शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
3
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
4
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
5
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
6
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
7
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
8
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
9
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
10
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
11
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
12
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
13
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
14
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
15
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
16
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
17
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
18
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...
19
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
20
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश

वेरळ घाटातील वाहतूक सहा तासानंतर सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:22 IST

लांजा : गोव्याहून - मुंबईच्या दिशेने २० टन वजनाची क्रेन घेऊन जाणारा कंटेनर रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान वेरळ ...

लांजा : गोव्याहून - मुंबईच्या दिशेने २० टन वजनाची क्रेन घेऊन जाणारा कंटेनर रविवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान वेरळ घाटामधील यु आकाराच्या वळणावर उलटल्याने महामार्गावरील वाहतूक ६ तास ठप्प झाली हाेती. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या हाेत्या. क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर बाजूला केल्यानंतर ही वाहतूक सुरळीत झाली.

गोव्याहून बाबू विष्णू लोहार (३०, रा. राजगोरी, ता. सांगोला, जि. सोलापूर) हा कंटेनर (एमएच ४८, एआर ९२५९)ने २० टन क्रेन घेऊन मुंबईच्या दिशेने जात हाेता. वेरळ घाट उतरत असताना यु आकाराच्या वळणावर चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर महामार्गावर क्रेनसह उलटला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली हाेती. या अपघाताची माहिती मिळताच लांजाचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव, वाहतूक पोलीस रहिम मुजावर, भालचंद्र रेवणे, महिला पोलीस तृप्ती सावंतदेसाई तसेच होमगार्ड यांनी घटनास्थळी जाऊन खोळंबलेली वाहतूक व प्रवाशांना शांत केले. त्यानंतर रत्नागिरी येथून दुपारी १२ वाजता क्रेन आल्यानंतर कंटेनर सरळ करण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, उतार व यु आकाराचे वळण तसेच अरुंद असलेला रस्ता यामुळे कंटेनर उभा करण्यात अडचणी येत होत्या. त्यामुळे दुसरी क्रेन बोलावण्यात आली.

दोन्ही क्रेनच्या सहाय्याने हा कंटेनर व क्रेन ३.३० वाजता बाजूला करण्यात आली. त्यानंतर तब्बल ६ तासाने वाहतूक सुरळीत झाली.

-----------------------------

महिनाभरातील तिसरा अपघात

सहा तासांच्या कालावधीत रत्नागिरी येथे तसेच मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक देवधे काजरघाटीमार्गे तसेच आसगेमार्गे वळविण्यात आली होती. तरीही देवधे शेतीशाळेपर्यंत तसेच आंजणारी घाटापर्यंत वाहनांच्या लांबच लाब रांगा लागल्या होत्या. वेरळ घाटातील यु आकाराच्या वळणावर या महिन्याभरामध्ये झालेला हा तिसरा अपघात आहे. वाहनचालक व प्रवाशांनी येथे पर्यायी मार्गाची व्यवस्था तसेच वळण रुंदीकरणाची मागणी केली आहे.