शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
3
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
4
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
5
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
6
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
7
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
8
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
9
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
10
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
11
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
12
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
13
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
14
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
15
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
16
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
17
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
18
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
19
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
20
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश

लाॅकडाऊनबाबत गुरुवारी निर्णय : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी गुरुवारी सांगोपांग चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय हाेईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासनासोबत आयोजित ऑनलाइन बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हे लाॅकडाऊनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सोमवारपासून लाॅकडाऊन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतही वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत गुरुवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल आणि वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावाच लागेल. मात्र, यासाठी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व घटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावे लागेल, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.

सध्या कोविड परिस्थितीचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन होईलच असे नाही. मात्र, वेळ आली तर लाॅकडाऊन करावेच लागेल. आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. सर्व पक्षघटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

राज्याच्या स्वतंत्र ॲपची मागणी

जिल्ह्यात सर्वांना लसीकरण तेही मोफत केले जाणार आहे. साेमवारी २८,७०० लसीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोविशिल्डचे २० हजार डोस मिळाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या केंद्राचे ॲप नोंदणीसाठी वापरले जात असल्याने गाेंधळ होत आहे. त्यामुळे राज्याचे ॲप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

उपकेंद्र स्तरावर लसीकरण

सध्या लसीकरणासाठीची गर्दी लक्षात घेऊन उपकेंद्र स्तरावरही लसीकरण करता येइल, अशी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.