शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

मिनी मंत्रालयासाठी आजपासून रणसंग्राम

By admin | Updated: February 1, 2017 00:33 IST

जिल्हा परिषद निवडणूक : यंदा पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेव्दारे अर्ज, प्रशासनाकडून निवडणुकीची युध्दपातळीवर तयारी सुरू

रत्नागिरी : मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उद्यापासून (बुधवार) अर्ज दाखल करण्यास सुरूवात होणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या रणसंग्रामाला सुरूवात होणार आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी यावर्षी पहिल्यांदाच आॅनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज भरावे लागणार आहेत.जिल्हा परिषद निवडणुकीचे बिगूल वाजल्याने आता जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रांत कार्यालयाच्या ठिकाणी प्रांताधिकारी, तर अन्य तालुक्यांमध्ये तहसीलदार यांची सहायक निवडणूक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या वर्षीपासून उमेदवारांना निवडणुकीसाठी आॅनलाईन अर्ज भरणे राज्य निवडणूक आयोगाकडून अनिवार्य करण्यात आले. त्यामुळे आता सर्वच निवडणुकांसाठी उभ्या राहणाऱ्या उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागत आहेत. जिल्हा परिषदेची २०१२ सालानंतर आता पाच वर्षांनंतर यावर्षी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. त्यामुळे आता या निवडणुकांसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. बुधवार, १ फेब्रुवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. १ ते ६ फेब्रुवारी या कालावधीत इच्छुकांना सकाळी ११ ते २ या वेळेत आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सादर करावी लागणार आहे. ज्या ठिकाणी उपविभागीय कार्यालये आहेत, त्या ठिकाणी तेथील उपविभागीय अधिकारी अर्ज स्वीकारणार आहेत, अन्य ठिकाणी तहसीलदार अर्ज स्वीकारणार आहेत. ७ रोजी अर्जांची छाननी होणार आहे. बुधवारी आॅनलाईन अर्ज भरण्याचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसाचा मुहूर्त कोण कोण साधणार, याबाबत उत्सुकता आहे. (प्रतिनिधी)