शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

बेदखलांसाठी आज आयुक्त जिल्ह्यात

By admin | Updated: June 9, 2015 01:00 IST

कुळांच्या समस्यांकडे लक्ष : समितीचा आजपासून दोन दिवसीय दौरा

रत्नागिरी : कोकणातील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करुन शासनाला शिफारस करण्याकरिता कोकण विभागीय आयुक्त राधेश्याम मोपेलवार यांची समिती उद्या, मंगळवारपासून दोन दिवस जिल्हा दौरा करणार आहे. विशेषत: यावेळी जमिनीला कूळ लावणे (७० ब) या दाव्यांमध्ये येणाऱ्या अडचणी ते जाणून घेणार आहेत. कूळ कायद्याअंतर्गत विविध कलमांखाली कूळ वहिवाट शाखेकडे दाखल झालेल्या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब), दिवाणी कोर्टाकडून तहसीलदारांकडे आलेले संदर्भ (८५ अ), कूळकायद्याच्या भंग झालेल्या प्रकरणान्वये सरकारजमा करण्यासंदर्भातील कारवाई (८४ क), घरभाट विक्री प्रकरण (१७ ब), कूळ हक्काने मिळालेल्या जमिनीची खरेदी किंमत निश्चित करणे (३२ ते ३२ र) या प्रमुख पाच प्रकारच्या दाव्यांचा समावेश होतो. या दाव्यांमध्ये जमिनीला कूळ लावणे (७० ब) चे दावे अतिशय क्लीष्ट ठरत आहेत. या दाव्यांमध्ये तहसील न्यायालय हे बेसीक न्यायालय असते. हे दावे लढण्यासाठी कुळांना वकील करण्यासाठी खर्च लागतो. तसेच कुळांना आपण कसत असलेल्या जमिनीची मालकी सिद्ध करण्यासाठी खंडाची पावती द्यावी लागते. मात्र, जमीनमालक पावती देत नसल्याने दावा दाखल होताना अडचणी येतात. तसेच या दाव्यांमध्ये असलेली साक्षीदारांची संख्या, वारसतपास, अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदल्या तसेच अन्य तांत्रिक अडचणी यामुळे हे दावे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. यामुळे कूळ म्हणून नाव लागण्यासाठी वर्षानुवर्षे प्रतीक्षा करावी लागते.या अनुषंगाने कोकण आयुक्त मोपेलवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली समिती या दौऱ्यादरम्यान रत्नागिरी व सिंंधुदुर्र्ग जिल्ह्यांतील बेदखल कुळांच्या प्रश्नांचा सर्वंकष अभ्यास करणार आहे. त्यांच्यासमवेत विश्वनाथ रामचंद्र पाटील, विक्रमगड, (जि. पालघर), गोपीनाथ झेपले, (देवरुख), दौलतराव पोस्टुरे, (मंडणगड), राजाभाऊ कातकर (रामपूर - चिपळूण), सुजित झिमण, (रत्नागिरी), सुरेश खापले, (वहाळ - चिपळूण) हे सदस्य आहेत.दौऱ्याच्या वेळी समिती निवेदने, सूचना स्वीकारणार आहे. सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, बेदखल कुळे, सामाजिक संघटना यांनी आपली लेखी स्वरुपातील निवेदने, सूचना समितीला सादर कराव्यात. या गावभेटीच्या वेळी निवेदन देणे शक्य न झाल्यास विभागीय आयुक्त, कोकण विभाग, कोकण भवन, महसूल शाखा पहिला मजला, सी. बी. डी. बेलापूर, नवी मुंबई ४००६१४ या पत्त्यावर १५ जून २०१५ पर्यंत पाठवावीत, असे आवाहन कोकण विभाग उप आयुक्त (महसूल) यांनी केले आहे. (प्रतिनिधी)समितीचा सविस्तर दौरामंगळवार, ९ रोजी सकाळी ११ वाजता खेडशी, दुपारी ३.३० वाजता कोळंबे (ता. रत्नागिरी). बुधवार, १० रोजी सकाळी ११ वाजता कोसंबी, (ता. चिपळूण), दुपारी ३.३० वाजता मौजे असगोली (ता. गुहागर).