शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

वन्यप्राण्यांच्या बचावासाठी वनविभागाची तीन पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:33 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा ...

रत्नागिरी : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराच्या पाण्यासोबत मगर, साप, अजगर व इतर वन्यप्राणी पाण्यासोबत वाहून आल्याची शक्यता असल्याने त्यांचा बचाव करण्यासाठी रत्नागिरी (चिपळूण) वनविभागाची ३ बचाव पथके बचाव साहित्यासह २४ तास शहरात सज्ज आहेत. सध्या पुराचे पाणी ओसरल्याने चिपळूण शहरामध्ये किंवा आसपासच्या शहरात वन्य प्राणी आढळू लागले आहेत. या प्राण्यांचा बचाव करण्यासाठी वन विभागाची ३ बचाव पथके तैनात ठेवण्यात आली आहेत. असे प्राणी आढळल्यास वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर किंवा चिपळूण कार्यालयातील नियंत्रण कक्षावर संपर्क साधावा, असेे आवाहनही वनविभागाकडून करण्यात आले आहे.

नागरिकांचे फोन येताच वनविभागामार्फत संबंधित ठिकाणी तत्काळ मदत केली जात आहे. राजश्री किर वनक्षेत्रपाल चिपळूण ९४०४९०५८५, राजाराम शिंदे वनरक्षक कोळकेवाडी (९७६५७८७५७८), निलेश बापट, मानद वन्यजीव रक्षक चिपळूण (९५५२५९३८९८), दत्ताराम सुर्वे, वनरक्षक रामपूर (८८८८९६७२८४) यांच्या क्रमांकावर संपर्क साधावा. मानवी वस्तीत वन्यप्राणी आल्यास नागरिकांनी घाबरुन न जाता तत्काळ वनविभागास संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागामार्फत करण्यात आले आहे.

२५५ वन्यजीवांची सुटका...

वनविभाग चिपळूण मार्फत २०२० -२१ मध्ये २५५ वन्यजीवांची सुटका करुन त्यांना जीवदान दिले आहे. वनविभागाची पथके चिपळूण शहरातील वेगवेगळ्या भागात जाऊन संकटात सापडलेले, मानवी वस्तीत आलेले वन्यप्राणी यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे काम करीत आहेत. २२ जुलैपासून आतापर्यंत ६ नाग, ३ घोणस, ४ अजगर, २ मण्यार, १ बिबट्या (राजापूरमधून) असे एकूण १६ वन्यप्राण्यांचा बचाव करण्यात आला आहे.