शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

महाराष्ट्रात टोलमुक्ती हेच भाजपाचे धोरण

By admin | Updated: May 26, 2015 00:57 IST

अतुल काळसेकर : भूसंपादन कायद्याविषयी पुस्तिका प्रकाशित

कणकवली : चौपदरीकरणासंदर्भात केंद्रीय रस्ते व बंदर विकासमंत्री नितीन गडकरी यांनी आराखड्यात बदल करण्याचेही आश्वासन दिलेले आहे. महाराष्ट्रात टोलमुक्ती हेच भाजपाचे धोरण असल्याने टोलविषयी सिंधुदुर्गवासीयांनी निर्धास्त रहावे, असे भाजपाचे जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी येथील पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य राजू राऊळ, तालुकाध्यक्ष शिशीर परूळेकर, सायबर सेलचे प्रभाकर सावंत उपस्थित होते. काळसेकर यांच्या ‘सुधारित भूसंपादन विधेयक २०१५-वास्तव विपर्यास’ या पुस्तिकेचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले असून गावोगावी त्याचे वितरण सुरू करण्यात आले असल्याची माहिती काळसेकर यांनी दिली. सुधारित भूसंपादन कायद्यासंबंधी अपप्रचार केला जात आहे. शेतकऱ्यांच्या विरोधी हा कायदा असल्याची ओरड विरोधकांकडून करण्यात येत आहे. त्याला उत्तर देण्यासाठी ही पुस्तिका काढण्यात आली आहे. कोणत्याही ठिकाणी विकासासाठी जमिन आवश्यक असते. नेमका कोणत्या बाबींना विरोध होणार हे जाणून संपादन कायद्यात सुधारणा करण्यात आल्या आहेत. योग्य व भरपूर मोबदला आणि पुनर्वसन याला नव्या कायद्यात प्राधान्य देण्यात आले आहे. २०१३ च्या विधेयकात अनेक त्रुटी होत्या. मेट्रो, रेल्वे अ‍ॅक्ट मागील सरकारने वगळले होते. ते सर्व या विधेयकाच्या अधिकारक्षेत्रात आणले आहेत. सिंधुदुर्गात साधनसंपत्ती असूनही अनेक वर्षे कॉँग्रेसच्या चुकीच्या दृष्टीकोनामुळे विकास होऊ शकला नाही. कोणत्याही प्रकल्पाला प्राथमिक चर्चेपासून विरोध सुरू होतो याला अनेक कारणे आहेत. त्यावर नव्या विधेयकात तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यापूर्वी अल्प मोबदल्यात आपल्या जमिनी दिल्या. गुंतवणूकदारांच्या घशात त्या गेल्या. याला आता आळा बसणार आहे. पुस्तिकेच्या माध्यमातून सर्वसामान्यांना तरतूदी समजतील आणि विरोधकांकडून राजकारणातून होणारी दिशाभूल थांबेल, असे काळसेकर म्हणाले. नवा कायदा लोकसभेत पारीत झाला असून राज्यसभेत मांडणे बाकी आहे. आघाडी सरकारने २०१३ साली मांडलेल्या कायद्याला राष्ट्रहिताच्या दृष्टीकोनातून आम्ही पाठिंबा दिला होता. ते लक्षात घेऊन आताचे विरोधक आम्हाला राज्यसभेत पाठिंबा देतील, अशी आशा आहे. अन्यथा संयुक्त अधिवेशनाचा मार्ग खुला आहे. नव्या सुधारित भूसंपादन कायद्याप्रमाणे चौपदरीकरणाची प्रक्रिया व्हावी, अशी आमची मागणी आहे. (प्रतिनिधी)