शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

पर्यटन आराखडा शासनाकडे गेलेलाच नाही

By admin | Updated: April 3, 2016 23:31 IST

उदय सामंत : एकाच मंदिराजवळ दोन उंदीर का?

रत्नागिरी : गणपतीपुळे पर्यटन विकासाचा ७८ कोटी ७ लाख ११ हजार रुपयांचा आराखडा शासनाकडे पाठविल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. मात्र, शनिवारी घेतलेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा आराखडा पाठविलाच नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आराखडा योग्य सुधारणांसह शासनाकडे पाठविला जावा, असे प्रतिपादन आमदार उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले. गणपतीपुळे पर्यटन विकास आराखड्यातील काही सुधारणा निश्चितच चांगल्या आहेत. मात्र, गणपती मंदिराच्या प्रवेशद्वारावर उंदराची सुंदर प्रतिकृती असताना तेथून बऱ्याच अंतरावर हॉटेलजवळील एका चौकात उंदराची दुसरी प्रतिकृती बनविण्याचा अट्टाहास नागरिकांनाही पटलेला नाही. एकाच मंदिराजवळ दोन उंदिर असावेत का? हा प्रश्न आहे. शंकराच्या मंदिरात पिंडीसमोर ज्याप्रमाणे नंदीची मूर्ती असते तसेच गणपती मंदिराजवळच उंदराची मूर्तीही असावी, ही भक्तांची भावना आहे. आराखड्यात वाहनतळ विकसित करणे, किमान २० स्त्री व २० पुरुष प्रसाधनगृहे, रस्ते व सांडपाणी व्यवस्था यासाठी ३ कोटी ४५ लाख रुपये अंदाजित खर्च दाखविण्यात आला आहे. यासाठी जी २१ एकर जागा लागणार आहे, त्यामध्ये १३४ जागा मालक आहेत. त्यापैकी ७१ मालकांनी या प्रस्तावाचा विचार करू, असे लिहून दिले आहे. उर्वरित मालकांनी अद्याप यासाठी तयारी दर्शवलेली नाही. ज्या प्रस्तावासाठी ३ कोटी ४५ लाख अंदाजित खर्च दाखविला आहे, त्यातील जागा खरेदीसाठीच ३ कोटी ४५ लाख लागणार आहेत. त्यामुळे आराखड्यातील या कामासाठी सुचविलेली रक्कम प्रत्यक्षात लागणाऱ्या रकमेपेक्षा कमी आहे. आराखड्यात सांडपाणी व्यवस्थेसाठी जागेचा शोध सुरू असल्याचे म्हटले आहे. तसेच मालगुंड व भगवतीनगर नळपाणी योजनेचा प्रस्तावही आहे. ही कामे नक्कीच चांगली आहेत. (प्रतिनिधी) सुरक्षा योजना वाऱ्यावर... नवीन पर्यटन आराखड्यानुसार गणपतीपुळे मंदिराजवळील सुरक्षा योजना प्रस्तावित आहे. पण या योजनेची जबाबदारी घेणार कोण, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. राज्य शासन सुरक्षा योजनेची जबाबदारी घेण्यास तयार नाही. मंदिर व्यवस्थापन व ग्रामपंचायतही ही योजना सांभाळण्यास तयार नाहीत. तसेच जे गाळे येथे पडून आहेत ते सीआरझेडमध्ये आहेत. तेथेच पुन्हा गाळे उभारण्याचा चंग बांधण्यात आला आहे.