शहरं
Join us  
Trending Stories
1
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्याचे फोनावर फोन
2
जर एखाद्या देशाने 'न्यूक्लियर' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
3
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला
4
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने तळ उभारले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
5
दहशतवाद नाहीसा करणारच! पुलवामाच्या त्रालमध्ये सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक सुरू, २ जण ठार
6
मोदी आदमपूरला जाताच, शाहबाज शरीफांनाही मोह आवरेना! पाकिस्तानी सैन्याच्या टँकवर चढले अन् म्हणाले...
7
कुटुंबासाठी पाकिस्तानला वाचवतायेत डोनाल्ड ट्रम्प?; पहलगाम हल्ल्यानंतर झाली मोठी डील
8
ब्लूस्मार्ट कंपनी बंद पडल्यानंतर 'क्लोज्ड लूप ई-वॉलेट' वादात? आबरबीआयकडून चौकशी; काय आहे प्रकरण?
9
Stock Market Today: शेअर बाजाराची फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex-Nifty रेड झोनमध्ये; NBFC, फार्मा स्टॉक्समध्ये घसरण
10
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
11
IPL 2025 : बीसीसीआयनं लागू केला नवा नियम; लगेच 'अनसोल्ड' खेळाडूलाही मिळाला भाव, पण...
12
पाकिस्तानच्या किराना हिल्समध्ये रेडिएशन गळती? अणुऊर्जा संस्थेने सत्य सांगितले, अमेरिकेचे मौन
13
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
14
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
15
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
16
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
17
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
18
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
19
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
20
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?

हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत ...

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत प्रदर्शन भरविण्याचाही शासनाचा मानस आहे. त्याची जबाबदारी पणन विभागाने घ्यावी. त्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबरोबर शेतकºयांना विक्री कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या अद्ययावत लिलावगृहाचे उद्घाटन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.सेस हा बाजार समितीचा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे तो बंद करता येणार नाही. मात्र मच्छिमारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक मंडळाची एकत्रित असणारी वाटचाल सकारात्मक आहे. आंबा, काजू उत्पादक शेतकरी यांचे पुनर्गठित कर्ज, व्याजमाफीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मच्छिमारांचा डिझेल परतावा व अन्य समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा, अशी सूचना सामंत यांनी केली.