शहरं
Join us  
Trending Stories
1
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
2
'त्या' ५०० जवानांसाठी सुप्रीम कोर्ट पुढे सरसावलं; केंद्र अन् तिन्ही सैन्य दलाकडे मागितले उत्तर
3
व्लादिमीर पुतिन यांची ऑफर लीक झाली, डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाचा प्लान जगाला सांगितला
4
नोकरी खाजगी, पैसा सरकारी! पंतप्रधान विकासित भारत रोजगार योजनेचं पोर्टल सुरू, किती मिळणार पैसे?
5
आईने दोन पेग घेतले, त्यानंतर..., निळ्या ड्रमातील मृतदेह प्रकरणात मुलाने दिली धक्कादायक माहिती  
6
Asia Cup 2025 : त्याची काही चूक नाही, पण... आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? पुन्हा तोच रिप्लाय
7
Mumbai Local Train Update: मध्य, हार्बर मार्गावरील लोकल रेल्वे सेवा रद्द; कुठून कुठपर्यंत सुरू?
8
Mumbai Rain Updates Live: पावसात अडकलेल्यांसाठी मुंबई महापालिका सरसावली; पाणी, खाद्यपदार्थांचे वाटप
9
मालिकेसाठी कायपण! शूटिंगसाठी मंदार आणि गिरिजा प्रभूचा कमरेभर पाण्यातून जीवघेणा प्रवास, व्हिडीओ समोर
10
नाथपंथीय दीक्षा, माऊलींची परंपरा, स्वामीकृपा; ‘सोऽहम’मंत्र देणारे पावसचे स्वामी स्वरुपानंद
11
वरून वीज, खालीही वीज...! एकाला करंट लागल्याने समजले, नाहीतर...; कोणत्या शहरात घडले...
12
बॉयफ्रेंडसोबत राहण्याचा हट्ट, आईने १२ वर्षांच्या मुलीचं स्वतःच्या प्रियकराशी लग्न; नंतर पतीचा काटा काढला अन्.. 
13
आता रेल्वे प्रवासात कितीही सामान नेता येणार नाही, लवकरच निश्चित होतोय नियम; जाणून घ्या, कोणत्या क्लाससाठी किती मर्यादा?
14
'आम्हाला मतदान करा, राहुल गांधींना देशाचे पंतप्रधान करू', तेजस्वी यादवांची घोषणा
15
Thane: पावसाचा कहर, त्यात रस्त्यावरील पाण्यात साप; ठाणे शहरातील हा व्हिडीओ बघा
16
Mumbai Rains: मुंबईकरांसमोर आणखी एक संकट, मिठी नदीने धोक्याची पातळी गाठली, सतर्क राहण्याचा इशारा!
17
डॉक्टर सांगतात, सणासुदीला तळणीसाठी 'या' तेलाची निवड करा; ना वजन वाढणार, ना तब्येत बिघडणार 
18
गाझामध्ये 'हा' धोकादायक आजार का पसरतोय वेगाने? उपचारही झालेत अशक्य; डॉक्टरांची डोकेदुखी वाढली!
19
'नेहरूंनी पाकिस्तानला मदत केली होती', 'सिंधू जल' करारावरुन पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
20
"बहुत तेज बारिश है!" टीम इंडियाच्या सिलेक्शनसाठी IPL छत्रीतून सूर्या दादाची कडक एन्ट्री; व्हिडिओ व्हायरल

