शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनबाबत गुरुवारी निर्णय : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब ...

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता सिंधुदुर्गप्रमाणेच रत्नागिरी जिल्ह्यातही लाॅकडाऊन करायचे का, याबाबत पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्याशी गुरुवारी सांगोपांग चर्चा झाल्यानंतरच अंतिम निर्णय हाेईल. त्यानंतरच निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी ऑनलाइन घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हा प्रशासनासोबत आयोजित ऑनलाइन बैठकीत झालेल्या चर्चेसंदर्भात सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली. राज्यातील २० पेक्षा अधिक जिल्हे लाॅकडाऊनमध्ये आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही सोमवारपासून लाॅकडाऊन सुरू करण्यात आले आहे. रत्नागिरीतही वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात येईल, याबाबत गुरुवारी पालकमंत्री ॲड. अनिल परब यांच्यासोबत गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सविस्तर चर्चा होईल आणि वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावाच लागेल. मात्र, यासाठी गुरुवारी होणाऱ्या बैठकीत सर्व घटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. मात्र, वेळ पडल्यास लाॅकडाऊन करावे लागेल, याचा पुनरुच्चार सामंत यांनी केला.

सध्या कोविड परिस्थितीचा विचार करून गुरुवारी होणाऱ्या बैठकीत लाॅकडाऊनबाबत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊन होईलच असे नाही. मात्र, वेळ आली तर लाॅकडाऊन करावेच लागेल. आजही कोरोना रुग्णांची संख्या वाढती आहे. त्यामुळे वेळ पडल्यास लाॅकडाऊनचा निर्णय घ्यावाच लागेल. यासाठी सर्वांच्या सहकार्याची गरज भासणार आहे. सर्व पक्षघटकांना विश्वासात घेऊनच हा निर्णय घेतला जाणार आहे. नागरिकांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन मंत्री सामंत यांनी यावेळी केले.

राज्याच्या स्वतंत्र ॲपची मागणी

जिल्ह्यात सर्वांना लसीकरण तेही मोफत केले जाणार आहे. साेमवारी २८,७०० लसीचे डोस जिल्ह्याला उपलब्ध झाले आहेत. लसीचा तुटवडा जाणवणार नाही, यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. कोविशिल्डचे २० हजार डोस मिळाले आहेत. १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींसाठी सध्या केंद्राचे ॲप नोंदणीसाठी वापरले जात असल्याने गाेंधळ होत आहे. त्यामुळे राज्याचे ॲप तयार करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली असल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.

उपकेंद्र स्तरावर लसीकरण

सध्या लसीकरणासाठीची गर्दी लक्षात घेऊन उपकेंद्र स्तरावरही लसीकरण करता येइल, अशी यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्याचेही सामंत यांनी सांगितले.