शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

बिलासाठी नदी पार करण्याची वेळ

By admin | Updated: March 31, 2016 00:02 IST

रत्नागिरी-सातारा सीमा : अनेक गावे अजूनही मूलभूत सुविधांपासून वंचित

श्रीकांत चाळके -- खेड -रत्नागिरी व सातारा जिल्ह्याच्या सीमेवरील १३ गावे अद्याप अविकसित आहेत. या खोऱ्यातील दुर्गम भागात वसलेल्या चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. स्वातंत्र्यानंतर आजही हा भाग अविकसित आहे. एवढंच नाही तर वीजबिल भरायचे असेल, तरीही कोयना नदी पार करावी लागते, ही येथील ग्रामस्थांची मुख्य समस्या आहे.दोन्ही जिल्ह्यांच्या सीमेवर सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये वसलेल्या कांदाटी खोऱ्यात चकदेव, शिंदी, वळवण, मोरणी, आरव, महाळुंगे, कांदाट सालोशी, उचाट, वाघवळे, लामज, निवळी, आकल्पे आदी गावे वसलेली आहेत. यापैकी शिंदी व उचाट येथे पोस्ट कार्यालय आहे. मात्र, तेथे वीजबिल भरण्याची सोय नाही. यामुळे येथील ग्राहकांना वीजबिल भरणा करण्यासाठी सातारा जिल्ह्यातील तापोळा येथे जावे लागते. तेथे जाताना ग्रामस्थांना कोयना धरणाचे बॅकवॉटर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसागर जलाशयातील जलमार्गाचा वापर करावा लागतो.येथील वीज ग्राहकांच्या मीटरचे रिडिंगदेखील वेळेवर होत नसल्याने वीजबिलेही उशिरा म्हणजेच मुदत संपल्यानंतर मिळतात. त्यामुळे येथील ग्रामस्थांना जादा भुर्दंड सोसावा लागतो. खेड तालुक्यातील चकदेव येथील वीज ग्राहकांचे मीटर रिडिंग सहा महिन्यांतून एकदा घेतले जाते. ते किमान महिन्यातून एकदा घ्यावे, अशी येथील ग्राहकांची मागणी आहे. तसेच चकदेवला जाणारी महावितरणची मुख्य वाहिनी व लोखंडी पोल पूर्ण गंजलेल्या अवस्थेत आहेत. ते धोकादायक असून, कधीही खाली पडू शकतात.़ यामुळे पावसाळ्यापूर्वी हे गंजलेले पोल बदलणे गरजेचे आहे. पावसाळ्यात वीज गेल्यानंतर येथील ग्रामस्थांना ७ ते ८ दिवस अंधारात राहावे लागते.या ठिकाणी येणारा रस्ता कच्चा असल्यामुळे एस. टी. बस बिघडली तर दुसरी बस येईपर्यंत ताटकळत बसावे लागते. या परिसरात भ्रमणध्वनी जवळपास बंदच असतो. संपर्क साधण्यासाठी याशिवाय इतर मार्गही नाही. तरीही दूरध्वनीवर इथल्या जनतेला अवलंबून राहावे लागते. काही वेळेला दूरध्वनीही क्वचितच लागतो. निसर्गदत्त देणगी लाभलेला परिसर असला तरी विकासापासून वंचित आहे. या परिसरातील ग्रामस्थांच्या सोयीसाठी परिसरातील शिंदी व उचाट येथे किंवा मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच वाघावळे येथील पोस्टामध्ये वीजबिल भरणा केंद्र सुरू केल्यास ग्राहकांची गैरसोय दूर होईल. परिसरातील जंगलात काही ठिकाणी स्वयंभू महादेवाची जागृत स्थाने आहेत. तेथे ये-जा करण्यासाठी कोणताही मार्ग नाही.रघुवीर घाटातून येथे जाण्यासाठी ३ तास अंतर पार करून जावे लागते, तोही डोंगरातून! पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या या स्थानांचा विकास न झाल्याने भाविकांपर्यंत या स्थानांची माहिती पोहोचू शकली नाही. अर्थातच याचा मोठा परिणाम येथील सर्वच व्यवहारावर होत आहे. शासनाने या परिसराकडील अविकसित सुविधांकडे वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी येथील ग्रामस्थांनी यापूर्वी सातत्याने केली आहे. मात्र, या मागण्यांकडे वारंवार दुर्लक्ष करण्यात आले. असुविधांनी ग्रस्त असलेल्या या गावांना मूलभूत सुविधा पुरविणे आवश्यक आहे.गैरसोयी : शंभर रुपयांच्या बिलाला दुप्पट खर्चमार्च महिन्यापासून कोयनेचे पाणी आटत असल्यामुळे तापोळा येथे जाण्यासाठी ग्रामस्थांना मैलोनमैल पायपीट करावी लागते. महावितरणचे १०० रूपयांचे बिल भरण्यासाठी दुप्पट गाडी खर्च करून तापोळा येथे जावे लागते. यामुळे येथील ग्रामस्थांच्या वेळेसह पैशांचाही अपव्यय होत आहे. तापोळा येथे जाऊन येण्यासाठी एक दिवस लागतो.परिसराकडे आजही दुर्लक्षयेथील सर्वच गैरसोेयी आणि असुविधांबाबत येथील ग्रामस्थांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मात्र, आजही या परिसराकडे दुर्लक्ष झाल्याचे पाहावयास मिळत आहे.