शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

क्षयराेगाच्या रुग्णांचे पाेषण लटकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात सन २०२१ या वर्षात ७७६ क्षयरोगाचे रुग्ण सापडले आहेत. केंद्र शासनाच्या निक्षय योजनेचा जिल्ह्यातील ५४४ क्षयरोगी रुग्णांना लाभ मिळताे. या योजनेतून क्षयरुग्णांना मोफत औषधोपचार देण्याबरोबरच सकस पोषण आहारही देण्यात येतो.

जिल्ह्यात अजूनही क्षयरोगाचे रुग्ण आढळत आहेत. शासनाच्या निकषाप्रमाणे एक लाख लोकसंख्येच्या मागे १६० ते २०० क्षयरोगी असतात. मात्र, रत्नागिरी जिल्ह्याचे या रुग्णांचे प्रमाण अतिशय कमी आहे. तरीही शासनाच्या आरोग्य विभागाकडून यावर गांभीर्याने लक्ष दिले जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांचे निदान करून या समस्येचे समूळ उच्चाटन करण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. जे क्षयरुग्ण उपचार घेत आहेत त्यांना निक्षय पोषण योजनेतून दर महिन्याला ५०० रुपये देण्यात येतात. या रुग्णांना औषधे शासनाकडून मोफत मिळत असली तरी रुग्णांना औषधोपचारसह सकस आहार मिळावा, यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ उपचार सुरू असेपर्यंत दिला जातो.

----------------------------------

टीबीची लक्षणे काय?

रात्री येणारा ताप, १५ दिवसांपेक्षा जास्त कालावधीपर्यंत खोकला, छातीत दुखणे, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, भूक कमी हाणे आदी टीबीची लक्षणे दिसून आल्यास वेळीच थुंकीची तपासणी करणे आवश्यक आहे.

-------------------

जास्तीत जास्त २० महिन्यांत टीबीमुक्त

n टीबीच्या रुग्णांचे वेळीच निदान झाले तर तो रुग्ण ६ महिन्यांत पूर्णपणे बरा होऊ शकतो.

n एमडीआर टीबी नियंत्रणात आणण्यासाठी सुमारे २० महिन्यांचा कालावधी लागतो.

-------------------

क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.३ टक्के

रत्नागिरी जिल्ह्यात क्षयरोग रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.८ टक्के आहे. एखाद्या रुग्ग्णाचा बँक डिटेल्स नसल्यास या योजनेचा लाभ मिळत नाही. मात्र, जास्तीत जास्त क्षयरोग रुग्णांना शासनाच्या निक्षय योजनेचा लाभ देण्यात येत आहे.

-डॉ. श्रीकांत देसाई, जिल्हा क्षयराेग अधिकारी