शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
2
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
3
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
4
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
5
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
6
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
7
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना
8
इराण जे सांगतोय ते भारत आणि चीन होऊच देणार नाहीत, दोघंही मोठे व्यापारी; अमेरिकेचं गणित समजून घ्या?
9
इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने भारतीय हवाई क्षेत्राचा वापर केला? सरकारने स्पष्टीकरण दिले
10
Post Office ची सुपरहिट स्कीम; महिन्याला ₹३००० ची गुंतवणूक, ₹२.१४ लाखांचा रिटर्न निश्चित
11
"ते बोलण्यात व्यस्त, आम्ही कामात मग्न" उद्धव ठाकरेंना टोमणा, शहरात लावले पोस्टर!
12
Stock Market Today: इराण-इस्रायल युद्धाची भीती; ५३४ अंकांनी घसरुन शेअर बाजाराची सुरुवाती, IT-रियल्टीमध्ये मोठी विक्री
13
फिल्म सिटीमध्ये भीषण आग, 'अनुपमा' मालिकेचा सेट जळून खाक
14
केंद्र सरकार सीमा व्यवस्थापन प्राधिकरण स्थापन करणार; महाराष्ट्रातील खासदाराने केली होती मागणी
15
इस्त्रायल-इराण युद्धाचा भारताला फटका बसणार! फक्त १६ दिवस पुरेल एवढाच LPG गॅसचा साठा
16
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
17
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
18
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
19
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
20
धारावीत उभारणार मल्टी ट्रान्सपोर्ट हब; एमएमआरडीए लवकरच तयार करणार आराखडा

आंबा बागायतदारांना पुणे पोलिसाचा त्रास

By admin | Updated: May 24, 2017 18:09 IST

राजापुरातील बागायतदाराचे खोके घेतले काढून, कष्टाच्या हापूसवर डल्ला मारण्याचा प्रयत्न

आॅनलाईन लोकमतरत्नागिरी : दि. २४ : स्वमालकीचे आंबे घेऊन पुण्यात वितरणासाठी जाणाऱ्या राजापूर येथील एका बागायतदाराला पुणे येथील एका महिला ट्रॅफिक पोलिसाने चांगलाच त्रास दिल्याची घटना घडली. आधी आंब्याचे तीन खोके गाडीतून काढून घेणाऱ्या या महिला पोलिसाकडून त्याने खुबीने दोन खोके परत घेतल्यानंतर गाडीत ‘फर्स्ट एड कीट’ नसल्याचा आक्षेप घेत ६00 रूपयांचा ‘दंड’ करून त्या पोलिसाने आपले ‘कर्तव्य’ निभावले.सदरची घटना सिंहगड रोडवर एका पुलानजीक घडली आहे. स्वत:च्या मालकीचे आंबे नेणाऱ्या शेतकऱ्यांना पोलिसांकडून नियमितपणे त्रास दिला जात असल्याने आता याबाबत जिल्हा बागायतदार संघाच्या माध्यमातून याची दखल घेतली जावी, अशी अपेक्षा केली जात आहे.राजापूर येथील एक बागायतदार स्वत:च्या बोलेरो जीपमधून हापूस आंबा घेऊन पुणे येथे जात होता. सिंहगड उड्डाणपूल येथे एका महिला वाहतूक पोलिसाने त्यांची गाडी अडवली. तुम्ही खासगी गाडीतून करत असलेली आंबा वाहतूक बेकायदेशीर आहे, तुम्ही सिग्नल मोडला आहे, त्यामुळे तुम्हाला २0 हजार रूपये दंड भरावा लागेल आणि तुमचे लायसन्स रद्द करावे लागेल, असे त्या महिला पोलिसाने बागायतदाराला सांगितले.चुकीने सिग्नल मोडला गेला असेल तर त्यासाठीचा दंड भरायची आपली तयारी आहे. मात्र स्वत:च्या बागेतील आंबा, स्बत:च्या वाहनातून घेऊन जाणे बेकायदेशीर नाही. त्यामुळे दंड कमी करावा, अशी विनंती त्या बागायतदाराने केली. त्यावर त्या महिलेने प्रथम दहा हजार आणि मग पाच हजारांची मागणी केली.

एवढी रक्कम देणे अशक्य असल्याचे त्या बागायतदाराने सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने आंब्याचे पाच खोके देण्याची सूचना केली. हे खोके ठराविक लोकांकडे वितरित करावयाचे आहेत, त्यात जादा खोके नाहीत, असे त्याने सांगताच त्या पोलिसाने अत्यंत गलिच्छ शब्दात शिवीगाळ करत गाडीतून तीन खोके स्वत:च काढून घेतले. संबंधित बागायतदाराने उर्वरित खोके पुणे येथे वितरित केले. मात्र झालेला प्रकार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळे तो पुन्हा त्या महिला पोलिसापर्यंत गेला. त्याने तिला सांगितले, ‘‘हे आंबे कृपया तुमच्या निष्पाप मुलांना खाण्यासाठी देऊ नका. मी आणि माझ्या कुटुंबियांनी वर्षभराच्या मेहेनतीने हे आंबा पीक घेतले आहे. तुम्ही आमचे अन्न आमच्यापासून हिसकावून घेतले असल्यामुळे तुम्हाला ते लाभणार नाही.’’ त्याने एवढे सांगितल्यानंतर त्या महिला पोलिसाने अत्यंत गलिच्छ शिव्या देत आंब्याचे दोन खोके परत आणून दिले. तिसरा खोका साहेबांनी नेला असल्याचेही त्या महिला पोलिसाने सांगितले.त्यानंतर संबंधित बागायतदार तेथून निघाला आणि त्यानंतर अर्ध्या तासातच त्याला ‘गाडीमध्ये फर्स्ट एड कीट नाही, सिग्नल तोडला आणि गाडी वाहतुकीला अडथळा होईल, अशा ठिकाणी उभी केली आहे,’ अशा तीन कारणांसाठी ६00 रूपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याचा संदेश त्याच्या मोबाईलवर झळकला.संघाकडे दाद मागणारपुणे, मुंबई अशा मोठ्या शहरांमध्ये आंबे घेऊन जाणाऱ्या बागायतदारांना पोलिसांकडून मोठ्या प्रमाणात त्रास दिला जातो. अशा बागायतदारांचा स्वत:च्या बागायतीच्या सात-बारा उतारा जवळ असणे आवश्यक आहे. सात-बारा उतारा आहे, त्यांना पोलिसांनी त्रास देणे अपेक्षित नाही. पण तरीही अशा घटना अनेकदा घडत असल्याने त्या रोखण्यासाठी जिल्हा आंबा बागायतदार संघाकडे दाद मागितली जाणार आहे.