबीमुक्त

n टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण ६ महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो.

n एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागतो.

-------------------

क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के आहे. एखाद्या रुग्ग्णाचा बँक डिटेल्स नसल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना शासनाच्या निक्षय योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

-डॉ. श्रीकांत देसाई, जिल्हा क्षयराेग अधिकारी