शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

हापूसच्या मार्केटिंगसाठी प्रयत्न करणार : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 22:30 IST

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत ...

रत्नागिरी : कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याचे महाराष्ट्रभर मार्केटिंग व्हावे, यासाठी शासन प्रयत्न करणार असून, राज्यातील अन्य पिकांचे विविध जिल्ह्यांत प्रदर्शन भरविण्याचाही शासनाचा मानस आहे. त्याची जबाबदारी पणन विभागाने घ्यावी. त्यासाठी मैदाने उपलब्ध करून देण्याबरोबर शेतकºयांना विक्री कौशल्याचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे, यासाठी बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वतोपरी प्रयत्नशील राहू, असे आश्वासन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे आंबा व काजू उत्पादक शेतकरी यांच्या सोयीसाठी महाराष्टÑ स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत उभारलेल्या अद्ययावत लिलावगृहाचे उद्घाटन सहकार पणन व वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष स्वरुपा साळवी, आमदार हुस्नबानू खलिफे उपस्थित होते.सेस हा बाजार समितीचा एकमेव उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे तो बंद करता येणार नाही. मात्र मच्छिमारांसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी मार्गदर्शन करताना बाजार समिती संचालक मंडळाची एकत्रित असणारी वाटचाल सकारात्मक आहे. आंबा, काजू उत्पादक शेतकरी यांचे पुनर्गठित कर्ज, व्याजमाफीची रक्कम अद्याप मिळालेली नाही. मच्छिमारांचा डिझेल परतावा व अन्य समस्यांबाबत सर्वपक्षीय बैठक बोलावून मार्ग काढावा, अशी सूचना सामंत यांनी केली.