आंबा बागायतदारांना पुणे पोलिसाचा त्रास

By admin | Updated: May 24, 2017 18:09 IST

राजापुरातील बागायतदाराचे खोके घेतले काढून, कष्टाच्या हापूसवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : दि. २४ : स्वमालकीचे आंबे घेऊन पुण्यात वितरणासाठी जाणाऱ्या राजापूर येथील एका बागायतदाराला पुणे येथील एका महिला ट्रॅफिक पोलिसाने चांगलाच त्रास दिल्याची घटना घडली. आधी आंब्याचे तीन खोके गाडीतून काढून घेणाऱ्या या महिला पोलिसाकडून त्याने खुबीने दोन खोके परत घेतल्यानंतर गाडीत ‘फर्स्ट एड कीट’ नसल्याचा आक्षेप घेत ६00 रूपयांचा ‘दंड’ करून त्या पोलिसाने आपले ‘कर्तव्य’ निभावले.सदरची घटना सिंहगड रोडवर एका पुलानजीक घडली आहे. स्वत:च्या मालकीचे आंबे नेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून नियमितपणे त्रास दिला जात असल्याने आता याबाबत जिल्हा बागायतदार संघाच्या माध्यमातून याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा केली जात आहे.राजापूर येथील एक बागायतदार स्वत:च्या बोलेरो जीपमधून हापूस आंबा घेऊन पुणे येथे जात होता. सिंहगड उड्डाणपूल येथे एका महिला वाहतूक पोलिसाने त्यांची गाडी अडवली. तुम्ही खासगी गाडीतून करत असलेली आंबा वाहतूक बेकायदेशीर आहे, तुम्ही सिग्नल मोडला आहे, त्यामुळे तुम्हाला २0 हजार रूपये दंड भरावा लागेल आणि तुमचे लायसन्स रद्द करावे लागेल, असे त्या महिला पोलिसाने बागायतदाराला सांगितले.चुकीने सिग्नल मोडला गेला असेल तर त्यासाठीचा दंड भरायची आपली तयारी आहे. मात्र स्वत:च्या बागेतील आंबा, स्बत:च्या वाहनातून घेऊन जाणे बेकायदेशीर नाही. त्यामुळे दंड कमी करावा, अशी विनंती त्या बागायतदाराने केली. त्यावर त्या महिलेने प्रथम दहा हजार आणि मग पाच हजारांची मागणी केली.

एवढी रक्कम देणे अशक्य असल्याचे त्या बागायतदाराने सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने आंब्याचे पाच खोके देण्याची सूचना केली. हे खोके ठराविक लोकांकडे वितरित करावयाचे आहेत, त्यात जादा खोके नाहीत, असे त्याने सांगताच त्या पोलिसाने अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत गाडीतून तीन खोके स्वत:च काढून घेतले. संबंधित बागायतदाराने उर्वरित खोके पुणे येथे वितरित केले. मात्र झालेला प्रकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे तो पुन्हा त्या महिला पोलिसापर्यंत गेला. त्याने तिला सांगितले, ‘‘हे आंबे कृपया तुमच्या निष्पाप मुलांना खाण्यासाठी देऊ नका. मी आणि माझ्या कुटुंबियांनी वर्षभराच्या मेहेनतीने हे आंबा पीक घेतले आहे. तुम्ही आमचे अन्न आमच्यापासून हिसकावून घेतले असल्यामुळे तुम्हाला ते लाभणार नाही.’’ त्याने एवढे सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने अत्यंत गलिच्छ शिव्या देत आंब्याचे दोन खोके परत आणून दिले. तिसरा खोका साहेबांनी नेला असल्याचेही त्या महिला पोलिसाने सांगितले.त्यानंतर संबंधित बागायतदार तेथून निघाला आणि त्यानंतर अर्ध्या तासातच त्याला ‘गाडीमध्ये फर्स्ट एड कीट नाही, सिग्नल तोडला आणि गाडी वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी उभी केली आहे,’ अशा तीन कारणांसाठी ६00 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर झळकला.संघाकडे दाद मागणारपुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये आंबे घेऊन जाणाऱ्या बागायतदारांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. अशा बागायतदारांचा स्वत:च्या बागायतीच्या सात-बारा उतारा जवळ असणे आवश्यक आहे. सात-बारा उतारा आहे, त्यांना पोलिसांनी त्रास देणे अपेक्षित नाही. पण तरीही अशा घटना अनेकदा घडत असल्याने त्या रोखण्यासाठी जिल्हा आंबा बागायतदार संघाकडे दाद मागितली जाणार आहे.