शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

हीच वेळ आहे शहाणे होण्याची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

वृक्षतोडीचे दुष्परिणाम आधीच सह्याद्रीचा पट्टा हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. वारंवार होणाऱ्या छोट्या-मोठ्या भूकंपांमुळे त्याचप्रमाणे डोंगर भागात होणाऱ्या खोदकामामुळे डोंगराला ...

वृक्षतोडीचे दुष्परिणाम

आधीच सह्याद्रीचा पट्टा हा भूकंपप्रवण क्षेत्रात येतो. वारंवार होणाऱ्या छोट्या-मोठ्या भूकंपांमुळे त्याचप्रमाणे डोंगर भागात होणाऱ्या खोदकामामुळे डोंगराला तडे जाण्याचे प्रकार सातत्याने होत राहतात. झाडे तोडल्यामुळे माती घट्ट धरुन ठेवण्याची व्यवस्थाच आपण काढून घेतली आहे. पावसाळ्यात या भेगांमधून पाणी झिरपत राहते आणि त्यामुळे दरडी कोसळतात.

नदीची पात्रे रुंदावतात

दरडी कोसळण्याचा प्रकार एखाद्याच भागात होतो. पण डोंगरावरचे छोटे दगड आणि माती पाण्यासाेबत वाहून येण्याचा प्रकार मात्र पावसाळ्यात रोजच सुरू असतो. असंख्य नद्यांचा उगम सह्याद्रीमध्ये आहे. त्यांच्या पाण्यासोबत वाहून आलेली ही दगड, माती गाळ म्हणून सखल भागात साचून राहते आणि त्यातून नदीचे पात्र रुंदावत जाते.

डाॅ. गाडगीळ यांनी मांडलेली भीती

काही वर्षांपूर्वी पश्चिम घाट हा विषय खूप चर्चेत होता. कस्तुरीरंजन आणि डाॅ. माधव गाडगीळ यांच्या समितीने पश्चिम घाटाची सद्यस्थिती, त्याबाबत आवश्यक असलेले उपाय या साऱ्याचा उहापोह केला आहे. मात्र, दुर्दैवाने हा अहवाल स्वीकारला गेला नाही. हा अहवाल देताना आणि त्यानंतर अनेक ठिकाणी त्याबाबतचे विवेचन करताना डाॅ. गाडगीळ यांनी काही बंधने पाळण्याचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. ही बंधने नसतील तर त्यातून विनाश होईल, अशी भीतीही त्यांनी मांडली होती. आता तसेच घडताना दिसत आहे.

निसर्गाने धक्के परत केले

कोकण रेल्वेचे काम करताना अनेक ठिकाणी डोंगर कापण्यात आले. त्याखेरीज रेल्वे कोकणात येणे शक्य नव्हते. पण त्यामुळे पाण्याच्या प्रवाहात बदल झाले. या खोदलेल्या डोंगरांवरुन दरडी कोसळल्या. १९९६ला कोकण रेल्वे रत्नागिरी जिल्ह्यापर्यंत आली. पण तेव्हापासून पुढची पाच वर्षे आणि त्यातही २००० साली कोकण रेल्वे ठप्प होण्याचा प्रकार अनेकदा झाला. निसर्गाला जो धक्का माणसाने दिला, तो निसर्गाने परत केला.

महामार्ग रुंदीकरणात डोंगर कापले

आता मुंबई - गोवा महामार्गाचे रुंदीकरण होतानाही अनेक ठिकाणी वळणांचा अवघडपणा कमी करण्यासाठी डोंगर कापण्यात आले आहेत. हजारो वर्षे स्थिर असलेले हे डोंगर कापण्यात आल्याने त्याचे पडसाद पुढे कधीतरी उमटणारच आहेत, याची भीती वाटते.

अर्जुना प्रकल्पाचे परिणाम

राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात अर्जुना नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणामुळे डोंगर कापण्यात आला. त्यामुळे साहजिकच अनेक बदल झाले. त्याचाच परिणाम म्हणून आजपर्यंत कधीही पूर न आलेल्या जामदा खोऱ्यातील मूर सुतारवाडी या भागातही पुराचे पाणी आले. निसर्गाच्या वर्षानुवर्षांच्या रचनेत केलेल्या बदलांचे परिणाम लगेच नाही, पण काही वर्षांनी तरी भोगावेच लागतात. अर्थात ते परिणाम भोगताना होणारे नुकसान खूप मोठे आहे. आता येथील प्रकल्पग्रस्तांचे डोंगरावर पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव आहे. पण त्यासाठी पुन्हा डोंगराला धक्के बसतील.

विकास करायचाच नाही का?

महामार्ग रुंदीकरण, कोकण रेल्वे किंवा धरण अशा लोकोपयोगी प्रकल्पांमुळे निसर्गाला धक्के बसतात. त्याचे परिणाम नंतर भोगावे लागतात. पण म्हणून कोणतेही प्रकल्प करायचेच नाहीत का, असा प्रश्न मनात येऊ शकतो. हा विकास व्हायलाच हवा. वाहतुकीचा प्रश्न सुटल्याने व्यवसाय वृद्धी होते. धरणांमुळे पाण्याची उपलब्धता होते. त्यामुळे ते प्रकल्प व्हायलाच हवेत. पण ते करताना निसर्गाच्या रचनेचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. पर्यावरण सांभाळून प्रकल्प करण्याची फक्त घोषणा होते. महामार्गालगतची हजारो झाडे तोडली गेली. यानंतर नवीन लागवड झाली का? कुठे झाली? त्याकडे लक्ष दिले जात आहे का? हे अनुत्तरीत प्रश्न आहेत.

लोकांचीही जबाबदारी

सगळं सरकारनं करावं, ही अपेक्षा आता बास करायला हवी. आपल्याला हवं तेव्हा आपण निसर्गाला ओरबाडणार आणि सरकार काही करत नाही म्हणून शंख करणार, हे बंद व्हायला हवे. नवीन वृक्ष लागवड न करणे, भराव टाकून घरे बांधणे यासारखे उद्योग तुम्ही-आम्हीच करतो. हेही थांबायला हवे. निसर्गाला गृहित धरले तर तो त्याची परतफेड करणारच आहे आणि ती आपल्याला कधीच परवडणारी नाही, हे आता चिपळूण, खेड, राजापूरच्या पुराने दाखवून दिले आहे.