शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
4
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
5
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
6
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
7
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
8
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
9
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
10
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
11
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
12
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
13
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
14
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
15
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
16
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
17
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
18
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
19
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
20
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा

ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची बेसुमार लूट

By admin | Updated: May 23, 2016 00:17 IST

रत्नागिरी-मुंबई प्रवास : गर्दीच्या हंगामात दीड हजारपर्यंत भाडे

रत्नागिरी : मे महिन्याचा हंगाम असल्याने खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरू आहे. मुंबई वा पुण्याला जाण्यासाठी आता गर्दीच्या हंगामात ११०० ते १५०० रुपये मोजावे लागत आहेत. एस. टी. महामंडळाने दोन-चार रुपये वाढवले तर ओरड केली जाते. मात्र, खासगी ट्रॅव्हल्सकडून चाललेल्या लुटीबाबत सर्वच मूग गिळून गप्प आहेत. सध्या उन्हाळ्याची सुटी सुरु आहे. त्यामुळे मुंबई, पुणे येथे नोकरीनिमित्त असलेले हजारो लोक जिल्ह्यात आले आहेत. तीव्र उन्हामुळे एस. टी. आणि रेल्वेच्या गाड्यांचा प्रवास नकोसा वाटतो. तरीही एस. टी. आणि रेल्वेला तोबा गर्दी असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. रत्नागिरी - दादर पॅसेंजर रेल्वे गाडी रत्नागिरी स्थानकातच हाऊसफुल होत आहे. रत्नागिरीतूनच मुंबईपर्यंत रेल्वेने प्रवाशांना उभ्याने प्रवास करावा लागतो. रत्नागिरी - दादर पॅसेंजर नेहमीच प्रवाशांनी लगडलेली असते. त्यामुळे गर्दीच्या हंगामात रत्नागिरीहून रात्रीच्या वेळेस मुुुंबईकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे गाडी सुरू केल्यास भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकतो.एस. टी. महामंडळाच्या गाड्यांनी प्रवास करणे नेहमीच सोयीचे असते. कारण एखादा अपघात झाला, तर महामंडळाकडून जखमी प्रवाशांवर उपचार केले जातात. तसेच अपघातात प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला आर्थिक मदतीचा हातभार दिला जातो. तसेच गाडी रस्त्यात नादुरुस्त झाली तर महामंडळाकडून दुसऱ्या गाडीने प्रवाशांची सोय करण्यात येते. एकंदरीत एस. टी. प्रवास फायद्याचा आणि सुरक्षित ठरू शकतो, तरीही लोक दामदुप्पट रक्कम मोजून खासगी वाहनाने प्रवास का करतात.रेल्वे व एस. टी.च्या गाड्यांना तुफान गर्दी असल्याचा गैरफायदा येथील खासगी ट्रॅव्हल्स कंपन्या घेत आहेत. रेल्वे, एस. टी. आणि रेल्वेच्या गाड्यांना असलेल्या गर्दीमुळे प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सकडे वळत आहेत. हंगाम नसताना ४०० ते ५०० रुपये तिकीट विक्री असलेल्या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून प्रवाशांची लूट सुरु आहे. या ट्रॅव्हल्स कंपन्यांकडून ११०० ते १५०० रुपयांपर्यंत तिकीट विक्री सुरू आहे. (शहर वार्ताहर)