शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

फेरफटका - मुलं घडवणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

अनौपचारिक गप्पांतून सहावीच्या मराठी विषयातील ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही छोटीशी कविता घेऊन मी मुलांशी बोलू लागलो. त्या मुलांना अनेक ...

अनौपचारिक गप्पांतून सहावीच्या मराठी विषयातील ‘चवदार तळ्याचे पाणी’ ही छोटीशी कविता घेऊन मी मुलांशी बोलू लागलो. त्या मुलांना अनेक गोष्टींचा अर्थ समजला नाही, असं समजलं. उदाहरण सांगतो - मुलांना विचारलं की, कवयित्री आपल्या कवितेत करुणा हा शब्द कशासाठी वापरतात? तिसरीतल्या चिनूने उत्तर दिले की करुणा म्हणजे कोरोना, तर सातवीतल्या पवनने सांगितले की, करुणा म्हणजे करु नका आणि ऋग्वेदने सांगितले की, कोरोना करु नका. मला खूप आश्चर्य वाटले. मुलांना कवितेचा अर्थच समजला नाही. परंतु, त्यांनी कवितेखाली दिलेल्या स्वाध्यायाची उत्तरे मात्र अगदी बरोबर सोडवली होती. मग मी विचारलं की, ‘ऋग्वेद तू ही उत्तरे कशी लिहिलीस’, तर तो म्हणाला की, ‘स्वाध्यायमालेतील उत्तरावरून मी ती उत्तरे लिहिली.’ मला कळले की मुलांनी कवितेचा अर्थ न समजून घेता उत्तरं लिहिली आहेत. बहुतेकवेळा शाळेमध्ये असेच घडते आणि मुलांच्या कोणत्याही बौद्धिक क्षमतेचा विकास होत नाही.

दुसरी गोष्ट, त्या कवितेत परंपरा हा शब्द होता. मी मुलांना विचारलं की, परंपरा म्हणजे काय? तर पवनने उत्तर दिलं की, परंपरा म्हणजे कुटुंब. बाकीच्यांनीही त्याचीच री ओढली. मग त्यांना सविस्तर सांगायला सुरुवात केली की, तुम्ही आता याच आठवड्यात होळी केली. होळीची परंपरा आहे. मग होळी का केली, तसा चिनू म्हणाला, ‘होळी जाळण्यासाठी केली.’ मग काय? जाळलं तर झाडं जाळली. मग झाडं जाळून तुम्हाला काय? मिळालं? काही नाही आनंद मिळाला. मग ही होळीची परंपरा जाळून आनंद घेण्यात आहे? का? असं विचारलं तर मुलं गप्प बसली. मग मुलांना मी प्रश्न विचारला की, आपण का जेवतो. मुलं म्हणाली भूक लागते म्हणून. आपण आंघोळ का करतो, अंग स्वच्छ ठेवावं म्हणून. दात का घासतो, दात किडू नयेत म्हणून. याला जशी कारणे आहेत तशी परंपरेलाही काही कारणं आहेत. आपण सण-उत्सव साजरे करतो त्या पाठीमागे काय? परंपरा आहे? तर मुलांनी नकार दिला. मला काही कळायलाच मार्ग नाही. मग कवितेतील प्रत्येक शब्दांवर त्यांच्याशी चर्चा केली. त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न केला, पण मुले या कवितेखालील प्रश्नोत्तरांव्यतिरिक्त काहीच बोलायला तयार नव्हती. त्यांना म्हटलं, घरीदारी किंवा मला कधी विचारलंत का, याचा अर्थ काय? आहे, हे म्हणजे काय? आहे? तर मुलांनी उत्तर दिलं, काहीच कुणालाही विचारलं नाही. मग ओमकार म्हणाला की, मला असं वाटतं की, सर, या लॉकडाऊनमध्ये आम्हाला शाळेमध्ये नीटसं शिकवणं झालं नसल्यामुळे आम्हाला काही कळेनासं झालं आहे. ठीक आहे? म्हटलं. आपण आता मागच्या इयत्तेमधील अभ्यास करूयात, म्हणून मी सहावीच्या मुलाला चौथीच्या पुस्तकासंदर्भात विचारलं, तेव्हा तो म्हणाला, माझ्या आता लक्षात काहीच नाही.

या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर नि मुलांच्या निरागस, कोवळ्या चेहऱ्याकडे पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की, ज्या पिढीला आपण घडवण्याचा ध्यास बाळगून काम करतो आहोत, खरंच ही पिढी घडणार आहे का? खरंच ह्या पिढीला सगळ्या गोष्टी समजणार आहेत का? खरंच शब्दांचे अर्थ त्यांना समजणार आहेत का? जर उमजणार नसतील तर मग आपण एवढा अट्टहास का बरं करतो. मुलांना शिकवणं, मुलांना घडवणं याचा अर्थ फक्त पुढच्या वर्गात घालणं, वह्यांची नुसती पानं भरून उत्तरे लिहायची, हा जर अभिप्रेत असेल, तर मुलं सक्षम कधी करणार आम्ही? घडवण्यासाठी मुळात मुलाच्या आतमध्ये डोकावून त्याला काय समजलं, काय उमजलं, हे पाहणे आवश्यक आहे, अन्यथा केवळ पोपटपंचीच होईल. मग लॉकडाऊन असो अगर नसो. म्हणून प्रत्येक मुलाला नवीन शैक्षणिक धोरणानुसार काय समजलं, काय उमजलं हे पाहण्याबरोबरच मुलं घडवणं गरजेचं आहे.

- गजानन पाटील