शहरं
Join us  
Trending Stories
1
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
2
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
3
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
4
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
5
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
6
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
7
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
8
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
9
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
10
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
11
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
12
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
13
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
14
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
15
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
16
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
17
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
18
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
19
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
20
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक

वन्यप्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाची तीन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा बचाव करण्यासाठी रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाची ३ बचाव पथके बचाव साहित्यासह २४ तास शहरात सज्ज आहेत. सध्या पुराचे पाणी ओसरल्याने चिपळूण शहरामध्ये किंवा आसपासच्या शहरात वन्य प्राणी आढळू लागले आहेत. या प्राण्यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाची ३ बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. असे प्राणी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा चिपळूण कार्यालयातील नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा, असेे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांचे फोन येताच वनविभागामार्फत संबंधित ठिकाणी तत्काळ मदत केली जात आहे. राजश्री किर वनक्षेत्रपाल चिपळूण ९४०४९०५८५, राजाराम शिंदे वनरक्षक कोळकेवाडी (९७६५७८७५७८), निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक चिपळूण (९५५२५९३८९८), दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर (८८८८९६७२८४) यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ वनविभागास संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

२५५ वन्यजीवांची सुटका...

वनविभाग चिपळूण मार्फत २०२० -२१ मध्ये २५५ वन्यजीवांची सुटका करुन त्यांना जीवदान दिले आहे. वनविभागाची पथके चिपळूण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन संकटात सापडलेले, मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत. २२ जुलैपासून आतापर्यंत ६ नाग, ३ घोणस, ४ अजगर, २ मण्यार, १ बिबट्या (राजापूरमधून) असे एकूण १६ वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.