शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

शेती अवजारांचे थकीत अनुदान जमा

By admin | Updated: February 23, 2016 00:36 IST

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाला न्याय

रत्नागिरी : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे तब्बल दोन वर्षांपासून थकीत राहिलेले शेती अवजार खरेदीतील ११ लाख ६३ हजार रूपयांचे अनुदान आमदार राजन साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत जिल्ह्यातील ६३ शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदान तत्वावर पॉवर टीलर व पॉवर स्प्रेअर मिळण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर केले होते. संबंधित प्रस्तावांना कृषी विभागाकडून दि. ३ मार्च २०१४ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर बँकांकडून कर्ज काढून शासन नियुक्त दुकानातूनच शेती अवजारे खरेदी करावीत, या कृषी विभागाच्या अटीनुसार संबंधित शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केली. शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यात कृषी विभागाकडून अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांना स्वत: या अवजारे खरेदीचे हफ्ते भरावे लागत होते. याबाबत तालुका व जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, ८ ते १० दिवसांत खात्यात अनुदान जमा होईल, असे सांगण्यात येत होते. सातत्याने कृषी कार्यालयात संपर्क साधून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अखेर जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला. परंतु, यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे अनुदान जमा न झाल्याचे अर्ज दिले. यावर संबंधित कार्यालयाने अनुदानाची रक्कम रत्नागिरी येथे वर्ग केल्याचे स्पष्टीकरण दिले. शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयाच्या उत्तराचा संदर्भ घेऊन पुन्हा जिल्हा कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, शेतकऱ्यांनी बँकांमधून चौकशी केली असता ६३ पैकी फक्त २० शेतकऱ्यांंच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे व उर्वरीत ४३ शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता दोन्ही कार्यालयांनी पुन्हा उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर तब्बल दोन वर्षे कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या शेतकऱ्यांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन माहिती दिली. आमदार साळवी यांनी कृषी कार्यालयाकडे पाठपुरावा केल्याने उर्वरीत ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतीच ११ लाख ६३ हजार ४६७ रुपये अनुदानाची रक्कम जमा झाली. (प्रतिनिधी) ४११ लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान. ४कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे दोन वर्षांपासून अनुदान थकीत. ४शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा.