शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
4
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
5
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
6
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
7
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
8
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
9
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
10
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
11
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
12
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
13
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
14
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
15
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
16
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
17
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
18
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
19
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
20
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी

पारंपरिक बुरुड व्यवसाय अस्ताकडे

By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST

प्रयत्नांची गरज : कोकणला प्रतिक्षा बांबू खरेदीदारांची, पुढे कोण येणार ?

एजाज पटेल -फुणगूस -वाढत्या शहरीकरणामुळे पारंपारिक बुरुड व्यवसाय लोप पावत आहे. जिल्ह्याचा पर्यटन विकास झपाट्याने होत असताना, अनेक पारंपरिक कोकणी व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या पारंपारिक बुरुड व्यवसायाला उर्जितावस्था आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. मनिआॅर्डरचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या रत्नागिरीत ठराविक लोकच बुरुड व्यवसाय करीत होते. कालांतराने त्यांच्या नवीन पिढीनेही नोकरी उद्योगाची वाट धरली. कालांतराने या व्यवसायातही परजिल्ह्यातील कारागिरांनी शिरकाव केला. पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, येथून पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह आलेल्या या कारागिरांनी आपल्या हस्तकौशल्यातून सुबक, आकर्षक वस्तू बनवून लोकांचा विश्वास संपादन केला. या व्यवसायातून त्यांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध झाल्याने, त्यांच्याकडे पैसा खेळू लागला. शहरानजीकच्या मोकळ्या मैदानी जागेत या बुरुडांनी आपला तळ ठोकला. अनेक वर्षे झोपड्या बांधून राहिलेल्या या लोकांनी या व्यवसायात आपली मक्तेदारी निर्माण केली. कोकणात बांबूचे पीक मुबलक प्रमाणात आहे. हा बांबू अत्यंत कमी किंमतीत खरेदी करून त्यापासून बांबूची बेळे काढून, अतिशय सुबक आकर्षक अशा टोपल्या, चटई, सुपे, रवळ्या तसेच शो-पीस बनवून, त्यांची शहराप्रमाणेच ग्रामीण भागात दारोदारी फिरून विक्री केली जात असे. अल्प गुंतवणूकीच्या या व्यवसायातून नफा मात्र दुप्पट मिळत असे. आज शहरातील बुरूड व्यावसायिक गायब झाले आहेत. मात्र, ग्रामीण भागातही त्यांचे दर्शन दुर्मिळ झाले आहेत. जिल्ह्यात पर्यटनांचे वारे वाहत असताना पर्यटनाच्या माध्यमातून पारंपारिक व्यवसायांना चालना देण्याचा प्रयत्न होत असताना, येथील युवकांनी या व्यवसायाकडे वळणे आवश्यक आहे. पर्यटकांना आकर्षित करतील अशा नवनवीन शोभिवंत वस्तूंची निर्मिती बांबूपासून केल्यास आर्थिक उत्पन्नाचा नवा स्रोत निर्माण होईल. वाढती बेकारी, कर्ज घेऊन उद्योग सुरु करताना निर्माण होणाऱ्या अडचणी, यामुळे अनेक बेरोजगार वैफल्यग्रस्त आहेत. त्यांना अत्यंत कमी भांडवलात उत्पन्न मिळवून देणारा हा व्यवसाय फायदेशीर आहे. कोकणात बांबूचे पीक मुबलक; मात्र खरेदी करण्यासाठी समोर येत नसल्याने, याबाबत आता उपाय योजणे गरजेचे आहे. (वार्ताहर)