शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

निवळी येथे ट्रकला अपघात, चालकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:52 IST

रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल हाेऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. ...

रत्नागिरी : धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकचे ब्रेक फेल हाेऊन निवळी (ता. रत्नागिरी) येथे मंगळवारी दुपारी १२.१५ वाजता अपघात झाला. या अपघातात चालक श्रीराम शशिकांत प्रसादे (५२, रा. देवरूख) याचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी श्रीराम शशिकांत प्रसादे हा ट्रक (एमएच ०४, ईवाय ९२०३) मध्ये निवळी येथील मासेबाव गोडाऊनमधील धान्य घेऊन संगमेश्वरकडे जात हाेते. निवळी येथील दत्तमंदिर येथील वळणात आल्यानंतर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. त्याला गाडीवर नियंत्रण मिळवता न आल्याने गाडी समाेरील डाेंगरावर जाऊन आदळली. त्यामध्ये गाडीच्या समाेरील भागाचा चक्काचूर झाला. ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पाेलिसांनी व्यक्त केला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस निरीक्षक विनीत चौधरी, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, पोलीस हेडकाॅन्स्टेबल संतोष कांबळे, अजय कांबळे व संजय झगडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून पंचनामा केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण करीत आहेत. धान्य घेऊन जाणाऱ्या ट्रकला अपघात झाल्याचे कळताच प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनीही घटनास्थळी भेट दिली.