शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

ओणीतील ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

शौकत हाजू : साथीचे आजार पसरण्याची भीती

राजापूर : तालुक्यातील ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे भर पावसाळ्यात ओणी तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आरोप ओणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शौकत हाजू यांनी केला आहे. नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसात जर का ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांना घेराओ घालण्याचा इशारा हाजू यांनी दिला आहे.ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळेच आज नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. जलस्वराज्य योजनेसह पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही हाजू यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही हाजू यांनी केली आहे. याबाबत सोमवारी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ओणी - तोरणभाटी परिसरात गेले चार ते पाच दिवस दूषित गढूळ गाळ आणि घाण मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागासाठी असणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगतच असलेल्या पऱ्याचे पाणी या विहिरीत आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने नुकतेच खोदकाम करून विहिरीतील पाणी वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यात विहिरीतील पाणी शुध्दीकरण फिल्टरची नासधूस झाली. तर खोदकामामुळे या ओहोळातील दूषित पाणी थेट विहिरीत जात आहे. त्या पाण्याचा या परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हेच दूषित पाणी प्यावे लागत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे हाजू यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी सोमवारी आपण गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली, दूषित पाण्याचे नमुनेही सादर केले. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. पुढील दोन दिवसात ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही, तर हेच दूषित पाणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)ओणी नळपाणी पुरवठा योजनेद्वारे ओणी-तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना केला जात असलेल्या पाणीपुरवठ्याचे पाणी दूषित आहे, हे खरे आहे. याप्रकरणी ओणी ग्रामसेवकांना तत्काळ बोलावून या पाणी शुध्दीकरणाबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, पुढील दोन दिवस ग्रामस्थांनी पाणी पिऊ नये, असे फलक लावावेत व तत्काळ घरोघरी मेडीक्लोअरचे वाटप करावे, असे आदेश दिले आहेत.- जयेंद्र जाधव, गटविकास अधिकारी