शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
2
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
3
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
4
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
5
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
6
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
7
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
8
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
9
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
10
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
11
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
12
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
13
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
14
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
15
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
16
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
17
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
18
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
19
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
20
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'

ओणीतील ग्रामस्थांवर दूषित पाणी पिण्याची वेळ

By admin | Updated: June 17, 2015 00:38 IST

शौकत हाजू : साथीचे आजार पसरण्याची भीती

राजापूर : तालुक्यातील ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि अनागोंदी कारभारामुळे व प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे भर पावसाळ्यात ओणी तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना दूषित पाणी प्यावे लागत असल्याचा आरोप ओणी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य शौकत हाजू यांनी केला आहे. नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पुरविण्यात येणाऱ्या या दूषित पाण्यामुळे या परिसरात साथीचे आजार पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पुढील दोन दिवसात जर का ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाने कार्यवाही केली नाही तर थेट जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, रत्नागिरी यांना घेराओ घालण्याचा इशारा हाजू यांनी दिला आहे.ओणी ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळेच आज नळपाणीपुरवठा योजनेचा बोजवारा उडाला आहे. जलस्वराज्य योजनेसह पाणलोट कार्यक्रमांतर्गत बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही हाजू यांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी, अशी मागणीही हाजू यांनी केली आहे. याबाबत सोमवारी त्यांनी पत्रकारांना माहिती दिली.ओणी - तोरणभाटी परिसरात गेले चार ते पाच दिवस दूषित गढूळ गाळ आणि घाण मिश्रीत पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागासाठी असणाऱ्या नळपाणीपुरवठा योजनेच्या विहिरीलगतच असलेल्या पऱ्याचे पाणी या विहिरीत आले आहे. या ठिकाणी ग्रामपंचायतीने नुकतेच खोदकाम करून विहिरीतील पाणी वाढण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, यात विहिरीतील पाणी शुध्दीकरण फिल्टरची नासधूस झाली. तर खोदकामामुळे या ओहोळातील दूषित पाणी थेट विहिरीत जात आहे. त्या पाण्याचा या परिसरातील ग्रामस्थांना पुरवठा केला जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांना हेच दूषित पाणी प्यावे लागत असून, ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचे हाजू यांनी नमूद केले आहे.या प्रकरणी सोमवारी आपण गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना वस्तुस्थितीची माहिती दिली, दूषित पाण्याचे नमुनेही सादर केले. मात्र, त्यांच्याकडून कोणतेही ठोस उत्तर देण्यात आलेले नाही. पुढील दोन दिवसात ग्रामस्थांना शुध्द पाणीपुरवठा करण्याबाबत प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही, तर हेच दूषित पाणी घेऊन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराओ घालण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)ओणी नळपाणी पुरवठा योजनेद्वारे ओणी-तोरणभाटी परिसरातील ग्रामस्थांना केला जात असलेल्या पाणीपुरवठ्याचे पाणी दूषित आहे, हे खरे आहे. याप्रकरणी ओणी ग्रामसेवकांना तत्काळ बोलावून या पाणी शुध्दीकरणाबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी, पुढील दोन दिवस ग्रामस्थांनी पाणी पिऊ नये, असे फलक लावावेत व तत्काळ घरोघरी मेडीक्लोअरचे वाटप करावे, असे आदेश दिले आहेत.- जयेंद्र जाधव, गटविकास अधिकारी