शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

टायर फुटला, कार नदीत कोसळून तिघांचा मृत्यू; सात तासांनी मृतदेह बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2018 05:54 IST

इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला.

देवरूख/आरवली (जि. रत्नागिरी) : इनोव्हा कारचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली आणि अकरा वर्षाच्या एका मुलासह त्याची आई आणि आजी यांचा बुडून मृत्यू झाला. मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील धामणी येथे ही दुर्घटना बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. तब्बल सात तासांनी कार पाण्यातून बाहेर काढण्यात आली. अपघात होतानाच कारमधून उडी मारणारा चालक बचावला आहे. ऋतुजा शैलेश पाटणे (वय ३४, रा. पनवेल), पियुष शैलेश पाटणे (११) आणि प्रमिला पद्माकर बेर्डे (५८, रा. चिपळूण) अशी मृतांची नावे आहेत.संगमेश्वर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, लांजा तालुक्यातील केळंबे येथे बारशाला गेलेले पाटणे कुटुंबीय आज बुधवारी सकाळी इनोव्हा कारमधून पनवेलच्या दिशेने परतत होते. नितीन लक्ष्मण वाघमारे (रा. नवी मुंबई, मूळ गाव सातारा) गाडी चालवत होता. धामणी येथे गाडीचा एक टायर अचानक फुटला. त्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि त्याच वेगात कार महामार्गाच्या बाजूने वाहणाऱ्या आसावी नदीतील महाडिकांचे बांधन येथे जाऊन कोसळली. गाडी बडत असल्याचे लक्षात येताच चालक वाघमारे यांनी दरवाजा उघडून उडी घेतली. त्याने आपल्यासोबतच आपल्या कडेला बसलेल्या पियुषला ओढून आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. तब्बल ७ तासांनंतर इनोव्हा कार अपघातस्थळापासून ५० फूट अंतरावरच सापडली. साडेसहा वाजता इनोव्हा बाहेर काढण्यात यश आले. पियुष, त्याची आई ऋतुजा आणि पियुषची आजी प्रमिला हे तिघेही गाडीतच होते आणि त्यांचा मृत्यू झाला होता.