शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यांचे मानधन थकीत

By admin | Updated: September 11, 2016 23:19 IST

विनामोबदला काम : प्रकल्पाची मुदत संपली तरीही परिचालक उपाशीच

रत्नागिरी : ग्रामपंचायतींमध्ये संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र (संग्राम) प्रकल्प १३व्या वित्त आयोगातून राबवण्यात येत होता. या प्रकल्पाची मुदत ३१ डिसेंबर २०१५ रोजी संपली असून, त्याचा पुढील टप्पा ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने राबवण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा नियम ४७ अन्वये विभानसभेत निर्णय झाला. मात्र, काम करणाऱ्या संगणक परिचालकांचे माहे डिसेंबरपासून अद्याप मानधन काढण्यात आलेले नाही. नऊ महिन्यांपासून शासन विनामोबदला काम करून घेत असल्याने ऐन महागाईत संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मानधनाशिवाय कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांबाबत अध्यादेश काढण्यात येईल, असे आश्वासन देऊनसुध्दा शासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यामुळे राज्यातील संगणक परिचालकांनी २५ जुलै रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन केले होते. राज्यभरातील २७ हजार संगणक परिचालक आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनानंतर माजी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यासमवेत संगणक परिचालकांच्या शिष्टमंडळाच्या झालेल्या बैठकीत संग्राम प्रकल्पाचा पुढील टप्पा राज्य शासनाचा ग्रामविकास विभाग, माहिती तंत्रज्ञान संचालनालय व केंद्र शासनाच्या उपक्रम (सीएसस्सी - सीपीव्ही ई गव्हनर्स सर्व्हिस इंडिया लिमिटेड) यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार असल्याचे सांगितले. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ या नावाने उपक्रम राबवण्यात येणार असून, या केंद्रासाठी एक चालक नियुक्त करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींना या केंद्राद्वारे मिळणाऱ्या जीटूजी व जीटीसी सेवांसाठी शासनाकडून आपले सरकार सेवा केंद्र चालकांसाठी किमान ६ हजार रुपये मोबदला निश्चित करण्यात आला असल्याचे सांगून संबंधित केंद्रांनी स्वयंपूर्ण व्हावे व ‘आपले सरकार सेवा केंद्रचालकांना’ आणखी लाभ मिळावा, यासाठी सीएस्सी, सीपीव्हीला केंद्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ग्रामस्थांना इतर सेवा सुविधा देता येणार असल्याचे सांगितले होते. या केंद्राबाबत कामाचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी करून अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावयाचे आहेत. मात्र, अद्याप काही ग्रामपंचायतींनी अहवाल पाठवलेले नाहीत. संग्राम एक प्रकल्पांतर्गत राज्य शासनाबरोबरचा कंपनीचा करार डिसेंबरमध्ये संपुष्टात आला, तरी तत्कालिन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी काम सुरू ठेवण्याच्या तोंंडी सूचना दिल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही संग्राम प्रकल्प - २’ लवकरच कार्यान्वित होणार असून, संगणक परिचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले होते. केवळ आश्वासनांची खैरात सुरू होती. २४ जूनपर्यंत अध्यादेश न काढल्याने संगणक परिचालकांनी २५ जुलै रोजी आंदोलन छेडले होते. ग्रामपंचायतीच्या संगणक प्रणाली देखरेखीसाठी संग्राम एक अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला एक हजार ३०० रुपये एवढी अ‍ॅडमिन कॉस्ट जिल्हा परिषदेकडून महाआॅनलाईन कंपनीकडे वर्ग करण्यात येत असे. १३व्या वित्त आयोगातून ही रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात येत होती. जिल्हा परिषदेने डिसेंबरमध्ये महाआॅनलाईन कंपनीला रक्कम देऊनही संगणक परिचालकांचे मानधन थकवण्यात आले. जिल्ह्यात ६६६ संगणक परिचालक नियुक्त केले आहेत. (प्रतिनिधी) उपासमारीची वेळ : आंदोलने अजूनही बेदखलच करार संपला तरी संगणक परिचालकांना काम सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. शिवाय मानधनही काढण्याचे आश्वासन देण्यात आले होते. जानेवारीपासून अद्याप विनामानधन काम सुरू आहे. महागाईने रौद्ररूप धारण केले असताना मानधनाशिवाय किती दिवस काम करावे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. वेळोवेळी आंदोलने करून, निवेदने देऊनही प्रशासन कोणताही निर्णय घेत नाही. नऊ महिने मानधनाशिवाय काम करणाऱ्या संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.