शहरं
Join us  
Trending Stories
1
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
2
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
3
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
4
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
5
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
6
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
7
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
8
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
9
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
10
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव
11
Shefali Jariwala: बायकोच्या अस्थी हृदयाला कवटाळल्या अन् ढसाढसा रडला, बघवत नाहीये पराग त्यागीची अवस्था
12
३०,००० एकर जमीन, १५० कोटींचे रत्न भंडार अन्.. जगन्नाथ मंदिराची संपत्ती पाहून डोळे विस्फारतील
13
Triumph Trident: बाईक प्रेमींना मोठं सरप्राईज मिळणार? लवकरच बाजारात येतेय ट्रायम्फ ट्रायडंट ६६० स्पेशल एडिशन
14
एक एकर नांगरणीसाठी केवळ ३०० रुपये खर्च, देशातील पहिल्या ई- ट्रॅक्टरची ठाण्यात नोंदणी, परिवहन मंत्री म्हणाले...   
15
10th Pass Job: दहावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी उच्च न्यायालयात नोकरी, संधी सोडू नका!
16
'वेडेपणा अन् विनाशकारी निर्णय...', ट्रम्प यांच्या 'बिग ब्यूटीफुल' विधेयकावर मस्क यांची जहरी टीका
17
लाटांमुळे तोल गेला अन्... हाजी अली समुद्रात अस्थी विसर्जन करताना दोघांचा मृत्यू, एकाला वाचवलं
18
"४० वर्षांचा संसार मोडून तिने..." महुआ मोईत्रा आणि कल्याण बॅनर्जींमध्ये जुंपली, म्हणाले, "मला उपदेश देतेय"
19
"मराठीचे मारेकरी, हिंदीचे सेवेकरी" मनसेचा फडणवीसांना टोला, शेअर केला 'असा' फोटो!
20
षटकार ठोकला आणि मैदानात पडला, हृदयविकाराच्या झटक्याने फलंदाजाचा मृत्यू  

पारंपरिक बुरुड व्यवसाय अस्ताकडे

By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST

प्रयत्नांची गरज : कोकणला प्रतिक्षा बांबू खरेदीदारांची, पुढे कोण येणार ?

एजाज पटेल -फुणगूस -वाढत्या शहरीकरणामुळे पारंपारिक बुरुड व्यवसाय लोप पावत आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास झपाट्याने होत असताना, अनेक पारंपरिक कोकणी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या पारंपारिक बुरुड व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. मनिआॅर्डरचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीत ठराविक लोकच बुरुड व्यवसाय करीत होते. कालांतराने त्यांच्या नवीन पिढीनेही नोकरी उद्योगाची वाट धरली. कालांतराने या व्यवसायातही परजिल्ह्यातील कारागिरांनी शिरकाव केला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, येथून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह आलेल्या या कारागिरांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुबक, आकर्षक वस्तू बनवून लोकांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शहरानजीकच्या मोकळ्या मैदानी जागेत या बुरुडांनी आपला तळ ठोकला. अनेक वर्षे झोपड्या बांधून राहिलेल्या या लोकांनी या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली. कोकणात बांबूचे पीक मुबलक प्रमाणात आहे. हा बांबू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करून त्यापासून बांबूची बेळे काढून, अतिशय सुबक आकर्षक अशा टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शो-पीस बनवून, त्यांची शहराप्रमाणेच ग्रामीण भागात दारोदारी फिरून विक्री केली जात असे. अल्प गुंतवणूकीच्या या व्यवसायातून नफा मात्र दुप्पट मिळत असे. आज शहरातील बुरूड व्यावसायिक गायब झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातही त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहेत. जिल्ह्यात पर्यटनांचे वारे वाहत असताना पर्यटनाच्या माध्यमातून पारंपारिक व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत असताना, येथील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करतील अशा नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. वाढती बेकारी, कर्ज घेऊन उद्योग सुरु करताना निर्माण होणाऱ्या अडचणी, यामुळे अनेक बेरोजगार वैफल्यग्रस्त आहेत. त्यांना अत्यंत कमी भांडवलात उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक; मात्र खरेदी करण्यासाठी समोर येत नसल्याने, याबाबत आता उपाय योजणे गरजेचे आहे. (वार्ताहर)