शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
4
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
5
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
6
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
7
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
8
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
9
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
10
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
11
मतदान केंद्र निश्चितीचे निवडणूक आयोगाचे आदेश; राजकीय पक्षांच्या बैठका घेण्याचीही अधिकाऱ्यांना सूचना
12
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
13
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
14
उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची पदे भरण्यास सर्वोच्च न्यायालय प्रयत्नशील : सरन्यायाधीश गवई
15
कांदळवनांचा अडथळा; पुनर्विचार याचिका करणार, वनमंत्री गणेश नाईक यांची माहिती; सर्वेक्षणातून समजणार अचूक क्षेत्रफळ
16
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
17
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
18
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
19
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...

‘त्या’ कामगारांवर उपासमारीची वेळ

By admin | Updated: January 2, 2015 00:08 IST

स्वच्छ भारत अभियान : ३० कामगारांना ३ महिने पगार नाही

चिपळूण : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत चिपळूण नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेमध्ये ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या ३० कामगारांना ३ महिने होऊनही पगार न मिळाल्याने या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिल्यानंतर चिपळूण नगर परिषदेतर्फे आॅक्टोबर महिन्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विविध ठिकाणचा कचरा या अभियानाअंतर्गत उचलण्यात आला. या कामासाठी ठेकेदारी पद्धतीने ३० कामगार २५ दिवसांसाठी घेण्यात आले होते. डिसेंबर महिना संपून जानेवारी आला तरी या कामगारांना अद्याप पगार न मिळाल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. यासंदर्भात संबंधित कामगारांनी मुख्याधिकारी प्रकाश पाटील यांच्याकडे निवेदन सादर केले आहे. स्वच्छता अभियान राबवून या ३० कामगारांना केलेल्या कामाचा पगार मिळण्यासंदर्भात ठेकेदाराकडून चालढकल केली जात असल्याबद्दल नाराजीचा सूर आहे. ठेकेदारी पद्धतीने काम करणाऱ्या या कामगारांना नवीन वर्षात पगार मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (वार्ताहर)