शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

परशुराम घाटातील वाहतूक २५ एप्रिल ते १० मे पर्यंत दररोज पाच तास राहणार बंद

By अरुण आडिवरेकर | Updated: April 20, 2023 21:03 IST

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे.

रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गावरील चिपळूण तालुक्यातील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाहतूक २५ एप्रिल २०२३ ते १० मे २०२३ या कालावधी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या कालावधीत बंद राहणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिरा दिले आहेत. या कालावधीमध्ये हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी- आंबडस- चिपळूण मार्गे मिळवण्यात येणार आहे.

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी  रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. या दाैऱ्यात त्यांनी महामार्ग चौपदरीकरणाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण होईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर या कामाने वेग घेतला आहे. परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. साधारण ५.४० किलाेमीटर इतक्या लांबीचा हा घाट असून, त्यातील ४.२० किमी लांबीच्या चौपदरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, उर्वरित १.२० किमी भाग हा डोंगररांगा आणि खोल दरीचा असल्यामुळे चौपदरीकरणाच्या कामासाठी अवघड स्वरूपाचा आहे. त्यामुळे हे काम करताना घाट वाहतुकीसाठी बंद करावा, अशी मागणी कशेडी परशुराम हायवे प्रा. लि. या नियुक्त ठेकेदाराने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. तर रत्नागिरी विभागासह येथे कार्यरत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभाग पेण – रायगड यांनीही ही मागणी केली होती.

घाटातील वाहतूक बंद ठेवल्यास अधिक वेगाने काम करता येईल, अशी धारणा हे काम करणाऱ्या नियुक्त ठेकेदार कंपनीची आहे. त्यामुळे घाटातील वाहतूक बंद ठेवण्याची मागणी करण्यात येत हाेती. अखेर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी गुरूवारी रात्री उशिराने हा घाट बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार २५ एप्रिलपासून घाटातील वाहतूक बंद राहणार आहे.