शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

संक्रमण साखळी तुटायला हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:21 IST

कोरोना संक्रमण कमी होण्यासाठी प्रशासनाला ‘हेल्पिंग हॅण्ड’चे सदस्य सुरुवातीपासून सक्रिय आहेत. गतवर्षीपासून ‘हेल्पिंग हॅण्ड’मध्ये काम करणारी मंडळी असो वा ...

कोरोना संक्रमण कमी होण्यासाठी प्रशासनाला ‘हेल्पिंग हॅण्ड’चे सदस्य सुरुवातीपासून सक्रिय आहेत. गतवर्षीपासून ‘हेल्पिंग हॅण्ड’मध्ये काम करणारी मंडळी असो वा सामाजिक संस्था आजही तितक्याच उत्साहाने कार्यरत आहेत. कोरोना संक्रमणाचा धोका वाढला असतानाच उपचारादरम्यान कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. अंत्यसंस्कारासाठी नगर परिषद कर्मचारी, सामाजिक संस्था कार्यरत आहेत. रक्ताच्या नात्यांपेक्षा अनोळखी व्यक्ती मृतांच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करीत असल्याने खरे ‘कोविड योध्दे’ ठरत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढू लागल्याने कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागातील यंत्रणेची धडपड सुरू आहे. मात्र उपचारादरम्यान काही रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी पडल्याने काहींचा मृत्यू होत आहे. वास्तविक कोरोना रुग्णाचे निधन कुटुंबीयांसाठी धक्का असतो. कोरोना संक्रमणाच्या भीतीमुळे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी निकटवर्तीय असूनही घाबरतात. अशावेळी त्या पार्थिवाचे हाल होऊ नयेत यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी मृतदेह पॅक करून नगरपरिषद किंवा जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर काही तासातच अंत्यसंस्कार आटोपले जातात. जिल्हा शासकीय रुग्णालयातून कोरोनाग्रस्ताचा मृत्यू झाल्याचे समजताच हे ‘कोविड योद्धे’ सज्ज होतात. अंत्यसंस्कार करणाऱ्या पथकांमार्फत अंत्यविधी केले जातात. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी निघण्यापूर्वी कर्मचारी स्वत:च्या सुरक्षेसाठी लागणारे पीपीई किट परिधान करतात. रुग्णवाहिकेमधून मृतदेह आल्यानंतर स्ट्रेचरवरून मृतदेह स्मशानभूमीत नेला जातो. संबंधित धर्मीयांच्या पद्धतीनुसार मृतदेहाचे दहन अथवा दफन करण्याचा विधी पार पाडला जातो. त्यानंतर पीपीई किट तेथेच जाळले जाते. अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘कोविड योध्दे’ घरी गेल्यानंतर निर्जंतुकीकरणाबरोबर स्वच्छतेची काळजी घेतात. वास्तविक कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी प्रत्येक यंत्रणेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. हेल्पिंग हॅण्ड असो वा अंत्यसंस्कार करणारी टीम असो, या प्रत्येक ‘कोविड योद्ध्या’चे काम निश्चित आदर्शवत ठरेल. दीड वर्ष झाले तरी कोरोना योद्धे लढतच आहेत. वास्तविक त्यांचे कार्य, जिद्द, संयम याचे तरी भान सर्वसामान्य माणसांनी राखले तर नक्कीच जिल्हा कोरोनामुक्त होण्यास वेळ लागणार नाही.

- मेहरून नाकाडे