शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
4
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
5
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
6
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
7
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
8
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
9
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
10
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
11
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
12
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
13
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
14
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
15
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
16
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
17
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
18
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
19
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
20
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल

माेडकाआगर पुलावरून १५ जूनपर्यंत वाहतूक सुरू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क असगोली : : कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत मोडकाआगर धरणावरील नवा पूल वाहतुकीला सुरू करणार, असा शब्द ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

असगोली : : कोणत्याही परिस्थितीत १५ जूनपर्यंत मोडकाआगर धरणावरील नवा पूल वाहतुकीला सुरू करणार, असा शब्द मनीषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने यांनी आमदार भास्कर जाधव यांना दिला. मोडकाआगर पूल आणि गुहागरपर्यंतच्या रस्त्याच्या कामाचा आढावा आमदार जाधव यांनी मंगळवारी घेतला.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी अत्यंत किरकोळ कामात गणना केलेले मोडकाआगर पुलाचे काम गेले वर्षभर सुरू आहे. या पुलामुळे जनता, एस. टी. आणि खासगी वाहतूकदार वैतागले आहेत. यावर्षीच्या पावसाळ्यात पुलावरून वाहतूक सुरू झाली नाही, तर पुढचे पाच महिने पुन्हा एकदा जनतेला १५ किलोमीटरचा वळसा घालून शृंगारतळीत जावे लागणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार भास्कर जाधव यांनी मंगळवारी पुलाच्या कामाचा आढावा घेतला. मोडकाआगरच्या पुलावर अधिकाऱ्यांसोबत आमदार थांबल्यावर मनीषा कन्स्ट्रक्शनचे मालक शिवाजी माने आणि त्यांचे बंधू दोघांनीही पुलाचे काम १५ जूनपर्यंत पूर्ण करणार असल्याचे सांगितले. पुढच्या चार-पाच दिवसांत पुलाच्या दुसऱ्या बाजूच्या संरक्षक भिंतीचे काम सुरू होईल. ते काम झाले की जुना पूल तोडून इथले दगड आणि माती तेथे टाकणार. क्रॉंक्रिट रोड होणार नाही. खडीकरण करून वाहतूक सुरू करणार, असे सांगितले.

आमदार जाधव म्हणाले की, तुमचे काम चांगले आहे, गुणवत्तापूर्ण आहे, त्याबद्दल वाद नाही. मात्र, पुलाचे काम पूर्ण झाले नाही, तर पावसाळ्यात बाजूने वाहतूक पूर्ण होऊ शकत नाही. मी सर्वांना विचारल्याशिवाय कोणतीच गोष्ट जाहीर करत नाही, असे सांगितले़. हे तालुक्यातील पहिलेच काम आहे. हे काम करणारच. आता किरकोळ काम उरले आहे. पूल सुरू करतानाच रस्त्याच्या कामालाही सुरुवात करत आहोत. न्यायालयापासून पुलापर्यंत एका बाजूचा रस्ताही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत, असे आश्वासन शिवाजी माने यांनी दिले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समितीच्या सभापती पूर्वी निमुणकर, उपसभापती सीताराम ठोंबरे, पंचायत समिती सदस्य, उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे कार्यकारी सलीम शेख, उपअभियंता मराठे उपस्थित होते.

-------------------

गुहागर तालुक्यातील माेडकाआगर पुलाच्या पाहणीदरम्यान महामार्गाच्या कामाबाबत ठेकेदाराशी आमदार भास्कर जाधव यांनी चर्चा केली़.