शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

जलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 16:51 IST

रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

ठळक मुद्देजलवाहिनीच्या चरीत ट्रक अडकल्याने तीन तास वाहतूक ठप्पप्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर, मिरजोळे-पाटीलवाडीतील घटना

रत्नागिरी : रत्नागिरी शहराच्या सुधारित नळयोजनेची मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी मिरजोळे-पाटीलवाडी येथे रस्त्याच्या कडेला खोदलेल्या चरीमध्ये चिरे भरलेला ट्रक रुतला. त्यामुळे तब्बल तीन तास या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

११.३० वाजता रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी घटनास्थळी भेट दिली. बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणाने हा प्रकार घडल्याचे सांगून बांधकामच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर एका बाजुने रस्ता मोकळा करून दिल्यानंतर वाहतूक सुरू झाली.नगर परिषदेच्या सुधारित नळपाणी योजनेसाठी शीळ धरणावरून मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी रस्त्याच्या एका बाजूने खोदाई करून जलवाहिन्या टाकल्या जात आहेत. खोेदाईनंतर साईडपट्टयांचे काम तातडीने करण्यासाठी बांधकाम विभागाकडे नगर परिषदेने १ कोटी १५ लाख रुपये भरपाई वर्ग केली आहे.त्यामुळे खोदाई झालेल्या भागात तातडीने दुरुस्ती करण्याची जबाबदारी असतानाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले असा ठपका नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी अधिकाऱ्यांवर ठेवला. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक रोशन फाळके, वसंत पाटील उपस्थित होते. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाRatnagiriरत्नागिरी