शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे स्थानकांवर प्रवाशांचा हंगामा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 16:58 IST

रत्नागिरी : गौरी - गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबईकरांची परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी उसळत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर गोवा व सावंतवाडीहून येणाºया गाड्या भरून येत आहेत. त्यामुळे बोगींचे दरवाजेच उघडले जात नाहीत. परिणामी रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये तंटे सुरू आहेत. अधिकाºयांना धारेवर धरले जात आहे. या गाड्यांमध्ये प्रवेशच न मिळाल्याने गुरूवारी रात्री बहुसंख्य प्रवाशांना स्थानकांवरच रात्र जागत काढावी लागली.

रत्नागिरी : गौरी - गणपतीच्या विसर्जनानंतर मुंबईकरांची परतीच्या प्रवासासाठी जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी उसळत आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांवर गोवा व सावंतवाडीहून येणाºया गाड्या भरून येत आहेत. त्यामुळे बोगींचे दरवाजेच उघडले जात नाहीत. परिणामी रत्नागिरीसह जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर गाडीतील व प्लॅटफॉर्मवरील प्रवाशांमध्ये तंटे सुरू आहेत. अधिकाºयांना धारेवर धरले जात आहे. या गाड्यांमध्ये प्रवेशच न मिळाल्याने गुरूवारी रात्री बहुसंख्य प्रवाशांना स्थानकांवरच रात्र जागत काढावी लागली.

गुरूवारी गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच रेल्वे स्थानकांवर मुंबईत परतण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी उसळली. मात्र, गुरूवारी सावंतवाडीहून सायंकाळी सुटलेली तुतारी एक्सप्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकांवरच फुल्ल झाली. वैभववाडीतही अनेक प्रवाशांना गाडीत प्रवेश मिळाला नाही. त्यानंतर गाडीतील प्रवाशांनी या गाडीच्या जनरल बोगींचे दरवाजेच बंद केले.

या गाडीत शिरायलाही वाव नव्हता. राजापूरपासून प्रवाशांना गाडीतील जनरल बोगींमध्ये जागाच नाही, अशी स्थिती निर्माण झाली. रत्नागिरी स्थानकात रात्री ही गाडी दहा वाजण्याच्या सुमारास आली. तेव्हा हंगामा झाला. जागाच न मिळाल्याने प्रवाशांनी आदळआपट करून संताप व्यक्त केला. रत्नागिरीसह चिपळूण व खेड स्थानकांवर गाडीतील प्रवासी व प्लॅटफॉर्मवरील प्रवासी यांच्यात बाचाबाची झाली. रेल्वे पोलिसांनी हस्तक्षेप करूनही हा हंगामा सुरूच होता.

तुतारी एक्सप्रेसनंतर मडगावहून सायंकाळी सुटलेली कोकणकन्या मुळातच मडगावहून भरून आली. उरलीसुरली जागा सिंधुदुर्गमधील गणेशभक्तांनी अडवली. रात्री ११.३० वाजण्याच्या सुुमारास रत्नागिरी स्थानकात आलेल्या या गाडीच्या जनरल बोगींचे दरवाजेही बंद होते. त्यामुळे पुन्हा दरवाजांवर धडक मारली गेली.