शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

जाधवांच्या मतदारसंघात आज वायकरांचा दरबार

By admin | Updated: February 26, 2015 00:15 IST

गुहागर पंचायत समितीसह गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व असल्याने जनता दरबारामध्ये कोणते प्रश्न मांडले जातात, हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.

गुहागर : पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर पहिल्यांदाच उद्या (दि. २६) सकाळी १० वाजता गुहागर तालुका जनता दरबाराच्या माध्यमातून जनतेची गाऱ्हाणी ऐकणार आहेत. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव या मतदारसंघाचे आमदार आहेत. गुहागर पंचायत समितीसह गुहागर नगरपंचायत राष्ट्रवादीचे एकतर्फी वर्चस्व असल्याने जनता दरबारामध्ये कोणते प्रश्न मांडले जातात, हा राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या गुहागर मतदारसंघाच्या फेररचनेनंतर शिवसेना व भाजप यांच्या भांडणात राष्ट्रवादीकडे गेला. या विधानसभा निवडणुकीमध्ये युती न झाल्याने तीच स्थिती असून, भास्कर जाधव ३५ हजारांच्या मोठ्या फरकाने निवडून आले. राज्यमंत्री, पालकमंत्री व कॅबिनेटमंत्री म्हणून काम करताना भाजपच्या ताब्यातील गुहागर पंचायत समितीसह बराच काळ वादाचा विषय ठरलेली गुहागर नगरपंचायतही राष्ट्रवादीकडे एकतर्फी संख्याबळाने गेली. पराजित झाल्यानंतर तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास कदम व यावेळी शिवसेनेचे उमेदवार विजय भोसले या मतदारसंघात पुन्हा फिरकले नाहीत. डॉ. विनय नातूंनीही निवडणूक वगळता राजकारणापासून अलिप्त राहणे पसंत केले.शिवसेनेचे खासदार व सध्याचे उद्योगमंत्री यांचा या मतदारसंघाशी फारसा संपर्क नाही. शिवसेनेमध्ये गीते व रामदास कदम गट निर्माण झाल्याने शिवसेनेकडून रवींद्र वायकर यांना पालकमंत्री पद देण्यात आल्याची चर्चा आहे. यावेळी वायकर भास्कर जाधव यांच्या विरोधात कशा प्रकारे राजकीय आक्रमकता दाखवतात, गीते व कदम गट रोखण्यासाठी वायकरांची निवड केलेली असताना यावेळी सर्व शिवसेना कार्यकर्ते एकदिलाने काम करताना दिसतात का? येथील भाजप कार्यकर्त्यांशी कशा प्रकारे संवाद साधतात? अशा अनेक राजकीय बाबी वायकर यांच्या गुहागर दौऱ्यातून स्पष्ट होणार असल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. (प्रतिनिधी)