शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
2
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
3
मागे धगधगतं संसद भवन अन् पुढ्यात Gen-Z आनंदोलनकर्त्याचे ठुमके! नेपाळमधील Viral Video
4
नेपाळमध्ये निदर्शने, सत्तापालट सुरू असतानाच आता पाकिस्तानच्या या प्रांतात बंद, जनता संतापली
5
'सरकारचे कौतुक, पण धोका दिल्यास सोडणार नाही': मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा
6
भारताबाबत ट्रेड डीलवर ट्रम्प यांची एक पोस्ट आणि 'या' शेअर्समध्ये सुस्साट तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
भारत-नेपाळ सीमेवरून घुसखोरीचा प्रयत्न; नेपाळच्या तुरुंगातून पळालेल्या ५ कैद्यांचा अटक
8
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
9
सुलतानी संकटाचे बळी! एका महिन्यात १०१ शेतकऱ्यांची मृत्यूला मिठी; दोन जिल्ह्यांतच ६७ घटना
10
"सामान्य भक्तांना धक्काबुक्की, मारहाण हाच त्यांचा खरा चेहरा...", 'लालबागचा राजा' मंडळाला मराठी अभिनेत्रीच्या नवऱ्याने सुनावलं
11
संकष्ट चतुर्थी 2025: पितृपक्षातील संकष्टीला चंद्रोदय कधी? पहा गणेश पूजन विधी आणि शुभ मुहूर्त
12
अ‍ॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर...
13
सीबीआयपाठोपाठ आता ईडीचीही एन्ट्री! २,९२९ कोटी रुपयांच्या बँक फसवणुकीप्रकरणी अनिल अंबानींवर कारवाई
14
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
15
३ फ्लॅट, ५० लाखांचं सोनं... महिलेने १०० लोकांची केली ९ कोटींची फसवणूक, 'असा' घातला गंडा
16
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
17
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
18
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
19
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
20
कोळशावरील बेकऱ्यांना टाळेच! नोटिसा देण्यास सुरुवात; स्वच्छ इंधनच वापरावे लागणार

वन्यप्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाची तीन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा बचाव करण्यासाठी रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाची ३ बचाव पथके बचाव साहित्यासह २४ तास शहरात सज्ज आहेत. सध्या पुराचे पाणी ओसरल्याने चिपळूण शहरामध्ये किंवा आसपासच्या शहरात वन्य प्राणी आढळू लागले आहेत. या प्राण्यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाची ३ बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. असे प्राणी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा चिपळूण कार्यालयातील नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा, असेे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांचे फोन येताच वनविभागामार्फत संबंधित ठिकाणी तत्काळ मदत केली जात आहे. राजश्री किर वनक्षेत्रपाल चिपळूण ९४०४९०५८५, राजाराम शिंदे वनरक्षक कोळकेवाडी (९७६५७८७५७८), निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक चिपळूण (९५५२५९३८९८), दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर (८८८८९६७२८४) यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ वनविभागास संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

२५५ वन्यजीवांची सुटका...

वनविभाग चिपळूण मार्फत २०२० -२१ मध्ये २५५ वन्यजीवांची सुटका करुन त्यांना जीवदान दिले आहे. वनविभागाची पथके चिपळूण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन संकटात सापडलेले, मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत. २२ जुलैपासून आतापर्यंत ६ नाग, ३ घोणस, ४ अजगर, २ मण्यार, १ बिबट्या (राजापूरमधून) असे एकूण १६ वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.