शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

ओणीतील ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

शौकत हाजू : साथीचे आजार पसरण्याची भीती

राजापूर : तालुक्यातील ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे भर पावसाळ्यात ओणी तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आरोप ओणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शौकत हाजू यांनी केला आहे. नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसात जर का ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांना घेराओ घालण्याचा इशारा हाजू यांनी दिला आहे.ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळेच आज नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. जलस्वराज्य योजनेसह पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही हाजू यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही हाजू यांनी केली आहे. याबाबत सोमवारी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ओणी - तोरणभाटी परिसरात गेले चार ते पाच दिवस दूषित गढूळ गाळ आणि घाण मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागासाठी असणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगतच असलेल्या पऱ्याचे पाणी या विहिरीत आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने नुकतेच खोदकाम करून विहिरीतील पाणी वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यात विहिरीतील पाणी शुध्दीकरण फिल्टरची नासधूस झाली. तर खोदकामामुळे या ओहोळातील दूषित पाणी थेट विहिरीत जात आहे. त्या पाण्याचा या परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हेच दूषित पाणी प्यावे लागत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे हाजू यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी सोमवारी आपण गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली, दूषित पाण्याचे नमुनेही सादर केले. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. पुढील दोन दिवसात ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही, तर हेच दूषित पाणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)ओणी नळपाणी पुरवठा योजनेद्वारे ओणी-तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना केला जात असलेल्या पाणीपुरवठ्याचे पाणी दूषित आहे, हे खरे आहे. याप्रकरणी ओणी ग्रामसेवकांना तत्काळ बोलावून या पाणी शुध्दीकरणाबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, पुढील दोन दिवस ग्रामस्थांनी पाणी पिऊ नये, असे फलक लावावेत व तत्काळ घरोघरी मेडीक्लोअरचे वाटप करावे, असे आदेश दिले आहेत.- जयेंद्र जाधव, गटविकास अधिकारी