शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... 
2
७/११तील सर्व दोषी निर्दोष, सरकारसमोर कोणते पर्याय; पुढे काय होणार? कायदेतज्ज्ञ म्हणतात...
3
अजित पवारांविरोधात छावा संघटना आक्रमक; NCP कार्यालयावर दगडफेक, जाळण्याचाही प्रयत्न
4
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
5
मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला
6
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
7
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
8
आता ATM मधून पैसे काढायला कार्डची गरज नाही! 'या' सोप्या पद्धतीने UPI द्वारे काढा कॅश
9
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
10
नेपोकिड्सचा दाईजान! 'सैय्यारा'चं कौतुक केल्यावर करण जोहर झाला ट्रोल, उत्तर देत म्हणाला...
11
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
13
अमेरिका-भारत व्यापार कराराकडे बाजाराचे लक्ष; तिमाही निकाल आणि परकीय गुंतवणुकीचा कस
14
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
15
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
16
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
17
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
18
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
19
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
20
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल

पर्यटनस्थळांचा विसर

By admin | Updated: July 29, 2015 22:07 IST

मंडणगड तालुका : नियोजन समितीचे लक्षच नाही...

मंडणगड : मागासलेला म्हणून प्रशासकीय पातळीवर नेहमीच दुर्लक्षित असलेल्या मंडणगड तालुक्यातील पर्यटनस्थळांचा जिल्हा नियोजन समितीने यात्रास्थळांच्या विकास निधीसाठी विचारच न केल्याने तालुक्यातील ही पर्यटनस्थळे दुर्लक्षित राहणार आहेत.जिल्हा परिषदेत तालुक्याचे नेतृत्व करणारे जिल्हा परिषदेचे तीनही सदस्य आपल्या तालुक्याचे प्रश्न मांडण्यात कमी पडत असल्याचे पुन्हा एकदा निष्पन्न झाले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळगाव असलेल्या आंबडवे या तालुक्यातील गावाचा क वर्ग पर्यटनस्थळासह आदर्श संसद ग्राम योजनेत नुकताच समावेश करण्यात आला आहे. बाणकोट येथील किल्ले हिंमतगडचा राज्य शासनाने ड वर्ग पर्यटनस्थळात नुकताच समावेश केला आहे. याचबरोबर सांस्कृतिक कार्य विभागाने या किल्ल्याची राज्य संरक्षित स्मारक म्हणूनही घोषणा केली आहे. नाना फडणवीसांचे मूळ गाव वेळास हे सागरी कासव संवर्धन मोहीमुळे जगाच्या नकाशावर आले आहे. पर्यटकांना आठवड्याची सुटी मजेत घालवण्यासाठी वेळास हे ‘हॉट डेस्टिनेशन’ ठरत आहे.राज्य व देशपातळीवर दखल घेतलेल्या तालुक्यातील तीनपैकी एकाही गावाचा जिल्ह्यातील महत्त्वाच्या ८१ यात्रास्थळांमध्ये समावेश न झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यंदा यात्रास्थळांच्या विकासासाठी १ कोटी ४० लाखांचा तरतूद जिल्हा नियोजनमधून करण्यात आली आहे. राज्य शासनाचे धोरण पर्यटन विकासाला अनुकूल असून, जिल्हा नियोजन समितीचे प्रमुख व जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर हे रत्नागिरी जिल्ह्याचा पर्यटन जिल्हा म्हणून विकास करण्यासाठी विशेष आग्रही आहेत. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून जिल्हास्तरावर राबवण्यात आलेला पर्यटन महोत्सव तालुकास्तरावर नेऊन अधिक लोकाभिमुख करण्याची घोषणाही पालकमंत्र्यांनी यापूर्वीच केली आहे.जागतिकस्तरावर दखल घेतल्या गेलेल्या तालुक्यातील तीन बलस्थानांचा संबंधितांना विसरच कसा पडला, हा प्रश्न आहे. जिल्हा नियोजनमधून जिल्ह्यासाठी करण्यात आलेली तरतूद अत्यंत तूटपुंजी असल्याच्या तक्रारीचा सुरु जिल्हाभरातून येत आहे. या पार्श्वभूमीवर मंडणगडसारख्या उत्तरेच्या टोकाकडील तालुक्याचा विसरच पडल्याने मंडणगड तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींची कार्यपध्दती नकारात्मक असल्याचे पुन्हा एकदा सिध्द झाले आहे. (प्रतिनिधी)