शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
2
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
3
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
4
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
5
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
6
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
7
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
8
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
9
"आम्हाला तोंड उघडायला लावू नका..."; सुप्रीम कोर्ट ईडीवर संतापले; काय आहे प्रकरण?
10
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती
11
भारत-पाक मॅच रद्द; आफ्रिदीसोबत गप्पा मारताना दिसल्यामुळे अजय देवगण ट्रोल, जाणून घ्या त्यामागचं सत्य
12
अंबानींच्या आवडत्या कंपनीचा शेअर आपटला; पण, 'या' स्टॉक्समुळे सेन्सेक्स-निफ्टीची दमदार वाढ
13
उल्हासनगर: आधी विनयभंग, तुरुंगातून बाहेर येताच पीडित मुलीच्या घरासमोर बँडबाजा व फटाक्याची आतिषबाजी
14
शेअर असावा तर असा! सलग २४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट; किंमत ₹५० पेक्षा कमी, गुंतवणूकदार मालामाल
15
झोपेत असताना तो तिच्यावर लैंगिक अत्याचार करायचा, नंतर लाथा मारायचा; माजी महिला खासदाराने केले गंभीर आरोप
16
Kamika Ekadashi 2025:आपण जन्म मरणाच्या फेऱ्यात का अडकतो? 'हे' सांगणारे चित्र!
17
हवाई दलाचे विमान महाविद्यालयावर कोसळले; अनेकांच्या मृत्यूचा संशय, बांग्लादेशातील घटना
18
Solapur Crime: घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले
19
"विश्वासघात वेदनादायक होता पण..." नवऱ्याच्या व्हायरल व्हिडीओवर अँडी बायरनच्या पत्नीची पहिली प्रतिक्रिया?
20
७ कोटी मुलांसाठी गुड न्यूज; आता शाळेतच होणार आधारशी निगडीत 'हे' काम, UIDAI ची विशेष सुविधा

बिलासाठी नदी पार करण्याची वेळ

By admin | Updated: March 31, 2016 00:02 IST

रत्नागिरी-सातारा सीमा : अनेक गावे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित

श्रीकांत चाळके -- खेड -रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील १३ गावे अद्याप अविकसित आहेत. या खोऱ्यातील दुर्गम भागात वसलेल्या चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यानंतर आजही हा भाग अविकसित आहे. एवढंच नाही तर वीजबिल भरायचे असेल, तरीही कोयना नदी पार करावी लागते, ही येथील ग्रामस्थांची मुख्य समस्या आहे.दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या कांदाटी खोऱ्यात चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे वसलेली आहेत. यापैकी शिंदी व उचाट येथे पोस्ट कार्यालय आहे. मात्र, तेथे वीजबिल भरण्याची सोय नाही. यामुळे येथील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे जावे लागते. तेथे जाताना ग्रामस्थांना कोयना धरणाचे बॅकवॉटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसागर जलाशयातील जलमार्गाचा वापर करावा लागतो.येथील वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंगदेखील वेळेवर होत नसल्याने वीजबिलेही उशिरा म्हणजेच मुदत संपल्यानंतर मिळतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांना जादा भुर्दंड सोसावा लागतो. खेड तालुक्यातील चकदेव येथील वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग सहा महिन्यांतून एकदा घेतले जाते. ते किमान महिन्यातून एकदा घ्यावे, अशी येथील ग्राहकांची मागणी आहे. तसेच चकदेवला जाणारी महावितरणची मुख्य वाहिनी व लोखंडी पोल पूर्ण गंजलेल्या अवस्थेत आहेत. ते धोकादायक असून, कधीही खाली पडू शकतात.़ यामुळे पावसाळ्यापूर्वी हे गंजलेले पोल बदलणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वीज गेल्यानंतर येथील ग्रामस्थांना ७ ते ८ दिवस अंधारात राहावे लागते.या ठिकाणी येणारा रस्ता कच्चा असल्यामुळे एस. टी. बस बिघडली तर दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. या परिसरात भ्रमणध्वनी जवळपास बंदच असतो. संपर्क साधण्यासाठी याशिवाय इतर मार्गही नाही. तरीही दूरध्वनीवर इथल्या जनतेला अवलंबून राहावे लागते. काही वेळेला दूरध्वनीही क्वचितच लागतो. निसर्गदत्त देणगी लाभलेला परिसर असला तरी विकासापासून वंचित आहे. या परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी परिसरातील शिंदी व उचाट येथे किंवा मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच वाघावळे येथील पोस्टामध्ये वीजबिल भरणा केंद्र सुरू केल्यास ग्राहकांची गैरसोय दूर होईल. परिसरातील जंगलात काही ठिकाणी स्वयंभू महादेवाची जागृत स्थाने आहेत. तेथे ये-जा करण्यासाठी कोणताही मार्ग नाही.रघुवीर घाटातून येथे जाण्यासाठी ३ तास अंतर पार करून जावे लागते, तोही डोंगरातून! पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या या स्थानांचा विकास न झाल्याने भाविकांपर्यंत या स्थानांची माहिती पोहोचू शकली नाही. अर्थातच याचा मोठा परिणाम येथील सर्वच व्यवहारावर होत आहे. शासनाने या परिसराकडील अविकसित सुविधांकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी यापूर्वी सातत्याने केली आहे. मात्र, या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. असुविधांनी ग्रस्त असलेल्या या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे.गैरसोयी : शंभर रुपयांच्या बिलाला दुप्पट खर्चमार्च महिन्यापासून कोयनेचे पाणी आटत असल्यामुळे तापोळा येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. महावितरणचे १०० रूपयांचे बिल भरण्यासाठी दुप्पट गाडी खर्च करून तापोळा येथे जावे लागते. यामुळे येथील ग्रामस्थांच्या वेळेसह पैशांचाही अपव्यय होत आहे. तापोळा येथे जाऊन येण्यासाठी एक दिवस लागतो.परिसराकडे आजही दुर्लक्षयेथील सर्वच गैरसोेयी आणि असुविधांबाबत येथील ग्रामस्थांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र, आजही या परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे.